शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा जप करणारे ठाकरेच आता देताहेत शिव्याशाप

By admin | Updated: September 30, 2014 23:19 IST

राहाता : मोदींच्या नावाचा जप करणारे उद्धव ठाकरेच आता त्यांना शिव्याशाप देऊ लागले असल्याची टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

राहाता : राज्यात मुख्यमंत्री कोण होणार, याच कारणाने महायुतीत घटस्फोट झाला. प्रश्नांच्या मुद्यांवरून युती तुटली असती, तर आपण मान्य केले असते. पण निवडणुकीपूर्वीच मंत्रिपदे वाटून घेण्याची स्पर्धा लागल्याने महायुती तुटली. कालपर्यंत नरेंद्र मोदींच्या नावाचा जप करणारे उद्धव ठाकरेच आता त्यांना शिव्याशाप देऊ लागले असल्याची टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.शिर्डी विधानसभा मतदारसंघातील उंबरी-बाळापूर, रहिमपूर आदी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकांमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. रहिमपूर येथील बैठकीत थोरात गटाने विखे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.रहिमपूर येथे तुकाराम पा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अ‍ॅड. बापूसाहेब गुळवे, अ‍ॅड. अशोकराव जोंधळे, अ‍ॅड. सोमनाथ शिंदे, विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, रहिमपूरचे माजी सरपंच शांताराम शिंदे, लक्ष्मण गुळवे, बापूसाहेब शिंदे, संभाजी शिंदे, विश्वनाथ शिंदे, अ‍ॅड. चांगदेव वाळुंज यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक पातळीवर विखे-थोरात गटाचे झालेले मनोमिलन हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानले जाते.विखे म्हणाले की, दोन्ही गटाने एकत्र येणे हा रहिमपूर गावाच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे. राजकारणात अनेक चढ-उतार आपण पाहिले. वैचारिक असलेले मतभेद हेच कार्यकर्त्यांमध्ये विसंगती निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. दोन्ही तालुक्यांच्या पलीकडे जावून आता जिल्ह्याच्या दृष्टीनेही विचार करण्याची वेळ आली आहे. २००४ साली आपण एकत्रित निवडणूक लढलो. त्या निवडणुकीची खऱ्या अर्थाने पुनरावृत्ती होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.देशात आणि राज्यात राजकीय धृवीकरण मोठ्या प्रमाणात घडले आहे. देशात चार महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने केवळ ‘सपने बेचो’ चा धंदा सुरू केला आहे. मोदींना केवळ उद्योगपती आणि पुंजीपतींची स्वप्ने पडतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे त्यांना कोणतेही देणेघेणे राहिलेले नाही. चार महिन्यांत एकही शेतकरी हिताचा निर्णय ते घेऊ शकले नाहीत. त्यामुळे मोदी सरकारच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली असून, या सरकारवर आता लोकांना विश्वास राहिलेला नाही.चार महिन्यांपूर्वी आपण ज्या खासदाराला निवडून दिले तो साधे आभार मानायलाही आपल्याकडे आलेला नाही. याकडे लक्ष वेधून ग्रामीण भागातील प्रश्न, शेती, पाणी यांचा कोणताही अभ्यास नसलेली माणसे केवळ पदांसाठी भांडत आहेत. कालपर्यंत मोदींचे गुणगान गाणारे उद्धव ठाकरे आज त्यांनाच शिव्याशाप देत आहेत. एकूणच सत्तेसाठी हपापलेल्या या नेत्यांना राज्यात कोणीही थारा देणार नाही. म्हणूनच काँग्रेसची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचा विश्वास विखे यांनी व्यक्त केला. उंबरी-बाळापूर, रहिमपूर आदी ठिकाणी झालेल्या विखे यांच्या झंझावाती दौऱ्यास ग्रामस्थ, काँग्रेस कार्यकर्ते, युवक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (वार्ताहर)