शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

ज्यांना घराजवळचा रस्ता करता आला नाही ते उड्डाणपुलाच्या गप्पा मारतात : आ. संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 17:11 IST

महापौर असताना कोठी ते यश पॅलेस रस्त्याच्या कामास कोट्यवधी रुपयांचा सर्वात सुंदर हा रस्ता पूर्ण केला. तसेच आनंदधाम ते स्वस्तिक चौक हा रस्ताही दर्जेदार करून मॉडेल रस्ता केला आहे.

अहमदनगर : महापौर असताना कोठी ते यश पॅलेस रस्त्याच्या कामास कोट्यवधी रुपयांचा सर्वात सुंदर हा रस्ता पूर्ण केला. तसेच आनंदधाम ते स्वस्तिक चौक हा रस्ताही दर्जेदार करून मॉडेल रस्ता केला आहे. मात्र याच रस्त्यावर राहणा-या लोकप्रतिनिधीला शहरामध्ये असे एकही मोठे काम करता आले नाही. ज्यांना आपल्या घराजवळचा रस्ता करता आला नाही ते काय उड्डाणपूल करतील ? अशी तोफ राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांनी भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांच्यावर डागली. महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग १४ मध्ये जगताप बोलत होते.जगताप म्हणाले, राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर करत आम्हाला अडचणीत आणून खोट्या प्रकरणात आत टाकून औरंगाबादला ठेवले. प्रशासनावर मंत्र्यांचा दबाव आणून आमच्यावर कारवाई करण्यास भाग पाडले. मात्र मी डगमगलो नाही, प्रसंगाला सामोरे गेलो. अशा गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. जर अशा विचारांची येणा-या दिवसात वाढ झाली तर त्याचे परिणाम आम्ही भोगली आहेत. उद्या तुमच्यावरही अशी वेळ येऊ शकते. पण तुम्ही काळजी करू नका तुमच्या पाठीशी आमची ताकद आहे. म्हणून भावनांवर आता निवडणूक लढवण्याचे दिवस गेले आहेत, विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असेही जगताप म्हणाले.यावेळी उमेदवार प्रकाश भागानागरे, शीतल जगताप, मीना चोपडा, संजय चोपडा, राष्ट्रावादीचे शहराध्यक्ष माणिक विधाते, कांतीलाल गुगळे, डॉ.विजय भंडारी, बबनराव घुले, प्रा.पोपटराव काळे, अर्जुन बोरुडे, विठ्ठल गुंजाळ, अलका मुंदडा, दिनेश जोशी, सुमतिलाल कोठारी, बापूसाहेब कुलट, ज्ञानदेव पांडूळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कराळे यांनी केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका