शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूल,सीना सुशोभिकरण ‘त्यांनी’च अडविले

By admin | Updated: June 10, 2014 00:13 IST

अहमदनगर: शहरातील उड्डाणपूल, सीना नदी सुशोभिकरणाचे काम त्यांनीच अडविले.

अहमदनगर: शहरातील उड्डाणपूल, सीना नदी सुशोभिकरणाचे काम त्यांनीच अडविले. माझ्या वयाइतके त्यांचे राजकारण आहे. मग २५ वर्षात शहरासाठी त्यांनी काय केले? असा सवाल करत महापौर संग्राम जगताप यांनी आमदार राठोड यांच्यावर पत्रकार परिषदेत टिकास्त्र सोडले. जगताप म्हणाले, पाणी प्रश्न निमित्त आहे. मुंबईत एका उद्योजकाची भेट घेतली त्याची पोटदुखी त्यांना आहे, ते खरे मूळ कारण आहे. उद्योजकाला चुकीचे काम सांगयाचे, ते त्याने केले नाही की त्याला धमकावयाचे अन् पळवून लावयाचे असा त्यांचा कार्यक्रम आहे. आजपर्यंत राठोड यांनी विधानसभेत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्याचे काय झाले हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यातील बहुतांश प्रश्न हे अधिकाऱ्यांशी संबंधित आहे. उड्डाणपुलाचे काम त्यांनीच बंद पाडले. आमचा व्यवसाय तेथे असला तरी पूल गृहीत धरून आम्ही प्रकल्प उभारला आहे. मात्र त्यांच्या समर्थकांसाठी त्यांनी पुलाचे काम बंद पाडले. असाच प्रकार सीना नदी सुशोभिकरणाचा झाला. उघडपणे विरोधाची भूमिका घेत त्यांनी सुशोभिकरणाचे काम हाणून पाडले. त्यांच्या समर्थकांच्या जमिनी, अतिक्रमणे त्यात निघणार होती. आज ते ज्या कामांची पाहणी करत आहे त्यासाठी निधी मीच आणला हे ते विसरले काय? असा प्रश्न जगताप यांनी उपस्थित केला. दहशतीच्या जीवावर निवडून येता या आरोपाचे खंडण करताना जगताप म्हणाले, हे जसे ग्राह्य धरले तर आमची दहशत फक्त वार्डापुरती आहे. तुम्ही तर आमदार आहात मग तुमची दहशत तर शहरावर आहे. मी सातत्याने महापौर नाही, तुम्ही तर २५ वर्षापासून आमदार आहात, शहरासाठी तुम्ही काय केले? असा प्रश्न त्यांनी केला. पाणी प्रश्न काल उद्भवला नाही, अनेक वर्षापासूनचा आहे. त्याचे मूळ महापालिका नाही, आम्हीही विरोधक असताना याप्रकरणी मोर्चा काढला पण तो महावितरणवर होता. शहराचा त्यांचा अभ्यास फार जुना आहे. कोणावर कधी व कसं खापर फोडायचे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. तोच त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे. इतक्या छोट्या विषयात मी पडणार नाही. आमच्यासमोर विकासाचे अनेक कामे आहेत. ती पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)मित्रपक्षाच्या आरोपाचे अवलोकन करा..आम्ही राजकीय विरोधक आहे. आरोप करणारच. पण त्यांचा मित्र पक्ष असलेल्या भाजपा खासदारांच्या नगरसेवक मुलाने त्यांच्यावर अनेक आरोप केले आहे. त्याचे तर अवलोकन करा असा सल्ला महापौर जगताप यांनी दिला. सारसनगर, केडगाव हे आमच्या एकट्याचे नाही. तुमच्याच मतदारसंघात आहे याचे भानही त्यांनी ठेवले पाहिजे. टॅँकरचे ठेकेदार तुमच्या शेजारीच...शहराच्या काही भागात टॅँकरने पाणी सुरू आहे. गत अनेक दिवसांपासून टॅँकर सुरू आहेत. जे टॅँकरने पाणी पुरवतात ते तुमच्या मांडीला मांडी लावून बसतात. आता टॅँकरच्या खेपावर लक्ष ठेवावे लागेल. टॅँकरने पाणी पुरवठा करण्याचे काम गत अनेक वर्षापासून सुरू आहे. आम्ही ते सुरू केलेले नाही. वाढत्या उपनगरात टॅँकर सुरू आहे. पक्षांतर्गत विरोधाने ते हैराणपूर्वी त्यांना पक्षांतर्गत विरोध नव्हता. लोकसभा निवडणूक निकालानंतर त्यांना पक्षांतर्गत विरोध सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यांच्याकडे विकास कामावर बोलण्यासारखे काही नाही. ते लोकांची दिशाभूल करत आहेत. ग्रामपंचायतीला होणारा पाणी पुरवठा बंद करण्याचा ठराव महासभेत तुमची सत्ता असताना का नाही केला असा सवाल जगताप यांनी केला. आमदारकी त्यांच्या एकट्याची आहे का? आमदारकीचे डोहाळे लागल्याचे सांगणाऱ्या राठोड यांच्या एकट्याची आमदारकी नाही. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. प्रत्येकालाच आमदार व्हावे वाटते. कोणीही आमदारकीची निवडणूक लढवू शकतो असे सांगत जगताप यांनी डोहाळ्याच्या टीकेचे खंडण केले. त्यांना तेवढेच कामआरोप करणाऱ्यांना तेवढेच काम आहे. मला प्रलंबित विकास कामे करायची आहेत. काही संकल्पना राबवयाच्या असल्याचे ते म्हणाले.