शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

प्रसंगी कुटुंबाचा विरोध पत्करून खासदारकी लढविणार : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 10:53 IST

गत चार वर्षे लोकसभेची तयारी करीत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नगर लोकसभा लढविणार. काँग्रेसला हा मतदारसंघ सुटेल, अशी अपेक्षा आहे.

अहमदनगर : गत चार वर्षे लोकसभेची तयारी करीत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नगर लोकसभा लढविणार. काँग्रेसला हा मतदारसंघ सुटेल, अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास कुठल्याही पक्षातून निवडणूक लढविण्याची तयारी आहे. अगदी राष्ट्रवादी, शिवसेना,बसपा व भाजपसुद्धा. या प्रक्रियेत वडिलांची व आपली विचारधारा वेगळी झाली तरी नाईलाज आहे. कुटुंबाचा विरोध पत्करू पण खासदारकी लढवू. खासदारकीच्या माध्यमातून नगर शहराचे चित्र बदलवू. केवळ महापालिका विकास करु शकत नाही, असे डॉ. सुजय विखे यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत सांगितले.प्रश्न : दानवे यांनी शहराला तीनशे कोटी देऊ केले आहेत.विखे : गेल्या १५ वर्षात जे निधी देऊ शकले नाहीत, ते आता फलक लावून काय दिवे लावणार? सत्ता आली तरच निधी देऊ असे सांगणारे दानवे यांनी यापूर्वी त्यांच्या खासदाराला निधी का नाही दिला? सत्ता आली तरच विकास करणार का? मागच्या विधानसभा, महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांनी दिलेले जाहिरनामे वाचा आणि झालेली कामे पहा. एकही काम झाले नसेल. मग हे भाजप वचननामे,संकल्पनामे कशासाठी देत आहे? पंतप्रधान झाल्यानंतर प्रत्येकाला १५ लाख देऊ म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी पैसे दिले का? मग शहराला तीनशे कोटी देण्याबाबत काय भरवसा? राजकीय पक्षांचे जाहीरनामे लोकांच्या बेडखाली सापडतात किंवा रद्दीत जातात. त्यांना काहीही किंमत उरलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष काम करणे महत्त्वाचे आहे. भाजपने तसे काम शहरात दाखवावे मग मते मागावीत.केडगाव हत्याकांड व अधीक्षक कार्यालावरील हल्ल्याबाबत तुमचे मत काय?विखे: या दोन्ही घटना वाईट आहेत. शिवसैनिकांची झालेली हत्या दुर्देवी आहे. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेला हल्लाही वाईटच आहे. दहशत पसरविणाºयांवर जरुर कारवाई व्हावी. मात्र, या गुन्ह्यांत अनेकांना राजकीय आकसाने अडकविलेले दिसते. राजकारणामुळे लोकांवर गुन्हे दाखल होणे व त्यांना हद्दपार करणे चुकीचे आहे.नगरचा विकास का रखडला आहे?विखे: महापालिकेत आयुक्त टिकत नाहीत. कामगारांचे पगार नाहीत. पालिकेत टक्केवारी घेतल्याशिवाय कामे होत नाहीत. लोकांची मानसिकता बदलली तरच हे चित्र बदलेल. लोकांनी जात-धर्म न पाहता मतदान केले तरच हे शहर सुधारेल. नगरकरांनी दहशत झुगारणे व चांगले लोक निवडून देणे हाच विकासावरील पर्याय आहे. लोकही याला जबाबदार आहे.प्रश्न : तुमचा जाहीरनामा काय?विखे : मागील निवडणुकीचे वचननामे लोकांनी तपासावे. ते पन्नास टक्के पूर्ण नसतील तर लोकांनी अशा पक्षांना व उमेदवारांना नाकारावे. त्यामुळे घोषणांना काहीच अर्थ उरलेला नाही. नुसते जाहीरनामे काय उपयोगाचे?प्रश्न : जिल्ह्यातील किल्लेदार नगर शहराकडे पाहत नाहीत.विखे : असे काही नाही. विखे परिवाराने दक्षिणेत मोठे काम केले. स्थानिक लोकप्रतिनिधींना महत्त्व असते. नगरचे खासदार, आमदार यांनी नगरचा कायापालट करणे अभिप्रेत होते. आपण महापालिका व खासदारकीच्या माध्यमातून नगर शहरात लक्ष घालू शकतो. नगर शहराच्या विकासाला नैसर्गिक मर्यादाही आहेत. जुन्या शहरात गल्ल्या लहान आहेत. त्यामुळे उपनगरांचा विकास करणे आवश्यक आहे. पण, कॉंग्रेसकडे मर्यादीत संख्याबळ आहे. राष्टÑवादीच्या अजेंड्याला साथ देऊ.प्रश्न : तुम्ही किती सामान्य लोकांना उमेदवारी दिली?विखे : काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांनी चांगले काम केले. विद्यमान नगरसेवकांना तर उमेदवारी द्यावीच लागते. जे काही नवे उमेदवार आहेत, ते अगदी सामान्य घरातील आहेत. त्यांची घरेही अगदी साधी आहेत. राजकारण हे अर्थकारणाशी जोडून चालणार नाही. क्षमता जेवढी असेल तेवढी मदत करण्याची तयारी आहे. लोकांपर्यंत गेले तर पैशांपेक्षा आपुलकीला महत्त्व देतात. सातत्याने काम करणाºयांना लोक पुन्हा निवडून देतात. राहाता येथे एका कार्यकर्त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने मी त्याला संस्थेत काम दिले, मात्र लोकांनी त्याला राहाता नगरपालिकेत निवडून दिले. ते त्याच्या संपर्क आणि केवळ कामामुळेच. आज काल फिरायला कोणीच तयार नसल्याने जो तो पैशांचा वापर करतो. मात्र काम करणाºयांना कोणीच पाडू शकत नाही. काँग्रेसमधील गटबाजी युवक आघाडीच्या स्तरावर मिटली आहे. सत्यजित तांबे युवकचे प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी त्यांना पाठिंबा दिला. ज्येष्ठ ज्येष्ठांचे सांगतील. आमच्या पातळीवर मात्र वाद संपलेले आहेत.जिल्हा विभाजनाला माझा विरोध नाही. प्रत्येक तालुक्याला जिल्हा घोषित करा. मात्र जिल्हा विभाजनानंतर मोठा खर्च होणार आहे, त्याला माझा विरोध आहे. नव्या जिल्ह्यावर खर्च करण्याऐवजी तोच खर्च आता तालुक्यांच्या विकासासाठी केला पाहिजे.मराठा आरक्षण जाहीर होते, पेढे वाटले जातात, फटाके फोडले जातात. नंतर निवडणुका येतात आणि आरक्षण कोर्टात स्थगित होते. तेलंगणात लिंगायत समाजाला आरक्षण दिले, तिथेही काँग्रेसचे सरकार पुन्हा आले नाही. गतवेळी महाराष्ट्रातही काँग्रेस सरकारने १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पुढे राज्यातही काँग्रेसचे सरकार आले नाही. जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत एका कवडीचाही फायदा सरकारला होणार नाही. नगर शहरात जगताप- विखे यांची आघाडी नक्की राहील. मात्र लोकसभेला जगताप यांच्याविरुद्ध लढायची वेळ आली तरी त्याला काही पर्याय असणार नाही. माझ्या आजोबांपासून आ. कर्डिले यांचे संबंध आहेत. त्यांनी मला राहुरी कारखान्यात मदत केली. जिल्हा बँकेतून कर्ज मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पक्ष कोणताही असो जो माणूस पाच वेळा निवडून येतो, त्याअर्थी त्यांच्यात काहीतरी असले पाहिजे आणि ते शिकण्यासारखे आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका