शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांचा पुण्यात आयुक्त कार्यालयावर महामोर्चा; नवभारत साक्षरता सर्वेक्षणाला विरोध

By चंद्रकांत शेळके | Updated: December 27, 2023 20:00 IST

केंद्र व राज्य सरकारने नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षणाचे काम राज्यातील प्राथमिक शिक्षकांना देऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा सपाटा लावला आहे.

अहमदनगर : केंद्र व राज्य सरकारने नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षणाचे काम राज्यातील प्राथमिक शिक्षकांना देऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा सपाटा लावला आहे. हे काम राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी नाकारले असतानाही शिक्षण संचालक मात्र धमकीवजा आदेश देतात. या विरोधात राज्यातील २४ संघटनांच्या प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने बुधवारी शिक्षण आयुक्तालयावर महामोर्चा काढला. शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे सरचिटणीस कल्याण लवांडे, नपा मनपा शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोळी व इतर प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

नवभारत साक्षरता अभियान आता कालबाह्य झाले आहे. त्याच्यावर आपली शक्ती खर्च करण्याऐवजी केंद्र व राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. शाळांमधून विविध उपक्रम राबविण्यात यावेत. नवभारत साक्षरतेचे काम २०२७ पर्यंत चालणार आहे. शिक्षक जर या कामाला जुंपला गेला तर त्याचे शालेय अध्यापनाकडे दुर्लक्ष होऊन भावी पिढीचे नुकसान होणार आहे. म्हणून हे काम शिक्षकांना देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा होता. त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करावी, नगरपालिका शिक्षकांना शंभर टक्के वेतन अनुदान द्यावे या व इतर अनेक प्रमुख मागण्यांच्या संदर्भात देखील मोर्चातर्फे निवेदन देण्यात आले. शिक्षण संचालक (योजना) महेश पालकर यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना केंद्र व राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTeacherशिक्षक