शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

देशात आणि राज्यात भाजपच्या घसरणीला सुरुवात झाली आहे, काँग्रेसच्या विजयानंतर बाळासाहेब थोरात यांचं विधान

By शेखर पानसरे | Updated: May 13, 2023 16:16 IST

Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटकमधील विजय मोठा असून तो, जनतेचा विजय आहे. भारतीय जनता पक्षाने सुरू केलेले जातीभेदाचे, दहशतीचे राजकारण भारतीय नागरिकांना मान्य नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने देशात परिवर्तनाला सुरूवात झाली आहे.

 - शेखर पानसरेसंगमनेर : कर्नाटकमधील विजय मोठा असून तो, जनतेचा विजय आहे. भारतीय जनता पक्षाने सुरू केलेले जातीभेदाचे, दहशतीचे राजकारण भारतीय नागरिकांना मान्य नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने देशात परिवर्तनाला सुरूवात झाली आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी देशात आणि राज्यात आता काँग्रेसच्या सरकारची गरज असून भाजपाची घसरण सुरू झाली. असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाचा शनिवारी (दि.१३) संगमनेरात जल्लोष करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, एकवीरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा, एनएसयूआय तालुकाध्यक्ष गौरव डोंगरे, सुभाष सांगळे, विश्वास मुर्तडक, जयराम ढेरंगे, किशोर टोकसे, अर्चनाताई बालोडे आदी यावेळी उपस्थित होते.

काँग्रेस हा सर्वसामान्यांच्या विकासाचा व लोकशाहीवर विश्वास असणारा पक्ष आहे. २०१४ मध्ये भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने राजकारणासाठी स्वायत्त संस्थांचा वापर केला. देशात महागाई, बेरोजगारी वाढलेले असताना धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. भाजपाची कार्यपद्धती ही दहशतीची आणि द्वेषाची असून त्यामुळे समाजात समाजात तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे भारतीय नागरिक अस्वस्थ आहेत. असेही आमदार थोरात म्हणाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा