शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

अटी, शर्तीत अडकल्या चारा छावण्या :पोलिसांनी मरकड यांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 12:29 IST

दुष्काळामुळे पशुधन वाचवण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु त्यात घातलेल्या जाचक अटी व शर्तींमुळे छावण्या मंजुरीत अडथळेच अधिक येत आहेत.

अहमदनगर : दुष्काळामुळे पशुधन वाचवण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु त्यात घातलेल्या जाचक अटी व शर्तींमुळे छावण्या मंजुरीत अडथळेच अधिक येत आहेत. प्रशासन पक्षपातीपणे केवळ सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांना छावण्या मंजूर करत आहे, असा आरोप जिल्ह्यात झाला आहे.जिल्ह्यात छावण्यांसाठी सहाशे अर्ज आले होते. त्यापैकी २२ अर्ज प्रशासनाने आतापर्यंत मंजूर केले आहेत. जे अर्ज मंजूर केले त्यास नेमके कोणते निकष लावले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासन पालकमंत्र्यांच्या दबावाखाली भाजपशी जवळीक असलेल्या कार्यकर्त्यांना छावण्या वाटप करत आहे, असा थेट आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शरद मरकड यांनी केला आहे.‘लोकमत’शी बोलताना मरकड म्हणाले, छावणीऐवजी दावणीला अनुदान द्या, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी होती. मात्र, प्रशासनाला छावण्याच हव्या आहेत. आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यात निवडुंगे येथे जनतेकडून देणगी मिळवून छावणी सुरु केली. तिच्यात दोनशे जनावरे आहेत. खासदार राजू शेट्टी यांनी स्वत: या छावणीला कोल्हापूर येथून एक लाख रुपयांचा चारा आणला.दरम्यानच्या काळात छावण्या सुरु करण्याचे धोरण सरकारने घेतले. आम्ही निकषात बसत असल्याने अर्ज केला. मात्र, प्रशासन आमच्या छावणीला अनुदान द्यायला तयार नाही. ज्यांनी अद्याप छावणीच सुरु केलेली नाही त्या संस्थांना मंजुरी मात्र, आम्ही छावणी चालवत असतानाही मंजुरी नाही. प्रशासन असे पक्षपातीपणे वागत आहे. छावण्यांची वाटप प्रक्रिया पारदर्शी नाही. छावण्यांसाठी आमदार, पालकमंत्री यांच्या शिफारशी कशासाठी हव्या आहेत? तुम्हाला शेतकऱ्याला मदत करायची आहे की त्यांना लाचार बनवून नेत्यांच्या व अधिका-यांच्या दारात उभे करायचे आहे, असा थेट प्रश्न मरकड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.काय आहेत किचकट अटी ?शासनाने महिनाभरापूर्वी छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु छावणी सुरू करण्यासाठी अटी-शर्तींचीच मोठी यादी आहे. एका छावणीत जास्तीत जास्त ५०० जनावरे दाखल करता येतील, अशी अट आहे. गावात ५०० पेक्षा जास्त जनावरे असतील तर गावात दुसरी छावणी मंजूर करता येईल की नाही? याबाबतचा उल्लेख शासन आदेशात नाही. एकाच गावातून अनेक प्रस्ताव असल्याने गोंधळ उडाला आहे.छावणी मंजुरीचे अधिकार पालकमंत्र्यांकडे दिले आहेत. पालकमंत्री यासाठी आमदारांची शिफारस मागत आहेत. केवळ सत्ताधारी कार्यकर्त्यांना छावण्या मंजूर होत असल्याचा आरोप सुरु झाला आहे. छावणी सुरु करण्यासाठी सदर संस्थेकडे दहा लाख रुपये रक्कम खात्यावर जमा असणे आवश्यक आहे.अडीच महिनेच छावण्यादुष्काळाचा एक महिना तर सरला आहे. अजून तीन महिने दुष्काळाची तीव्रता जाणवेल. मे महिन्याच्या मध्यापासूनच शेतकरी मशागतीची कामे करतात. त्यासाठी ते छावणीतून जनावरे घेऊन जातात. त्यामुळे मार्चपासून छावण्या सुरू झाल्या तर पुढे अवघ्या अडीच महिन्यांचा कालावधी उरतो. मागील सरकारने सहा-सात महिने छावण्या चालवल्या, या सरकारला दोन-तीन महिनेच छावण्या चालवायच्या आहेत. परंतु त्याही अद्याप सुरू होईनात, अशी तीव्र भावना शेतकरी व्यक्त करत आहेतअडीच लाख मेट्रिक टन चा-याची गरजगेल्या १६ महिन्यापासून जिल्ह्यात पाऊस नाही. जिल्ह्यात सुमारे २८ लाख लहान-मोठी जनावरे असून त्यांना महिन्याकाठी सुमारे अडीच लाख मेट्रिक टन चाºयाची गरज भासते. प्रशासनाने चारा टंचाईवर उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध करणे आव्हान आहे. दुसरीकडे चाºयाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून चारा छावण्यांची मागणी होत आहे.पोलिसांनी मरकड यांना घेतले ताब्यातनिवडुंगे (ता़ पाथर्डी) येथे शरद मरकड व शेतक-यांनी सुरु केलेल्या छावणीला पालकमंत्री राम शिंदे मंजुरी देत नाहीत, याच्या निषेधार्थ शेतकरी शनिवारी सकाळी आत्मदहन करणार आहेत, असा इशारा देवीदास खेडकर यांनी दिला आहे़ त्यांची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांची धावपळ उडाली़ पोलिसांनी रात्री शरद मरकड यांना ताब्यात घेतल्याचे समजते़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर