शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
2
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
3
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
4
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
5
Stock Markets News: फार्मावर १००% टॅरिफ, सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरला; निफ्टी २४,८०० च्या खाली, फार्मा शेअर्स आपटले
6
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
7
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
8
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...
9
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
10
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
11
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
12
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
13
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
14
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
15
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
16
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
17
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
18
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
19
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
20
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश

मोदींचा जप करणारे ठाकरेच आता देताहेत शिव्याशाप

By admin | Updated: September 30, 2014 23:19 IST

राहाता : मोदींच्या नावाचा जप करणारे उद्धव ठाकरेच आता त्यांना शिव्याशाप देऊ लागले असल्याची टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

राहाता : राज्यात मुख्यमंत्री कोण होणार, याच कारणाने महायुतीत घटस्फोट झाला. प्रश्नांच्या मुद्यांवरून युती तुटली असती, तर आपण मान्य केले असते. पण निवडणुकीपूर्वीच मंत्रिपदे वाटून घेण्याची स्पर्धा लागल्याने महायुती तुटली. कालपर्यंत नरेंद्र मोदींच्या नावाचा जप करणारे उद्धव ठाकरेच आता त्यांना शिव्याशाप देऊ लागले असल्याची टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.शिर्डी विधानसभा मतदारसंघातील उंबरी-बाळापूर, रहिमपूर आदी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकांमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. रहिमपूर येथील बैठकीत थोरात गटाने विखे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.रहिमपूर येथे तुकाराम पा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अ‍ॅड. बापूसाहेब गुळवे, अ‍ॅड. अशोकराव जोंधळे, अ‍ॅड. सोमनाथ शिंदे, विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, रहिमपूरचे माजी सरपंच शांताराम शिंदे, लक्ष्मण गुळवे, बापूसाहेब शिंदे, संभाजी शिंदे, विश्वनाथ शिंदे, अ‍ॅड. चांगदेव वाळुंज यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक पातळीवर विखे-थोरात गटाचे झालेले मनोमिलन हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानले जाते.विखे म्हणाले की, दोन्ही गटाने एकत्र येणे हा रहिमपूर गावाच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे. राजकारणात अनेक चढ-उतार आपण पाहिले. वैचारिक असलेले मतभेद हेच कार्यकर्त्यांमध्ये विसंगती निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. दोन्ही तालुक्यांच्या पलीकडे जावून आता जिल्ह्याच्या दृष्टीनेही विचार करण्याची वेळ आली आहे. २००४ साली आपण एकत्रित निवडणूक लढलो. त्या निवडणुकीची खऱ्या अर्थाने पुनरावृत्ती होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.देशात आणि राज्यात राजकीय धृवीकरण मोठ्या प्रमाणात घडले आहे. देशात चार महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने केवळ ‘सपने बेचो’ चा धंदा सुरू केला आहे. मोदींना केवळ उद्योगपती आणि पुंजीपतींची स्वप्ने पडतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे त्यांना कोणतेही देणेघेणे राहिलेले नाही. चार महिन्यांत एकही शेतकरी हिताचा निर्णय ते घेऊ शकले नाहीत. त्यामुळे मोदी सरकारच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली असून, या सरकारवर आता लोकांना विश्वास राहिलेला नाही.चार महिन्यांपूर्वी आपण ज्या खासदाराला निवडून दिले तो साधे आभार मानायलाही आपल्याकडे आलेला नाही. याकडे लक्ष वेधून ग्रामीण भागातील प्रश्न, शेती, पाणी यांचा कोणताही अभ्यास नसलेली माणसे केवळ पदांसाठी भांडत आहेत. कालपर्यंत मोदींचे गुणगान गाणारे उद्धव ठाकरे आज त्यांनाच शिव्याशाप देत आहेत. एकूणच सत्तेसाठी हपापलेल्या या नेत्यांना राज्यात कोणीही थारा देणार नाही. म्हणूनच काँग्रेसची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचा विश्वास विखे यांनी व्यक्त केला. उंबरी-बाळापूर, रहिमपूर आदी ठिकाणी झालेल्या विखे यांच्या झंझावाती दौऱ्यास ग्रामस्थ, काँग्रेस कार्यकर्ते, युवक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (वार्ताहर)