शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताची तुलना आता बांगलादेशसोबत होतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 18:06 IST

केंद्र सरकारचे सर्व निर्णय उद्योगपतींच्या भल्यासाठीच असून, सर्वसामान्य शेतकरी, कामगारांची लुबाडणूक करण्यासाठी शेतकरी व कामगार कायदे केले आहेत. यातून अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताची तुलना आता बांगलादेशसोबत होऊ लागली आहे, टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

अहमदनगर : केंद्र सरकारचे सर्व निर्णय उद्योगपतींच्या भल्यासाठीच असून, सर्वसामान्य शेतकरी, कामगारांची लुबाडणूक करण्यासाठी शेतकरी व कामगार कायदे केले आहेत. यातून अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताची तुलना आता बांगलादेशसोबत होऊ लागली आहे.      काँग्रेसच्यावतीने गुरुवारी (दि. १५) सर्वत्र शेतकरी बचाओ व्हर्चुअल रॅली काढण्यात आली. संगमनेर येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. यावेळी चव्हाण बोलताना चव्हाण म्हणाले, पूर्वी देशात जमिनदार पद्धती होती. त्यातून सर्वसामान्यांचे शोषण केले जात होते. केंद्र सरकारने आता हीच शोषणाची पद्धत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने देशाला वाचविण्यासाठी केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार कायद्यातील त्रुटी सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. शेतकरी देशोधडीला लावण्यासाठी कामदार कायदा मोदी सरकारने केला आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार नाही. शेतमालाचे भाव व्यापारी आणि उद्योगपती निश्चित करतील. तसेच कामगरांचे हक्कच कामदार कायद्याने हिरावून घेतले आहेत. कामगार कायदा आणून सरकारने उद्योजकांना सोयीचे धोरण स्वीकारले आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली. 

शेतकऱ्यांचा आधार हिरावला - थोरात

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी काँग्रेस सरकारने हमीभाव कायदा आणला होता. त्यातून शेतकऱ्यांना मोठा लाभ होत होता. म्हणूनच पंजाब, हरियाणासारख्या राज्यात सर्व शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातही सर्व शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे. कारण शेतकऱ्यांचा हमीभावाचा आधारच केंद्र सरकारने हिरावून घेतला आहे, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात