शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाचा असाही वापर, शेतकरी गटाने ऑनलाईन विकला सहा लाखांचा भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 19:02 IST

लॉकडाऊनमुळे भाजीपाला विक्री बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे शेतात पडून आहेत. मात्र पिंपळगाव उजैनी येथील बी फार्मर शेतकरी गटाने भाजीपाला फळे आणि कडधान्याची ऑनलाईन विक्री केली. त्यामून या गटाला सहा लाखांचे उत्पन्न मिळाले.

अहमदनगर : लॉकडाऊनमुळे भाजीपाला विक्री बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे शेतात पडून आहेत. मात्र पिंपळगाव उजैनी येथील बी फार्मर शेतकरी गटाने भाजीपाला फळे आणि कडधान्याची ऑनलाईन विक्री केली. त्यामून या गटाला सहा लाखांचे उत्पन्न मिळाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. बाजार समित्यांसह भाजीपाला फळे विक्रीलाही बंदी आहे. नगर तालुक्यातील शेंडी, पोखर्डी, कापूरवाडी, पिंपळगाव उजैनी आदी गावातील शेतकरी भाजीपाला व फळांचे उत्पन्न घेतात. परंतु सध्या लॉकडाऊन असल्याने भाजीपाला विकता येत नाही. अशा कठीण परिस्थित पिंपळगाव उजैन येथील बी फार्मर या सेंद्रिय शेतकरी गटाने विक्री व्यावस्थापनाचे धडे घेत सोशल मिडियावरून शहरासह उपनगरातील नागिरकांकडून भाजीपाला फळे, कडधान्य आदींची ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. ग्राहकांच्या मागणीनुसार किट तयार करून ते त्यांना पोहोच करण्याचे काम सुरू केले. मागणी वाढत गेल्याने या गटाने आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी केला व त्याच्या किट बनविल्या. एका किटमध्ये साधारण आठ दिवस पुरेल इतका भाजीपाला दिला. जानेवारीपासून ऑनलाईन विक्री करण्यास सुरुवात केली. तेंव्हापासून आजपर्यंत ही विक्री सुरू असून, यातून सुमारे सहा लाख रुपयांची उलाढाल झाली. असे या गटाचे सचिव ज्ञानेश्वर वाघ यांनी सांगितले.

दर मंळवारी घरपोहोच भाजीपाला

सोमवार ते शनिवारपर्यंत सोशल मिडीयावर ग्राहकांकडून आर्डर घेण्यात आल्या. आठवडाभरात आलेल्या ऑर्डरची एकत्रित यादी तयार करून ग्राहकाच्या नावाने किट बनविण्यात आल्या. रविवारी ही यादी सोशल मिडीयावर शेतकऱ्यांना पाठविण्यात आली. यादीनुसार शेतकऱ्यांनी आपल्याकडील पालेभाज्या, कलिंगड, खरबूज, चिक्कू शेतकरी गटाकडे जमा केला. एकत्रित जमा झालेल्या भाजीपाला व फळांच्या किट तयार करून त्या ग्राहकांना थेट घरी पोहोच केल्या गेल्या. त्यात काही संस्थांनी मागणी नोंदविली. त्यामुळे मागणी वाढवून शेतकऱ्यांचा भाजीपाला विकला गेला.

परिसरातील शेतकऱ्यांचा भाजीपाला, कलिंगड , खरबूज खराब होऊ लागले. कमी भावात विक्री करावी लागत होती. त्यात सममित्राचे गणेश सानप यांची भेट झाली. त्यांनी विक्री व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच आत्माच्या अधिकाऱ्यांची माहिती दिली. सोशल मिडियावरील अनेक ग्रुप जॉईड झाले. यातूनच मागणी वाढवून चांगले उत्पन्न मिळाले.

- ज्ञानेश्वर वाघ, सचिव, बी फार्मर शेतकरी गट, पिंपळगाव उजैनी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीonlineऑनलाइन