शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

जिल्ह्यातील साडेसातशे अंगणवाड्या तहानलेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 14:37 IST

शिक्षणावर सर्वाधिक खर्च केल्याचा दावा ग्रामपंचायतींकडून केला जातो़ प्र्रत्यक्षात मात्र गावातील अंगणवाडीतील चिमुकल्यांना साधे पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध करून दिले जात नाही़ जिल्ह्यातील साडेसातशेहून अधिक अंगणवाड्यात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़

अहमदनगर : शिक्षणावर सर्वाधिक खर्च केल्याचा दावा ग्रामपंचायतींकडून केला जातो़ प्र्रत्यक्षात मात्र गावातील अंगणवाडीतील चिमुकल्यांना साधे पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध करून दिले जात नाही़ जिल्ह्यातील साडेसातशेहून अधिक अंगणवाड्यात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़उन्हाळा सुरू असल्याने शाळांना सध्या सुट्या आहेत़ मात्र, अंगणवाड्या सुरू आहेत़ सकाळी ८ ते दुपारी १, यावेळेत अंगणवाड्यात भरतात़ जिल्ह्यातील अंगणवाड्यांची संख्या ४ हजार ८०१ इतकी आहे़ उन्हाळा असल्याने अंगणवाड्यांमध्येच पिण्याच्या पाण्याची सुविधा असणे गरजेचे आहे़ मात्र जिल्ह्यातील ७६९ अंगणवाड्यांमध्ये कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची सोय नाही़ राहुरी तालुक्यातील सर्वाधिक १७७ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही़ गावातील ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगाचा निधी मिळतो़ या निधीतून गावात पायाभूत सुविधा पुरविल्या जातात़ मात्र गावातील शाळा व अंगणवाड्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते़गावातील शाळांना स्वतंत्र नळजोड आहेत़ अंगणवाडीला मात्र अशी कुठलीही सुविधा नाही़ त्यात अंगणवाड्या उन्हाळ्यात सुरू असतात़ असे असतानाही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने चिमुकल्यांची गैरसोय होत आहे़अंगणवाड्यांना जलशुध्दीकरण यंत्रांचाही पुरवठा करण्यात आला आहे़ मात्र काही ठिकाणी अंगणवाड्यांना सुविधा मिळत नसल्याने चिमुकल्यांची मोठी गैरसोय होत आहे़शंभर टक्के पाणीपुरवठासंगमनेर, शेवगाव, नगर, पारनेर, बेलवंडी आणि राहाता प्रकल्पातील सर्व अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे़पिण्याच्या पाण्याची सोय नसलेल्या अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे़ कायमस्वरुपी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - मनोज ससे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग

सर्वाधिक संख्या राहुरीतराहुरी प्रकल्पात सर्वाधिक १७७ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही़ त्याखालोखालवडाळा............... (१४४)कर्जत ............... (८४)जामखेड ............... (८२)भिंगार ............... (६२)श्रीरामपूर............... (५७)कोपरगाव ............... (४७)नेवासा ............... (३२)राजूर ............... (३०)अकोले ............... (२७)पाथर्डी ............... (२१)श्रीगोंदा............... (२०)घारगाव ............... (१६)येथील अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी नाही़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSchoolशाळा