शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

शिक्षक बँक मयत सभासदांच्या कुटुंबांना देणार आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:22 IST

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांची कामधेनू आहे. या बँकेने शिक्षकांचे प्रपंच आणि ...

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांची कामधेनू आहे. या बँकेने शिक्षकांचे प्रपंच आणि शिक्षकांची प्रतिष्ठा उंचावण्याचे काम केलेले आहे. शिक्षक बँकेच्या योजनांचे अनुकरण राज्यात केले जाते. यावर्षी कोरोनामुळे मोठ्या संख्येने सभासद मृत्यूमुखी पडले. बँकेच्या कुटुंब आधार योजनेतून १० लाख तसेच मयत निधीतून पाच लाख रुपयांची मदत दिवंगत सभासदांच्या वारसांना देण्यात येणार आहे, अशी माहिती गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनी सांगितले.

शिक्षक बँकेतर्फे दिवंगत सभासदांच्या वारसांना कुटुंब आधार निधीतून दहा लाख रुपये व मयत सभासद कर्ज निवारण निधीतून पाच लाख रुपये अशी पंधरा लाखाची भरीव मदत केली जाते. हे दोन्ही निधी सभासदांनी निर्माण केलेले आहेत. यामध्ये बँकेची कोणतीही भूमिका नाही. बँक फक्त वसुली आणि वितरण मध्यस्थ म्हणून काम करते. कुटुंब आधार निधी दरमहा गोळा होतो व त्यातून दरमहा मदत दिली जाते. या निधीमध्ये कोणतीही रक्कम शिल्लक नाही. त्यामुळे कुटुंब आधार निधीमध्ये निधी उपलब्ध करण्यासाठी वार्षिक सभेत पोट नियम दुरुस्ती केली जाणार आहे. कर्ज निवारण निधीमधून सभासदांचे सर्व कर्ज माफ करून वारसांना पाच लाख रुपये मदत दिली जाते. एक एप्रिल रोजी या निधीमध्ये ३ कोटी ३० लाख रुपये शिल्लक होते, त्यातून आतापर्यंत २९ सभासदांचे ३ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. कोरोना संकटामुळे मागील तीन महिन्यांमध्ये बँकेचे ६० सभासद दिवंगत झाले आहेत. चालू आर्थिक वर्षातील आठ महिने अजून शिल्लक आहेत. दरवर्षी सरासरी १८ ते २० सभासद मृत्यूमुखी पडतात. मात्र कोरोना लाटेने ही संख्या तिप्पट झाली आहे. सर्वांचे कर्ज माफ करून पाच लाख रुपयांची मदत व कुटुंब आधाराची दहा लाख रुपयांची मदत देण्यासाठी एकूण १२ कोटी रुपयांची तर कर्ज माफीसाठी ४ कोटी रुपये असे एकूण १६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सध्या बँकेकडे सव्वातीन कोटी रुपये उपलब्ध आहेत. कमी पडणारा निधी सभासदांकडून उभारावा लागणार आहे. याबाबत जिल्ह्यातील सभासदांशी विचारविनिमय सुरू असून सर्व सभासद निधी देण्यास अनुकूल आहेत. त्यामुळे वार्षिक सभेत निर्णय घेऊन सभासदांच्या वारसांना मदत निश्चित दिली जाणार आहे. कोरोनामुळे कुटुंबातील कर्ती माणसं अचानकपणे निघून गेली आहेत. त्यांना मदत करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. किमान या प्रश्नात तरी कोणीही गलिच्छ राजकारण करू नये, असे आवाहनही राजकुमार साळवे यांनी केले आहे.