शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखाने सुरूच होऊ देणार नाही

By admin | Updated: September 7, 2014 23:47 IST

अहमदनगर : तीन महिन्यांपासून राज्यातील ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियन बेमुदत संपावर आहे. मात्र, राज्य सरकार कामगारांसोबत वाटाघाटी करण्यास तयार नाही.

अहमदनगर : तीन महिन्यांपासून राज्यातील ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियन बेमुदत संपावर आहे. मात्र, राज्य सरकार कामगारांसोबत वाटाघाटी करण्यास तयार नाही. यामुळे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. सरकार जरी साखर कारखाने सुरू करण्याची घोषणा करत असले तरी कामगार युनियन कारखाने सुरूच होऊ देणार नसल्याचा इशारा युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी दिला.६५ वर्षापासून ज्या साखर कामगारांच्या जीवावर कारखानदारी उभी आहे, त्यांच्याकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे कामगारांचा प्रश्न चिघळला आहे. सरकार ऊस तोडणी हार्वेस्टरसाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देत आहे, मात्र, कामगारांचा १०० रुपयांचा विमा काढत नाही. हार्वेस्टरला ४०० रुपये प्रती टन तर कामगारांना १९० रूपये प्रती टन प्रमाणे पैसे देत आहेत. राज्यातील ऊस तोडणी कामगार तीन महिन्यांपासून संपावर आहेत. मात्र, सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसत आहे. सहकार मंत्री कारखाने सुरू करण्याची तारीख घोषित करत आहेत. मात्र, ऊस तोडणी कामगारच कारखाना सुरू करावयाचा की नाही, हे ठरविणार असल्याचे थोरे यांनी सांगितले आहे.ऊस तोडणी कामगार युनियनचे राज्यभर १५ ते १६ लाख सभासद असून ते तीन महिन्यांपासून काम बंद आंदोलनात सहभागी झालेले आहेत. सरकार अद्यापही चर्चेच्या तयारीत नसून यामुळे कारखाने आणि युनियनमध्ये करार होऊ शकलेला नसल्याचा आरोप थोरे यांनी केलेला आहे. यामुळे आंदोलनकर्त्यांकडून राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात आलेला ऊस तोडणी कामगार उन्नती प्रकल्प राज्यभर राबविण्याची मागणी युनियनचे अध्यक्ष थोरे यांनी केली आहे. तसेच शासनाने कामगारांना घरकुल योजनेचा लाभ देण्याची मागणी त्यांनी केली आहे.