शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांचा पुण्यात आयुक्त कार्यालयावर महामोर्चा; नवभारत साक्षरता सर्वेक्षणाला विरोध

By चंद्रकांत शेळके | Updated: December 27, 2023 20:00 IST

केंद्र व राज्य सरकारने नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षणाचे काम राज्यातील प्राथमिक शिक्षकांना देऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा सपाटा लावला आहे.

अहमदनगर : केंद्र व राज्य सरकारने नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षणाचे काम राज्यातील प्राथमिक शिक्षकांना देऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा सपाटा लावला आहे. हे काम राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी नाकारले असतानाही शिक्षण संचालक मात्र धमकीवजा आदेश देतात. या विरोधात राज्यातील २४ संघटनांच्या प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने बुधवारी शिक्षण आयुक्तालयावर महामोर्चा काढला. शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे सरचिटणीस कल्याण लवांडे, नपा मनपा शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोळी व इतर प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

नवभारत साक्षरता अभियान आता कालबाह्य झाले आहे. त्याच्यावर आपली शक्ती खर्च करण्याऐवजी केंद्र व राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. शाळांमधून विविध उपक्रम राबविण्यात यावेत. नवभारत साक्षरतेचे काम २०२७ पर्यंत चालणार आहे. शिक्षक जर या कामाला जुंपला गेला तर त्याचे शालेय अध्यापनाकडे दुर्लक्ष होऊन भावी पिढीचे नुकसान होणार आहे. म्हणून हे काम शिक्षकांना देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा होता. त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करावी, नगरपालिका शिक्षकांना शंभर टक्के वेतन अनुदान द्यावे या व इतर अनेक प्रमुख मागण्यांच्या संदर्भात देखील मोर्चातर्फे निवेदन देण्यात आले. शिक्षण संचालक (योजना) महेश पालकर यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना केंद्र व राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTeacherशिक्षक