शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

धनगर आरक्षण प्रश्नावर जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून गायब, आंदोलक सकाळी सापडले

By सुदाम देशमुख | Updated: September 27, 2024 10:42 IST

प्रवरा संगम पूलापासून खाली साधारण २ किलोमीटर अंतरावर आंदोलक मिळून आले

नेवासा (जिल्हा अहमदनगर): गेल्या नऊ दिवसापासून धनगर आरक्षण प्रश्नावर आम्ही उपोषण करत आहोत सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करीत दोन आंदोलकांनी गुरुवारी दुपारी जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून गायब झाले होते. त्यांचा काल रात्री रात्रभर शोध सुरू होता. अखेर सकाळी एका मच्छीमाराने दिलेल्या माहितीनुसार हे दोन आंदोलन आढळून आले आहेत. पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले आहे. 

गुरुवारी सकाळी "आम्ही जलसमाधी घेत आहोत तुम्हाला अखेरचा जय मल्हार" असे चिठ्ठीत नमूद करून प्रल्हाद सोरमारे व बाळासाहेब कोळसे हे दोन आंदोलन गायब झाले होते. त्यांनी छत्रपती संभाजी नगर- अहमदनगर मार्गावरील प्रवारासंगम नदीच्या पुलावर ही चिठ्ठी एका कारवर ठेवली होती. तसेच बाजूला आपला मोबाईल आणि चपलाही ठेवल्या होत्या. त्यानंतर ते गायब झाले होते. त्यांनी जलसमाधी घेतली असल्याची शक्यता व्यक्त करून एनडीआरएफ पथक आणि प्रशासनाने त्यांचे शोधकार्य ही हाती घेतले होते. रात्र झाल्याने हे शोधकाम थांबवण्यात आले होते. अखेर शुक्रवारी सकाळी मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आणि एनडीएआरएफच्या पथकाने शोध घेतला असता हे दोघेही आंदोलक नदीपात्र परिसरात मिळून आले. आंदोलकांनी उडी मारली अशी माहिती मिळाल्यानंतर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी ही सूचना स्थानिक मच्छीमारांना देऊन अशी काही दुर्घटना दिसून आल्यास कळवण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे स्थानिक मच्छीमारांनी ही माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना दिली. त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली असताना आणि प्रत्यक्षदर्शीच्या मासेमारी करणाऱ्याच्या सांगण्यानुसार दोघे चालत-चालत येऊन चप्पुवर झोपले होते.त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.