शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

अटी, शर्तीत अडकल्या चारा छावण्या :पोलिसांनी मरकड यांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 12:29 IST

दुष्काळामुळे पशुधन वाचवण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु त्यात घातलेल्या जाचक अटी व शर्तींमुळे छावण्या मंजुरीत अडथळेच अधिक येत आहेत.

अहमदनगर : दुष्काळामुळे पशुधन वाचवण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु त्यात घातलेल्या जाचक अटी व शर्तींमुळे छावण्या मंजुरीत अडथळेच अधिक येत आहेत. प्रशासन पक्षपातीपणे केवळ सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांना छावण्या मंजूर करत आहे, असा आरोप जिल्ह्यात झाला आहे.जिल्ह्यात छावण्यांसाठी सहाशे अर्ज आले होते. त्यापैकी २२ अर्ज प्रशासनाने आतापर्यंत मंजूर केले आहेत. जे अर्ज मंजूर केले त्यास नेमके कोणते निकष लावले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासन पालकमंत्र्यांच्या दबावाखाली भाजपशी जवळीक असलेल्या कार्यकर्त्यांना छावण्या वाटप करत आहे, असा थेट आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शरद मरकड यांनी केला आहे.‘लोकमत’शी बोलताना मरकड म्हणाले, छावणीऐवजी दावणीला अनुदान द्या, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी होती. मात्र, प्रशासनाला छावण्याच हव्या आहेत. आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यात निवडुंगे येथे जनतेकडून देणगी मिळवून छावणी सुरु केली. तिच्यात दोनशे जनावरे आहेत. खासदार राजू शेट्टी यांनी स्वत: या छावणीला कोल्हापूर येथून एक लाख रुपयांचा चारा आणला.दरम्यानच्या काळात छावण्या सुरु करण्याचे धोरण सरकारने घेतले. आम्ही निकषात बसत असल्याने अर्ज केला. मात्र, प्रशासन आमच्या छावणीला अनुदान द्यायला तयार नाही. ज्यांनी अद्याप छावणीच सुरु केलेली नाही त्या संस्थांना मंजुरी मात्र, आम्ही छावणी चालवत असतानाही मंजुरी नाही. प्रशासन असे पक्षपातीपणे वागत आहे. छावण्यांची वाटप प्रक्रिया पारदर्शी नाही. छावण्यांसाठी आमदार, पालकमंत्री यांच्या शिफारशी कशासाठी हव्या आहेत? तुम्हाला शेतकऱ्याला मदत करायची आहे की त्यांना लाचार बनवून नेत्यांच्या व अधिका-यांच्या दारात उभे करायचे आहे, असा थेट प्रश्न मरकड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.काय आहेत किचकट अटी ?शासनाने महिनाभरापूर्वी छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु छावणी सुरू करण्यासाठी अटी-शर्तींचीच मोठी यादी आहे. एका छावणीत जास्तीत जास्त ५०० जनावरे दाखल करता येतील, अशी अट आहे. गावात ५०० पेक्षा जास्त जनावरे असतील तर गावात दुसरी छावणी मंजूर करता येईल की नाही? याबाबतचा उल्लेख शासन आदेशात नाही. एकाच गावातून अनेक प्रस्ताव असल्याने गोंधळ उडाला आहे.छावणी मंजुरीचे अधिकार पालकमंत्र्यांकडे दिले आहेत. पालकमंत्री यासाठी आमदारांची शिफारस मागत आहेत. केवळ सत्ताधारी कार्यकर्त्यांना छावण्या मंजूर होत असल्याचा आरोप सुरु झाला आहे. छावणी सुरु करण्यासाठी सदर संस्थेकडे दहा लाख रुपये रक्कम खात्यावर जमा असणे आवश्यक आहे.अडीच महिनेच छावण्यादुष्काळाचा एक महिना तर सरला आहे. अजून तीन महिने दुष्काळाची तीव्रता जाणवेल. मे महिन्याच्या मध्यापासूनच शेतकरी मशागतीची कामे करतात. त्यासाठी ते छावणीतून जनावरे घेऊन जातात. त्यामुळे मार्चपासून छावण्या सुरू झाल्या तर पुढे अवघ्या अडीच महिन्यांचा कालावधी उरतो. मागील सरकारने सहा-सात महिने छावण्या चालवल्या, या सरकारला दोन-तीन महिनेच छावण्या चालवायच्या आहेत. परंतु त्याही अद्याप सुरू होईनात, अशी तीव्र भावना शेतकरी व्यक्त करत आहेतअडीच लाख मेट्रिक टन चा-याची गरजगेल्या १६ महिन्यापासून जिल्ह्यात पाऊस नाही. जिल्ह्यात सुमारे २८ लाख लहान-मोठी जनावरे असून त्यांना महिन्याकाठी सुमारे अडीच लाख मेट्रिक टन चाºयाची गरज भासते. प्रशासनाने चारा टंचाईवर उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध करणे आव्हान आहे. दुसरीकडे चाºयाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून चारा छावण्यांची मागणी होत आहे.पोलिसांनी मरकड यांना घेतले ताब्यातनिवडुंगे (ता़ पाथर्डी) येथे शरद मरकड व शेतक-यांनी सुरु केलेल्या छावणीला पालकमंत्री राम शिंदे मंजुरी देत नाहीत, याच्या निषेधार्थ शेतकरी शनिवारी सकाळी आत्मदहन करणार आहेत, असा इशारा देवीदास खेडकर यांनी दिला आहे़ त्यांची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांची धावपळ उडाली़ पोलिसांनी रात्री शरद मरकड यांना ताब्यात घेतल्याचे समजते़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर