शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
2
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
3
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
4
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
5
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
6
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
7
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
8
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
9
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
10
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
11
IND vs WI : बुमराहचा 'ट्रिपल फिफ्टी'चा रेकॉर्ड; वेळ घेतला; पण परफेक्ट यॉर्करसह साधला विकेटचा डाव
12
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
13
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
14
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन
15
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
16
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
17
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
18
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
19
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
20
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर

...तर टाटा, बिर्ला, अंबानी जिंकले असते-देवेंद्र फडणवीस; राम शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सिध्दटेकला सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 16:20 IST

समोर कितीही मोठा पैलवान असला तरी राम शिंदे हे त्यांना चितपट केल्याशिवाय सोडणार नाहीत. ही निवडणूक धनदांडग्याची नाही. पैशाच्या जोरावर निवडणुका झाल्या असत्या तर टाटा, बिर्ला, अंबानी, अदाणी हेही निवडणुका जिंकले असते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार कुटुंबीयांना लगावला.

सिध्दटेक : समोर कितीही मोठा पैलवान असला तरी राम शिंदे हे त्यांना चितपट केल्याशिवाय सोडणार नाहीत. ही निवडणूक धनदांडग्याची नाही. पैशाच्या जोरावर निवडणुका झाल्या असत्या तर टाटा, बिर्ला, अंबानी, अदाणी हेही निवडणुका जिंकले असते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार कुटुंबीयांना लगावला.कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या कर्जत तालुक्यातील सिध्दटेक येथील प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी खासदार सुजय विखे, आमदार सुरेश धस, राजेंद्र नागवडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. फडणवीस पुढे म्हणाले, राम शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातील घडलेले नेतृत्व आहे. ते शिकले, प्राध्यापक झाले. त्यानंतर आमदार, मंत्री झाले. त्यांनी अत्यंत चांगले काम केले. कोणी त्यांच्यावर नेतृत्व थोपविण्याचा प्रयत्न केला तर मतदारसंघातील जनता हे सहन करणार नाही. कारण ते सतत जनतेत असतात. याच जनतेच्या जोरावरच ते निवडणूक लढवित आहेत. गतवेळी ते ३८ हजार मतांनी निवडून आले होते. यावेळी त्यांना ५० हजार मतांनी निवडून द्या. विरोधक म्हणतात, मते द्या नाहीतर कारखान्याला ऊस नेणार नाही. पण शेतक-यांनी काळजी करु नये. रामभाऊ सरकार आपलेच आहे. नवीन कारखाना उभा करा, असे  आवाहन त्यांनी केले. आमचा रामभाऊ मोठा कलाकार माणूस आहे. हा काही साधा गडी नाही. तो भल्याभल्यांना पुरून उरला आहे. रामभाऊंनी शेतकºयांसाठी मोठी कामे केली. ३९०० कोटी रुपयांची कुकडी प्रकल्पाची कामे मार्गी लावली. तुकाई चारी योजना, शासकीय कृषी महाविद्यालय आणले, असे अनेक विकास  कामे त्यांनी मतदारसंघात केली आहेत. राज्यात सरकार भाजपचेच येणार आहे. यापुढेही ते याच पध्दतीने काम करीत राहतील. त्यांच्या मागे उभे रहा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.प्रा. राम शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री खास माझ्यासाठी प्रचार सभेला आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या निधीतून मतदारसंघात भरपूर कामे केली. हे काम करताना मी कोणाशी आकसाने वागलो नाही. सर्वांना समान न्याय दिला. त्यामुळेच मतदारसंघात विकास काम करू शकलो. सिध्दटेकला पर्यटन विकास निधी दिला. मतदारसंघात रस्ते केले. कर्जतला पाणी प्रश्न सोडविला. मिरजगावला १० कोटींची पाणी योजना राबविला. साठ सत्तर वर्षाचा विकासाचा अनुशेष आहे. भरपूर अनुशेष भरुन काढण्याचे काम केले. सरकारच्या सर्वसामान्यांच्या योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले. राष्टÑवादी काँग्रसला माझ्या विरोधात मतदारसंघात उमेदवार मिळाला नाही. उमेदवार आयात करावा लागला, हीच मोठी खंत आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019