शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
5
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
6
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
7
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
8
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
9
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
10
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
11
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
12
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
13
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
14
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
15
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
16
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
17
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
18
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
19
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
20
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

अटी, शर्तीत अडकल्या चारा छावण्या :पोलिसांनी मरकड यांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 12:29 IST

दुष्काळामुळे पशुधन वाचवण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु त्यात घातलेल्या जाचक अटी व शर्तींमुळे छावण्या मंजुरीत अडथळेच अधिक येत आहेत.

अहमदनगर : दुष्काळामुळे पशुधन वाचवण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु त्यात घातलेल्या जाचक अटी व शर्तींमुळे छावण्या मंजुरीत अडथळेच अधिक येत आहेत. प्रशासन पक्षपातीपणे केवळ सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांना छावण्या मंजूर करत आहे, असा आरोप जिल्ह्यात झाला आहे.जिल्ह्यात छावण्यांसाठी सहाशे अर्ज आले होते. त्यापैकी २२ अर्ज प्रशासनाने आतापर्यंत मंजूर केले आहेत. जे अर्ज मंजूर केले त्यास नेमके कोणते निकष लावले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासन पालकमंत्र्यांच्या दबावाखाली भाजपशी जवळीक असलेल्या कार्यकर्त्यांना छावण्या वाटप करत आहे, असा थेट आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शरद मरकड यांनी केला आहे.‘लोकमत’शी बोलताना मरकड म्हणाले, छावणीऐवजी दावणीला अनुदान द्या, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी होती. मात्र, प्रशासनाला छावण्याच हव्या आहेत. आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यात निवडुंगे येथे जनतेकडून देणगी मिळवून छावणी सुरु केली. तिच्यात दोनशे जनावरे आहेत. खासदार राजू शेट्टी यांनी स्वत: या छावणीला कोल्हापूर येथून एक लाख रुपयांचा चारा आणला.दरम्यानच्या काळात छावण्या सुरु करण्याचे धोरण सरकारने घेतले. आम्ही निकषात बसत असल्याने अर्ज केला. मात्र, प्रशासन आमच्या छावणीला अनुदान द्यायला तयार नाही. ज्यांनी अद्याप छावणीच सुरु केलेली नाही त्या संस्थांना मंजुरी मात्र, आम्ही छावणी चालवत असतानाही मंजुरी नाही. प्रशासन असे पक्षपातीपणे वागत आहे. छावण्यांची वाटप प्रक्रिया पारदर्शी नाही. छावण्यांसाठी आमदार, पालकमंत्री यांच्या शिफारशी कशासाठी हव्या आहेत? तुम्हाला शेतकऱ्याला मदत करायची आहे की त्यांना लाचार बनवून नेत्यांच्या व अधिका-यांच्या दारात उभे करायचे आहे, असा थेट प्रश्न मरकड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.काय आहेत किचकट अटी ?शासनाने महिनाभरापूर्वी छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु छावणी सुरू करण्यासाठी अटी-शर्तींचीच मोठी यादी आहे. एका छावणीत जास्तीत जास्त ५०० जनावरे दाखल करता येतील, अशी अट आहे. गावात ५०० पेक्षा जास्त जनावरे असतील तर गावात दुसरी छावणी मंजूर करता येईल की नाही? याबाबतचा उल्लेख शासन आदेशात नाही. एकाच गावातून अनेक प्रस्ताव असल्याने गोंधळ उडाला आहे.छावणी मंजुरीचे अधिकार पालकमंत्र्यांकडे दिले आहेत. पालकमंत्री यासाठी आमदारांची शिफारस मागत आहेत. केवळ सत्ताधारी कार्यकर्त्यांना छावण्या मंजूर होत असल्याचा आरोप सुरु झाला आहे. छावणी सुरु करण्यासाठी सदर संस्थेकडे दहा लाख रुपये रक्कम खात्यावर जमा असणे आवश्यक आहे.अडीच महिनेच छावण्यादुष्काळाचा एक महिना तर सरला आहे. अजून तीन महिने दुष्काळाची तीव्रता जाणवेल. मे महिन्याच्या मध्यापासूनच शेतकरी मशागतीची कामे करतात. त्यासाठी ते छावणीतून जनावरे घेऊन जातात. त्यामुळे मार्चपासून छावण्या सुरू झाल्या तर पुढे अवघ्या अडीच महिन्यांचा कालावधी उरतो. मागील सरकारने सहा-सात महिने छावण्या चालवल्या, या सरकारला दोन-तीन महिनेच छावण्या चालवायच्या आहेत. परंतु त्याही अद्याप सुरू होईनात, अशी तीव्र भावना शेतकरी व्यक्त करत आहेतअडीच लाख मेट्रिक टन चा-याची गरजगेल्या १६ महिन्यापासून जिल्ह्यात पाऊस नाही. जिल्ह्यात सुमारे २८ लाख लहान-मोठी जनावरे असून त्यांना महिन्याकाठी सुमारे अडीच लाख मेट्रिक टन चाºयाची गरज भासते. प्रशासनाने चारा टंचाईवर उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध करणे आव्हान आहे. दुसरीकडे चाºयाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून चारा छावण्यांची मागणी होत आहे.पोलिसांनी मरकड यांना घेतले ताब्यातनिवडुंगे (ता़ पाथर्डी) येथे शरद मरकड व शेतक-यांनी सुरु केलेल्या छावणीला पालकमंत्री राम शिंदे मंजुरी देत नाहीत, याच्या निषेधार्थ शेतकरी शनिवारी सकाळी आत्मदहन करणार आहेत, असा इशारा देवीदास खेडकर यांनी दिला आहे़ त्यांची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांची धावपळ उडाली़ पोलिसांनी रात्री शरद मरकड यांना ताब्यात घेतल्याचे समजते़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर