शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

आघाडीत पुन्हा वाद नाही :अजित पवार यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 14:24 IST

आघाडीच्या सरकारच्या काळात जे घडलं, ते पुन्हा घडणार नाही, असा विश्वास निर्माण करण्याचे काम दोन्ही पक्षाकडून केले जाईल,असे सांगून आघाडीत आता वादाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी नरमाईची भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

अहमदनगर : आघाडीच्या सरकारच्या काळात जे घडलं, ते पुन्हा घडणार नाही, असा विश्वास निर्माण करण्याचे काम दोन्ही पक्षाकडून केले जाईल, असे सांगून आघाडीत आता वादाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी नरमाईची भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.औरंगाबाद येथील विभागीय मेळावा संपवून पुण्याकडे जात असताना पवार यांनी सायंकाळी नगरमध्ये थांबून शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला़. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. राहुल जगताप, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, शहराध्यक्ष माणिक विधाते, हमाल पंचायतचे अविनाश घुले, माजी महापौर अभिषेक कळमकर आदी यावेळी उपस्थित होते़. अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जगात सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल महाराष्ट्रात आहे. महागाई वाढत असताना पाच हजार कोटींच्या कर्जाची किमया सरकारने केली आहे. राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे, म्हणून समविचारी पक्षांना सोबत घेऊन आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केला आहे़.त्यादिशेने हालचाली सुरू आहेत. जिथे ज्या पक्षाची ताकद असेल, तिथे त्या पक्षाने उमेदवार द्यावा़ त्याला अन्य पक्षांनी सहकार्य करावे, असा जागा वाटपाचा फार्म्युला असेल.  यासंदर्भात दोन्ही पक्षांची मुंबईत बैठक आहे. या बैठकीत आघाडीबाबत चर्चा होईल.  आम्ही भारतीय आहोत, अशी ज्यांची भूमिका आहे, त्या सर्वांना एकत्र आणून त्यांची मोट बांधण्याचे काम सुरू आहे. मागील आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांवर आरोप केले गेले. दोन्ही काँग्रेसमध्ये वाद झाले, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्रितपणे प्रयत्न करतील आणि तसा विश्वास जनतेला देतील, असे पवार म्हणाले.दक्षिणेचा निर्णय चर्चेनेजागा वाटपाबाबत येत्या ६ व ७ आॅक्टोबर रोजी मतदारसंघातील नेत्यांशी चर्चा होणार आहे. स्थानिक नेत्यांशी चर्चा करूनच दक्षिणेचा निर्णय होईल, परंतु, याबाबत माझ्यासह कुणालाही बोलण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. स्थानिक नेत्यांनी पालिकेचा निर्णय घ्यावावरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल़ तो महापालिकेला लागू नसेल.  स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन आघाडी करायची की स्वतंत्र लढायचे याचा निर्णय घ्यावा.  गरज असल्यास त्यांना मार्गदर्शन केले जाईल असे पवार म्हणाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAjit Pawarअजित पवार