शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पीकविम्याची मुदत वाढली, शेतकऱ्यांना दिलासा, आमदार काळेंची मागणी मान्य

By सचिन धर्मापुरीकर | Updated: July 31, 2023 21:38 IST

अनेक शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे पिक विम्याचे अर्ज भरू शकले नव्हते

सचिन धर्मापुरीकर, कोपरगाव (जि. अहमदनगर): कोपरगाव मतदार संघातील अनेक शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे पिक विम्याचे अर्ज भरू शकले नाहीत. त्यातच पिक विमा अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै पर्यंतच असल्यामुळे असंख्य शेतकरी विम्यापासून वंचित राहणार होते. त्यामुळे पीक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी दि.२८ जुलै रोजी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून पीक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत ३ ऑगस्ट पर्यंत वाढविली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिलीं आहे. 

चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले असून राज्य शासनाने यावर्षी पासून 'सर्वसमावेशक पीक विमा योजना' राबविण्याच्या घेतलेल्या  निर्णयानुसार शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासन भरणार असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करून पीक विम्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे. पिक विमा अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै पर्यंतच देण्यात आलेली होती. परंतु पिक विमा अर्ज भरण्यासाठी सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे मतदार संघातील ६० हजाराच्यावर शेतकरी पिक विमा अर्ज भरू शकले नव्हते. जर पिक विमा अर्ज मुदतीत भरला गेला नाही तर हजारो शेतकरी पीक विम्याला मुकणार होते. त्यामुळे पिक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी आ. आशुतोष काळे यांनी मागील आठवड्यात राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे मांडल्या होत्या. 

त्या पत्राची दखल घेवून शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींची जाणीव ठेवून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून देवून हि मुदत ३ ऑगस्ट पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पिक विम्याचा अर्ज भरलेला नाही त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पिक विम्याचा अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिक विमा अर्ज भरून द्यावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे. पिक विमा अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून दिल्याबद्दल मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी