शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

अटी, शर्तीत अडकल्या चारा छावण्या :पोलिसांनी मरकड यांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 12:29 IST

दुष्काळामुळे पशुधन वाचवण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु त्यात घातलेल्या जाचक अटी व शर्तींमुळे छावण्या मंजुरीत अडथळेच अधिक येत आहेत.

अहमदनगर : दुष्काळामुळे पशुधन वाचवण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु त्यात घातलेल्या जाचक अटी व शर्तींमुळे छावण्या मंजुरीत अडथळेच अधिक येत आहेत. प्रशासन पक्षपातीपणे केवळ सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांना छावण्या मंजूर करत आहे, असा आरोप जिल्ह्यात झाला आहे.जिल्ह्यात छावण्यांसाठी सहाशे अर्ज आले होते. त्यापैकी २२ अर्ज प्रशासनाने आतापर्यंत मंजूर केले आहेत. जे अर्ज मंजूर केले त्यास नेमके कोणते निकष लावले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासन पालकमंत्र्यांच्या दबावाखाली भाजपशी जवळीक असलेल्या कार्यकर्त्यांना छावण्या वाटप करत आहे, असा थेट आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शरद मरकड यांनी केला आहे.‘लोकमत’शी बोलताना मरकड म्हणाले, छावणीऐवजी दावणीला अनुदान द्या, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी होती. मात्र, प्रशासनाला छावण्याच हव्या आहेत. आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यात निवडुंगे येथे जनतेकडून देणगी मिळवून छावणी सुरु केली. तिच्यात दोनशे जनावरे आहेत. खासदार राजू शेट्टी यांनी स्वत: या छावणीला कोल्हापूर येथून एक लाख रुपयांचा चारा आणला.दरम्यानच्या काळात छावण्या सुरु करण्याचे धोरण सरकारने घेतले. आम्ही निकषात बसत असल्याने अर्ज केला. मात्र, प्रशासन आमच्या छावणीला अनुदान द्यायला तयार नाही. ज्यांनी अद्याप छावणीच सुरु केलेली नाही त्या संस्थांना मंजुरी मात्र, आम्ही छावणी चालवत असतानाही मंजुरी नाही. प्रशासन असे पक्षपातीपणे वागत आहे. छावण्यांची वाटप प्रक्रिया पारदर्शी नाही. छावण्यांसाठी आमदार, पालकमंत्री यांच्या शिफारशी कशासाठी हव्या आहेत? तुम्हाला शेतकऱ्याला मदत करायची आहे की त्यांना लाचार बनवून नेत्यांच्या व अधिका-यांच्या दारात उभे करायचे आहे, असा थेट प्रश्न मरकड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.काय आहेत किचकट अटी ?शासनाने महिनाभरापूर्वी छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु छावणी सुरू करण्यासाठी अटी-शर्तींचीच मोठी यादी आहे. एका छावणीत जास्तीत जास्त ५०० जनावरे दाखल करता येतील, अशी अट आहे. गावात ५०० पेक्षा जास्त जनावरे असतील तर गावात दुसरी छावणी मंजूर करता येईल की नाही? याबाबतचा उल्लेख शासन आदेशात नाही. एकाच गावातून अनेक प्रस्ताव असल्याने गोंधळ उडाला आहे.छावणी मंजुरीचे अधिकार पालकमंत्र्यांकडे दिले आहेत. पालकमंत्री यासाठी आमदारांची शिफारस मागत आहेत. केवळ सत्ताधारी कार्यकर्त्यांना छावण्या मंजूर होत असल्याचा आरोप सुरु झाला आहे. छावणी सुरु करण्यासाठी सदर संस्थेकडे दहा लाख रुपये रक्कम खात्यावर जमा असणे आवश्यक आहे.अडीच महिनेच छावण्यादुष्काळाचा एक महिना तर सरला आहे. अजून तीन महिने दुष्काळाची तीव्रता जाणवेल. मे महिन्याच्या मध्यापासूनच शेतकरी मशागतीची कामे करतात. त्यासाठी ते छावणीतून जनावरे घेऊन जातात. त्यामुळे मार्चपासून छावण्या सुरू झाल्या तर पुढे अवघ्या अडीच महिन्यांचा कालावधी उरतो. मागील सरकारने सहा-सात महिने छावण्या चालवल्या, या सरकारला दोन-तीन महिनेच छावण्या चालवायच्या आहेत. परंतु त्याही अद्याप सुरू होईनात, अशी तीव्र भावना शेतकरी व्यक्त करत आहेतअडीच लाख मेट्रिक टन चा-याची गरजगेल्या १६ महिन्यापासून जिल्ह्यात पाऊस नाही. जिल्ह्यात सुमारे २८ लाख लहान-मोठी जनावरे असून त्यांना महिन्याकाठी सुमारे अडीच लाख मेट्रिक टन चाºयाची गरज भासते. प्रशासनाने चारा टंचाईवर उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध करणे आव्हान आहे. दुसरीकडे चाºयाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून चारा छावण्यांची मागणी होत आहे.पोलिसांनी मरकड यांना घेतले ताब्यातनिवडुंगे (ता़ पाथर्डी) येथे शरद मरकड व शेतक-यांनी सुरु केलेल्या छावणीला पालकमंत्री राम शिंदे मंजुरी देत नाहीत, याच्या निषेधार्थ शेतकरी शनिवारी सकाळी आत्मदहन करणार आहेत, असा इशारा देवीदास खेडकर यांनी दिला आहे़ त्यांची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांची धावपळ उडाली़ पोलिसांनी रात्री शरद मरकड यांना ताब्यात घेतल्याचे समजते़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर