शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

भाजपात गेलेल्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार; सत्यजित तांबे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 12:32 IST

काँग्रेसमध्ये मानसन्मान असलेल्या अनेक नेत्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केला. या नेत्यांना भाजपमध्ये कोणताही मान-सन्मान नसून त्यांना पाचव्या-सहाव्या रांगेत बसावे लागते आहे. त्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशीच झाली असल्याची टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली.

संगमनेर : काँग्रेसमध्ये मानसन्मान असलेल्या अनेक नेत्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केला. या नेत्यांना भाजपमध्ये कोणताही मान-सन्मान नसून त्यांना पाचव्या-सहाव्या रांगेत बसावे लागते आहे. त्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशीच झाली असल्याची टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली.

   संगमनेरातील अमृता लॉन्स येथे रविवारी युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्यावतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष तांबे म्हणाले,  काँग्रेस पक्षाला समृद्ध परंपरा असून ती राज्यघटनेशी बांधील अशी विचारधारा आहे. पक्षाने अनेक अडचणी पाहिल्या. यातून पुन्हा उभारी घेतली आहे. जमिनीवरचा कार्यकर्ता हीच या पक्षाची ताकद राहिली आहे. आगामी काळात युवकांना काँग्रेस पक्षात मोठी संधी आहे. जन माणसांचा काँग्रेसवर मोठा विश्वास आहे.

प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पक्षात पुन्हा चैतन्य निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अनेकांनी पक्ष सोडला त्यांची सध्या खूप वाईट अवस्था आहे. त्या जागा आता तरुणांनी घेतल्या आहेत. असेही तांबे म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSatyajit Tambeसत्यजित तांबेcongressकाँग्रेसPoliticsराजकारण