शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

यंदाचा उन्हाळा राहील सौम्य- प्रा.बी.एन.शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 13:36 IST

गेल्या वर्षी असह्य ठरलेला उन्हाळा तुलनेत यावर्षी सौम्य राहील. यंदा पावसाचे  प्रमाण चांगले असल्याने बागायती पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली. ओसाड जमीन गवताने व्यापली. त्यामुळे यंदाचे तापमान काहिसे कमी राहील.

संडे मुलाखत-चंद्रकांत शेळकेअहमदनगर : गेल्या वर्षी असह्य ठरलेला उन्हाळा तुलनेत यावर्षी सौम्य राहील. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने बागायती पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली. ओसाड जमीन गवताने व्यापली. त्यामुळे यंदाचे तापमान काहिसे कमी राहील. सध्या हवेत असलेला सौम्य गारवाही दोन-तीन दिवसांत ओसरेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ बी. एन. शिंदे यांनी ‘लोकमत संवाद’मध्ये व्यक्त केला आहे.  तापमान का वाढते?गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली. परिणामी जमीन तापण्यास मोठा कालावधी मिळाला. त्यामुळे उन्हाळ्यात तापमान ४५ अंशापर्यंत पोहोचले. साधारण उन्हाळ्यात पिके नसल्याने, तसेच माळरानावर गवत नसल्याने सूर्यप्रकाश थेट जमिनीत खोलपर्यंत जाऊन जमीन तापते. शिवाय उन्हाळ्यात नांगरट झाल्याने काळी जमीन वर येऊन आणखी उष्णता खेचते. त्यातून तापमान वाढते. पाण्याच्या उपलब्धतेबाबत?त्या तुलनेत यंदा पाऊस चांगला झाला आहे. ठिकठिकाणी जलाशय भरले असून रब्बी पिकांची स्थिती चांगली आहे. एकूणच बागायती क्षेत्र वाढले. शिवाय पावसामुळे पडिक जमिनीवर गवत मोठ्या प्रमाणावर उगवले. एकंदरीत जमीन मोठ्या प्रमाणावर आच्छादित झाली.  त्यामुळे उन्हाळ्यात सूर्यकिरणे थेट जमिनीवर न पडता या अडथळ्यांवर पडत आहेत.  बागायती पिकांची काढणी झाली तरी पाण्याची उपलब्धता असल्याने एप्रिल, मे या महिन्यांत उन्हाळी पिके किंवा चारापिके घेतली जातात. त्यामुळे बहुतांश जमीन आच्छादीतच राहील. पडिक जमिनीवरील गवत वाळेल व त्याचा रंग सोनेरी पांढरा पडेल. या रंगातून जास्त उष्णता परावर्तित होते व ती जमिनीपर्यंत येत नाही. या कारणांमुळे यंदाचा उन्हाळा सौम्य राहणार आहे. परिणामी तापमान दोन ते तीन अंशाने कमी राहील, अशी माहिती शिंदे यांनी दिली. उन्हाळ्यात घराचा असा करा बचाव?उन्हाळ्यात स्लॅबची घरे तापल्याने रात्री प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतो. यापासून बचावासाठी काही उपाय शिंदे यांनी सांगितले आहेत.  स्लॅबच्या पृष्ठभागाला चुना मारावा. चुन्यामुळे उष्णता परावर्तित होऊन ६० टक्के फरक जाणवेल. याहीपुढे या चुन्यावर सायंकाळी चारनंतर तासाभराच्या अंतराने पाणी शिंपडले तर आणखी १० टक्के फरक जाणवेल. उकाड्यापासून कसा बचाव करायचा?परिणामी ७० ते ८० टक्के स्लॅब कमी तापेल. पाणी मारण्यासाठी मायक्रो स्प्रिंकलरची व्यवस्थाही करता येईल. याशिवाय घराच्या पश्चिमेकडील भिंत हिरव्या शेडनेटने किंवा वेलवर्गीय वनस्पर्तींनी झाकली तर भिंत उष्णतेपासून बचावेल.या काही उपाययोजना केल्यास उकाड्यापासून सहज बचाव होईल. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस