शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

आघाडीत पुन्हा वाद नाही :अजित पवार यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 14:24 IST

आघाडीच्या सरकारच्या काळात जे घडलं, ते पुन्हा घडणार नाही, असा विश्वास निर्माण करण्याचे काम दोन्ही पक्षाकडून केले जाईल,असे सांगून आघाडीत आता वादाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी नरमाईची भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

अहमदनगर : आघाडीच्या सरकारच्या काळात जे घडलं, ते पुन्हा घडणार नाही, असा विश्वास निर्माण करण्याचे काम दोन्ही पक्षाकडून केले जाईल, असे सांगून आघाडीत आता वादाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी नरमाईची भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.औरंगाबाद येथील विभागीय मेळावा संपवून पुण्याकडे जात असताना पवार यांनी सायंकाळी नगरमध्ये थांबून शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला़. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. राहुल जगताप, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, शहराध्यक्ष माणिक विधाते, हमाल पंचायतचे अविनाश घुले, माजी महापौर अभिषेक कळमकर आदी यावेळी उपस्थित होते़. अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जगात सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल महाराष्ट्रात आहे. महागाई वाढत असताना पाच हजार कोटींच्या कर्जाची किमया सरकारने केली आहे. राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे, म्हणून समविचारी पक्षांना सोबत घेऊन आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केला आहे़.त्यादिशेने हालचाली सुरू आहेत. जिथे ज्या पक्षाची ताकद असेल, तिथे त्या पक्षाने उमेदवार द्यावा़ त्याला अन्य पक्षांनी सहकार्य करावे, असा जागा वाटपाचा फार्म्युला असेल.  यासंदर्भात दोन्ही पक्षांची मुंबईत बैठक आहे. या बैठकीत आघाडीबाबत चर्चा होईल.  आम्ही भारतीय आहोत, अशी ज्यांची भूमिका आहे, त्या सर्वांना एकत्र आणून त्यांची मोट बांधण्याचे काम सुरू आहे. मागील आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांवर आरोप केले गेले. दोन्ही काँग्रेसमध्ये वाद झाले, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्रितपणे प्रयत्न करतील आणि तसा विश्वास जनतेला देतील, असे पवार म्हणाले.दक्षिणेचा निर्णय चर्चेनेजागा वाटपाबाबत येत्या ६ व ७ आॅक्टोबर रोजी मतदारसंघातील नेत्यांशी चर्चा होणार आहे. स्थानिक नेत्यांशी चर्चा करूनच दक्षिणेचा निर्णय होईल, परंतु, याबाबत माझ्यासह कुणालाही बोलण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. स्थानिक नेत्यांनी पालिकेचा निर्णय घ्यावावरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल़ तो महापालिकेला लागू नसेल.  स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन आघाडी करायची की स्वतंत्र लढायचे याचा निर्णय घ्यावा.  गरज असल्यास त्यांना मार्गदर्शन केले जाईल असे पवार म्हणाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAjit Pawarअजित पवार