शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

कांद्याचा फास लटकवून शेतकऱ्यांचे प्रतीकात्मक आंदोलन

By admin | Updated: May 23, 2016 01:14 IST

अहमदनगर : दुष्काळी स्थितीत अल्प पाण्यावर घेतलेल्या कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दिल्लीगेट वेशीला कांद्याचा फास लटकवून आक्रोश आंदोलन केले.

अहमदनगर : जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना, दुष्काळी स्थितीत अल्प पाण्यावर घेतलेल्या कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दिल्लीगेट वेशीला कांद्याचा फास लटकवून आक्रोश आंदोलन केले. यावेळी उपस्थित कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, राज्यसरकारने एकाधिकार पध्दतीने कांदा खरेदी करुन तो निर्यात करावा व कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, आदी मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या. आंदोलनात कांद्याच्या गडगडलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचा वाढणाऱ्या आत्महत्येचा जीवंत देखावा सादर करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात अ‍ॅड.कारभारी गवळी, पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे, जालिंदर बोरुडे, सुधीर भद्रे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, वीर बहादूर प्रजापती, दिलीप वाकळे, बाळासाहेब सुंबे, कान्हू सुंबे, ओम कदम, संजय सोंडकर, मंदाताई जरे, बाबासाहेब जरे, भानुदास आवारी आदींसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाजारात भाव गडगडल्याने कर्ज काढून लावलेल्या कांद्याला भाव मिळत नसल्याने घेतलेले कर्ज फेडायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. कांद्याच्या भावाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. चाऱ्याच्या स्वरुपात कांदा जनावरांपुढे टाकण्याची नामुष्की ओढवली असून सरकारने निर्णयात्मक पाऊल न उचलल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार असल्याचे अ‍ॅड.गवळी यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना कांद्याच्या कमी भावाच्या ओढवलेल्या संकटातून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने त्वरित निर्णय घेऊन कांद्याला १५ ते २० रुपये किलो भाव देणे गरजेचे असल्याची मागणी सुधीर भद्रे यांनी केली. (प्रतिनिधी)