शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

उड्डाणपूल,सीना सुशोभिकरण ‘त्यांनी’च अडविले

By admin | Updated: June 10, 2014 00:13 IST

अहमदनगर: शहरातील उड्डाणपूल, सीना नदी सुशोभिकरणाचे काम त्यांनीच अडविले.

अहमदनगर: शहरातील उड्डाणपूल, सीना नदी सुशोभिकरणाचे काम त्यांनीच अडविले. माझ्या वयाइतके त्यांचे राजकारण आहे. मग २५ वर्षात शहरासाठी त्यांनी काय केले? असा सवाल करत महापौर संग्राम जगताप यांनी आमदार राठोड यांच्यावर पत्रकार परिषदेत टिकास्त्र सोडले. जगताप म्हणाले, पाणी प्रश्न निमित्त आहे. मुंबईत एका उद्योजकाची भेट घेतली त्याची पोटदुखी त्यांना आहे, ते खरे मूळ कारण आहे. उद्योजकाला चुकीचे काम सांगयाचे, ते त्याने केले नाही की त्याला धमकावयाचे अन् पळवून लावयाचे असा त्यांचा कार्यक्रम आहे. आजपर्यंत राठोड यांनी विधानसभेत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्याचे काय झाले हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यातील बहुतांश प्रश्न हे अधिकाऱ्यांशी संबंधित आहे. उड्डाणपुलाचे काम त्यांनीच बंद पाडले. आमचा व्यवसाय तेथे असला तरी पूल गृहीत धरून आम्ही प्रकल्प उभारला आहे. मात्र त्यांच्या समर्थकांसाठी त्यांनी पुलाचे काम बंद पाडले. असाच प्रकार सीना नदी सुशोभिकरणाचा झाला. उघडपणे विरोधाची भूमिका घेत त्यांनी सुशोभिकरणाचे काम हाणून पाडले. त्यांच्या समर्थकांच्या जमिनी, अतिक्रमणे त्यात निघणार होती. आज ते ज्या कामांची पाहणी करत आहे त्यासाठी निधी मीच आणला हे ते विसरले काय? असा प्रश्न जगताप यांनी उपस्थित केला. दहशतीच्या जीवावर निवडून येता या आरोपाचे खंडण करताना जगताप म्हणाले, हे जसे ग्राह्य धरले तर आमची दहशत फक्त वार्डापुरती आहे. तुम्ही तर आमदार आहात मग तुमची दहशत तर शहरावर आहे. मी सातत्याने महापौर नाही, तुम्ही तर २५ वर्षापासून आमदार आहात, शहरासाठी तुम्ही काय केले? असा प्रश्न त्यांनी केला. पाणी प्रश्न काल उद्भवला नाही, अनेक वर्षापासूनचा आहे. त्याचे मूळ महापालिका नाही, आम्हीही विरोधक असताना याप्रकरणी मोर्चा काढला पण तो महावितरणवर होता. शहराचा त्यांचा अभ्यास फार जुना आहे. कोणावर कधी व कसं खापर फोडायचे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. तोच त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे. इतक्या छोट्या विषयात मी पडणार नाही. आमच्यासमोर विकासाचे अनेक कामे आहेत. ती पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)मित्रपक्षाच्या आरोपाचे अवलोकन करा..आम्ही राजकीय विरोधक आहे. आरोप करणारच. पण त्यांचा मित्र पक्ष असलेल्या भाजपा खासदारांच्या नगरसेवक मुलाने त्यांच्यावर अनेक आरोप केले आहे. त्याचे तर अवलोकन करा असा सल्ला महापौर जगताप यांनी दिला. सारसनगर, केडगाव हे आमच्या एकट्याचे नाही. तुमच्याच मतदारसंघात आहे याचे भानही त्यांनी ठेवले पाहिजे. टॅँकरचे ठेकेदार तुमच्या शेजारीच...शहराच्या काही भागात टॅँकरने पाणी सुरू आहे. गत अनेक दिवसांपासून टॅँकर सुरू आहेत. जे टॅँकरने पाणी पुरवतात ते तुमच्या मांडीला मांडी लावून बसतात. आता टॅँकरच्या खेपावर लक्ष ठेवावे लागेल. टॅँकरने पाणी पुरवठा करण्याचे काम गत अनेक वर्षापासून सुरू आहे. आम्ही ते सुरू केलेले नाही. वाढत्या उपनगरात टॅँकर सुरू आहे. पक्षांतर्गत विरोधाने ते हैराणपूर्वी त्यांना पक्षांतर्गत विरोध नव्हता. लोकसभा निवडणूक निकालानंतर त्यांना पक्षांतर्गत विरोध सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यांच्याकडे विकास कामावर बोलण्यासारखे काही नाही. ते लोकांची दिशाभूल करत आहेत. ग्रामपंचायतीला होणारा पाणी पुरवठा बंद करण्याचा ठराव महासभेत तुमची सत्ता असताना का नाही केला असा सवाल जगताप यांनी केला. आमदारकी त्यांच्या एकट्याची आहे का? आमदारकीचे डोहाळे लागल्याचे सांगणाऱ्या राठोड यांच्या एकट्याची आमदारकी नाही. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. प्रत्येकालाच आमदार व्हावे वाटते. कोणीही आमदारकीची निवडणूक लढवू शकतो असे सांगत जगताप यांनी डोहाळ्याच्या टीकेचे खंडण केले. त्यांना तेवढेच कामआरोप करणाऱ्यांना तेवढेच काम आहे. मला प्रलंबित विकास कामे करायची आहेत. काही संकल्पना राबवयाच्या असल्याचे ते म्हणाले.