शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
6
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
7
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
8
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
9
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
10
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
12
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
13
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
14
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
15
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
16
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
17
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
18
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
19
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
20
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा उन्हाळा राहील सौम्य- प्रा.बी.एन.शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 13:36 IST

गेल्या वर्षी असह्य ठरलेला उन्हाळा तुलनेत यावर्षी सौम्य राहील. यंदा पावसाचे  प्रमाण चांगले असल्याने बागायती पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली. ओसाड जमीन गवताने व्यापली. त्यामुळे यंदाचे तापमान काहिसे कमी राहील.

संडे मुलाखत-चंद्रकांत शेळकेअहमदनगर : गेल्या वर्षी असह्य ठरलेला उन्हाळा तुलनेत यावर्षी सौम्य राहील. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने बागायती पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली. ओसाड जमीन गवताने व्यापली. त्यामुळे यंदाचे तापमान काहिसे कमी राहील. सध्या हवेत असलेला सौम्य गारवाही दोन-तीन दिवसांत ओसरेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ बी. एन. शिंदे यांनी ‘लोकमत संवाद’मध्ये व्यक्त केला आहे.  तापमान का वाढते?गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली. परिणामी जमीन तापण्यास मोठा कालावधी मिळाला. त्यामुळे उन्हाळ्यात तापमान ४५ अंशापर्यंत पोहोचले. साधारण उन्हाळ्यात पिके नसल्याने, तसेच माळरानावर गवत नसल्याने सूर्यप्रकाश थेट जमिनीत खोलपर्यंत जाऊन जमीन तापते. शिवाय उन्हाळ्यात नांगरट झाल्याने काळी जमीन वर येऊन आणखी उष्णता खेचते. त्यातून तापमान वाढते. पाण्याच्या उपलब्धतेबाबत?त्या तुलनेत यंदा पाऊस चांगला झाला आहे. ठिकठिकाणी जलाशय भरले असून रब्बी पिकांची स्थिती चांगली आहे. एकूणच बागायती क्षेत्र वाढले. शिवाय पावसामुळे पडिक जमिनीवर गवत मोठ्या प्रमाणावर उगवले. एकंदरीत जमीन मोठ्या प्रमाणावर आच्छादित झाली.  त्यामुळे उन्हाळ्यात सूर्यकिरणे थेट जमिनीवर न पडता या अडथळ्यांवर पडत आहेत.  बागायती पिकांची काढणी झाली तरी पाण्याची उपलब्धता असल्याने एप्रिल, मे या महिन्यांत उन्हाळी पिके किंवा चारापिके घेतली जातात. त्यामुळे बहुतांश जमीन आच्छादीतच राहील. पडिक जमिनीवरील गवत वाळेल व त्याचा रंग सोनेरी पांढरा पडेल. या रंगातून जास्त उष्णता परावर्तित होते व ती जमिनीपर्यंत येत नाही. या कारणांमुळे यंदाचा उन्हाळा सौम्य राहणार आहे. परिणामी तापमान दोन ते तीन अंशाने कमी राहील, अशी माहिती शिंदे यांनी दिली. उन्हाळ्यात घराचा असा करा बचाव?उन्हाळ्यात स्लॅबची घरे तापल्याने रात्री प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतो. यापासून बचावासाठी काही उपाय शिंदे यांनी सांगितले आहेत.  स्लॅबच्या पृष्ठभागाला चुना मारावा. चुन्यामुळे उष्णता परावर्तित होऊन ६० टक्के फरक जाणवेल. याहीपुढे या चुन्यावर सायंकाळी चारनंतर तासाभराच्या अंतराने पाणी शिंपडले तर आणखी १० टक्के फरक जाणवेल. उकाड्यापासून कसा बचाव करायचा?परिणामी ७० ते ८० टक्के स्लॅब कमी तापेल. पाणी मारण्यासाठी मायक्रो स्प्रिंकलरची व्यवस्थाही करता येईल. याशिवाय घराच्या पश्चिमेकडील भिंत हिरव्या शेडनेटने किंवा वेलवर्गीय वनस्पर्तींनी झाकली तर भिंत उष्णतेपासून बचावेल.या काही उपाययोजना केल्यास उकाड्यापासून सहज बचाव होईल. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस