शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सुजय विखे म्हणाले, ...तर मी खासदारकीचा राजीनामा देतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 17:33 IST

 केंद्र सरकारने जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन विश्वासात घेत नसेल तर मी खासदारकीचा राजीनामा देतो, असे वक्तव्य खासदार डॉ.सुजय विखे यांनी रविवारी (२ आॅगस्ट) येथे केले.

अहमदनगर :  केंद्र सरकारने जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन विश्वासात घेत नसेल तर मी खासदारकीचा राजीनामा देतो, असे वक्तव्य खासदार डॉ.सुजय विखे यांनी रविवारी (२ आॅगस्ट) येथे केले.

 विकासवर्धिनी संस्थेच्या वतीने आयोजित आॅनलाईन नागरी संवाद या कार्यक्रमात खासदार विखे बोलत होते. डॉ. सुजय विखे यांनी जिल्हाधिका-यांच्या कारभारावर यावेळी टीका केली. 

नगर जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. परंतु प्रशासनाकडून कुठलीही तयारी केली गेली नाही. केंद्र शासनाकडून १८ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यापैकी चार कोटी रुपये नवीन कर्मचा-यांची भरती करण्यासाठी आहे. परंतु अद्याप एकाही कर्मचा-यांची भरती केली गेली नाही. मी स्वत: लक्ष घातले. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आयसीयू सेंटर उभे राहिले. त्याचबरोबर महापालिकेशी करार करून कोवीड चाचणी सेंटर सुरू केले. त्यामुळे हा आकडा वाढला आहे, असे ते म्हणाले.

 नाशिक, पुणे, मालेगाव आदी शहरांमध्ये जाऊन त्या काळात अधिकाधिक कोरोनाच्या चाचण्या केल्या गेल्या. त्यामुळे तेथील पीक पिरेड आता संपला आहे. तेथील रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. नगर जिल्ह्यात मात्र लॉकडाऊन शिथील केल्यानंतर रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेतले जात नाही. हा मुद्दा केंद्रीय मेडिकल समितीच्या वैद्यकीय समितीच्या बैठकीत मी मांडणार आहे, असेही खासदार विखे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याSujay Vikheसुजय विखेPoliticsराजकारण