शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

...तर टाटा, बिर्ला, अंबानी जिंकले असते-देवेंद्र फडणवीस; राम शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सिध्दटेकला सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 16:20 IST

समोर कितीही मोठा पैलवान असला तरी राम शिंदे हे त्यांना चितपट केल्याशिवाय सोडणार नाहीत. ही निवडणूक धनदांडग्याची नाही. पैशाच्या जोरावर निवडणुका झाल्या असत्या तर टाटा, बिर्ला, अंबानी, अदाणी हेही निवडणुका जिंकले असते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार कुटुंबीयांना लगावला.

सिध्दटेक : समोर कितीही मोठा पैलवान असला तरी राम शिंदे हे त्यांना चितपट केल्याशिवाय सोडणार नाहीत. ही निवडणूक धनदांडग्याची नाही. पैशाच्या जोरावर निवडणुका झाल्या असत्या तर टाटा, बिर्ला, अंबानी, अदाणी हेही निवडणुका जिंकले असते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार कुटुंबीयांना लगावला.कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या कर्जत तालुक्यातील सिध्दटेक येथील प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी खासदार सुजय विखे, आमदार सुरेश धस, राजेंद्र नागवडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. फडणवीस पुढे म्हणाले, राम शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातील घडलेले नेतृत्व आहे. ते शिकले, प्राध्यापक झाले. त्यानंतर आमदार, मंत्री झाले. त्यांनी अत्यंत चांगले काम केले. कोणी त्यांच्यावर नेतृत्व थोपविण्याचा प्रयत्न केला तर मतदारसंघातील जनता हे सहन करणार नाही. कारण ते सतत जनतेत असतात. याच जनतेच्या जोरावरच ते निवडणूक लढवित आहेत. गतवेळी ते ३८ हजार मतांनी निवडून आले होते. यावेळी त्यांना ५० हजार मतांनी निवडून द्या. विरोधक म्हणतात, मते द्या नाहीतर कारखान्याला ऊस नेणार नाही. पण शेतक-यांनी काळजी करु नये. रामभाऊ सरकार आपलेच आहे. नवीन कारखाना उभा करा, असे  आवाहन त्यांनी केले. आमचा रामभाऊ मोठा कलाकार माणूस आहे. हा काही साधा गडी नाही. तो भल्याभल्यांना पुरून उरला आहे. रामभाऊंनी शेतकºयांसाठी मोठी कामे केली. ३९०० कोटी रुपयांची कुकडी प्रकल्पाची कामे मार्गी लावली. तुकाई चारी योजना, शासकीय कृषी महाविद्यालय आणले, असे अनेक विकास  कामे त्यांनी मतदारसंघात केली आहेत. राज्यात सरकार भाजपचेच येणार आहे. यापुढेही ते याच पध्दतीने काम करीत राहतील. त्यांच्या मागे उभे रहा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.प्रा. राम शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री खास माझ्यासाठी प्रचार सभेला आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या निधीतून मतदारसंघात भरपूर कामे केली. हे काम करताना मी कोणाशी आकसाने वागलो नाही. सर्वांना समान न्याय दिला. त्यामुळेच मतदारसंघात विकास काम करू शकलो. सिध्दटेकला पर्यटन विकास निधी दिला. मतदारसंघात रस्ते केले. कर्जतला पाणी प्रश्न सोडविला. मिरजगावला १० कोटींची पाणी योजना राबविला. साठ सत्तर वर्षाचा विकासाचा अनुशेष आहे. भरपूर अनुशेष भरुन काढण्याचे काम केले. सरकारच्या सर्वसामान्यांच्या योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले. राष्टÑवादी काँग्रसला माझ्या विरोधात मतदारसंघात उमेदवार मिळाला नाही. उमेदवार आयात करावा लागला, हीच मोठी खंत आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019