शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

नगर जिल्ह्यात लॉकडाऊनची गरज नाही; रोहित पवारांचा सुजय विखेंना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 15:17 IST

केंद्र सरकारने लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरोग्य व अर्थकारण याचा मेळ घालून पुढे जावे लागेल. सध्या नगरमध्येही कोरोना चाचण्या वाढवलेल्या आहेत. यावर कोणी लोकप्रतिनिधी लॉकडाऊनची मागणी करत असेल तर त्यांना केंद्र सरकारचा निर्णय मान्य नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो.

अहमदनगर : केंद्र सरकारने लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरोग्य व अर्थकारण याचा मेळ घालून पुढे जावे लागेल. सध्या नगरमध्येही कोरोना चाचण्या वाढवलेल्या आहेत. यावर कोणी लोकप्रतिनिधी लॉकडाऊनची मागणी करत असेल तर त्यांना केंद्र सरकारचा निर्णय मान्य नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो, असे सांगत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नगर जिल्ह्यात लॉकडाऊनची गरज नसल्याचे संकेत देऊन लॉकडाऊनची मागणी करणाऱ्या खासदार सुजय विखे यांना टोला लगावला आहे.शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्राची पाऊले लॉकडाऊन उठवण्याकडे आहेत. पूर्वी दुचाकीवर एका व्यक्तीला परवानगी होती आता ती केंद्राने दोन व्यक्तींना केली आहे. या कोरोनाच्या काळात आरोग्य व अर्थकारण याचा मेळ घालावा लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर प्रत्येकाला काळजी घ्यायचीच आहे. परंतु दुसरीकडे उपाशी राहून कोणाचा जीव जायला नको. त्यामुळे यावर मध्य मार्ग काढून पुढे जावे लागेल. लॉकडाऊन उठवण्याच्या दिशेने केंद्र निर्णय घेत आहे. मग केंद्राचे निर्णय आपल्याला मान्य नाहीत का? असा टोला त्यांनी खासदार विखे यांना लगावला.विखे हे भाजपचे खासदार असून ते प्रशासनावर आरोप करत नगरमध्ये पूर्ण लॉकडाऊनची मागणी वारंवार करत आहेत. त्यावर आमदार पवार यांनी लॉकडाऊनची गरज नसल्याचे सांगत प्रशासनाची बाजू घेतली आहे.सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी भाजप राजकारण करत असून त्यांनी केवळ हवेतील आरोप करू नयेत. ठोस पुरावे असतील तर ते पोलिसांकडे द्यावे. गेल्या पाच वर्षांत ज्या पोलिसांचे संरक्षण घेतले आता त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेऊ नये, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRohit Pawarरोहित पवारSujay Vikheसुजय विखे