शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पिंपरी जलसेनच्या थालीपीठाची पुणे-मुंबईकरांना गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 16:04 IST

पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेनमधील बचत गटातील महिलांना एकत्र येऊन सुरू केलेल्या पौष्टिक आहार थालीपीठासाठी लागणाºया ‘पीठा’ची पुण्या-मुंबईमधील खवय्यांना गोडी लागली आहे.

विनोद गोळे । 

पारनेर : तालुक्यातील पिंपरी जलसेनमधील बचत गटातील महिलांना एकत्र येऊन सुरू केलेल्या पौष्टिक आहार थालीपीठासाठी लागणाºया ‘पीठा’ची पुण्या-मुंबईमधील खवय्यांना गोडी लागली आहे.

पिंपरी जलसेन गावात महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके व गीतांजली शेळके यांनी ग्रामस्थांना एकत्र करून जलसंधारण चळवळ राबविली. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत हे गाव राज्यात दुसरे आले. याच धर्तीवर गीतांजली शेळके यांनी महिला, युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेतला. अनेकांशी चर्चा केली. त्यातून ग्रामीण महिलांना सोपे ठरणारे आणि यातून उद्योगाला चालना देणारे आहारात पौष्टिक असणाºया थालीपीठासाठी लागणारे ‘पीठ’ तयार करण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रत्येकी पाचशे रूपये भांडवलात सुरू झाला उद्योग..गीतांजली शेळके यांनी महिलांना थालीपीठासाठीचे पीठ बनविण्याच्या प्रयोगाबाबत माहिती दिली. त्यांनी थालीपीठ खाताना स्वादिष्ट होण्यासाठी आई रोहिणी माधव देशमुख यांच्याकडून पीठ बनविताना काय-काय पदार्थ कशा पद्धतीने टाकायचे याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर स्वत: महिलांना प्रशिक्षण दिले. मग नवलाई बचत गटाच्या प्रतिभा बोरुडे, राहत पठाण, सोनाली पुणेकर, प्रवीण गायकवाड, वंदना वाढवणे, वृषाली काळे, सविता शिंदे, शबाना शेख, अंजली गाडेकर, सुनीता थोरात, रतन सोनवणे यांनी प्रत्येकी ५०० रूपये जमा करून थालीपीठचे पीठ बनविण्यासाठी धान्य व विविध वस्तू खरेदी केल्या. त्यानंतर प्रत्यक्ष पीठ बनविणे सुरू केले. शेळके यांनी प्राथमिक स्तरावर याची पाकिटे पुण्या-मुंबईत दिली. त्याची विक्री होऊन मागणी वाढली. त्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर त्याची निर्मिती सुरू केली. 

थालीपीठ पौष्टिक आहार आहे. त्याचे पीठ बनवून विक्री करणे सोपे आहे. त्यामुळे महिला, युवक, युवतींनी राज्यात चौका-चौकात असे थालीपीठ स्टॉल सुरू करावे, असा आमचा प्रयत्न आहे. वडापाव, इडली-डोसा विक्रीच्या धर्तीवर या माध्यमातून राज्यात हजारो जणांना यातून रोजगार मिळेल.-गीतांजली शेळके, प्रमुख, थालीपीठ उद्योग केंद्र

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरSocialसामाजिक