शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडकल्याने दुचाकीस्वार तिघांचा मृत्यू, नगरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 09:43 IST

पुण्यावरून घरी परत येत असताना दौंड-पाटस रोडवर वायरलेस फाट्याजवळ उसाच्या ट्रॅकटरला मागे धडकून काष्टी येथील बाजारतळ परिसरात राहणा-या तीन जणांचा मृत्यू झाला. 

बाळासाहेब काकडे 

श्रीगोंदा : (जि. अहमदनगर) : पुण्यावरून घरी परत येत असताना दौंड-पाटस रोडवर वायरलेस फाट्याजवळ उसाच्या ट्रॅकटरला मागे धडकून काष्टी येथील बाजारतळ परिसरात राहणा-या तीन जणांचा मृत्यू झाला. 

 ऋषिकेश महादेव मोरे (वय २६ )स्वप्निल सतीष मनुचार्य (वय२४), गणेश बापु शिंदे (वय २५)  या युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. 

या घटनेमुळे संपूर्ण काष्टी गावावर शोककळा पसरली. सोमवारी सकाळी घोड नदीतिरी तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामस्थांनी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक समजलेली माहिती अशी की,  मयत झालेले तिन्ही तरुण काल रात्री दुचाकीवरून जात असताना समोर चाललेल्या उसाच्या ट्रॅकटरला धडकले. यात त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातामुळे पुन्हा एकदा विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कडक कारवाईचा मुद्दा समोर आला आहे. विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रीच्या वेळी अंधारात प्रवास करताना इतरांना दिसून येत नाहीत.  त्यामुळे असे  अपघात होऊन आतापर्यत तालुक्यातही अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.  

गेल्या वर्षी श्रीगोंदा व काष्टी येथील तीन तरुणांचा श्रीगोंदा शहरातील काष्टी ते श्रीगोंदा महामार्गावर असाच अपघात होऊन मृत्यू झाला होता. प्रशासन व कारखानदार यांनी  निष्पाप लोकांचे जीव जाण्याची वाट पहात न बसता या विनारिफ्लेकटर प्रवास करणाऱ्या वाहनांबाबत कडक कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Accidentअपघात