शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
5
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
6
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
7
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
8
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
9
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
10
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
11
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
12
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
13
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
14
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
15
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
16
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
17
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
18
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
19
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

सोशल मीडियाचा असाही वापर, शेतकरी गटाने ऑनलाईन विकला सहा लाखांचा भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 19:02 IST

लॉकडाऊनमुळे भाजीपाला विक्री बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे शेतात पडून आहेत. मात्र पिंपळगाव उजैनी येथील बी फार्मर शेतकरी गटाने भाजीपाला फळे आणि कडधान्याची ऑनलाईन विक्री केली. त्यामून या गटाला सहा लाखांचे उत्पन्न मिळाले.

अहमदनगर : लॉकडाऊनमुळे भाजीपाला विक्री बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे शेतात पडून आहेत. मात्र पिंपळगाव उजैनी येथील बी फार्मर शेतकरी गटाने भाजीपाला फळे आणि कडधान्याची ऑनलाईन विक्री केली. त्यामून या गटाला सहा लाखांचे उत्पन्न मिळाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. बाजार समित्यांसह भाजीपाला फळे विक्रीलाही बंदी आहे. नगर तालुक्यातील शेंडी, पोखर्डी, कापूरवाडी, पिंपळगाव उजैनी आदी गावातील शेतकरी भाजीपाला व फळांचे उत्पन्न घेतात. परंतु सध्या लॉकडाऊन असल्याने भाजीपाला विकता येत नाही. अशा कठीण परिस्थित पिंपळगाव उजैन येथील बी फार्मर या सेंद्रिय शेतकरी गटाने विक्री व्यावस्थापनाचे धडे घेत सोशल मिडियावरून शहरासह उपनगरातील नागिरकांकडून भाजीपाला फळे, कडधान्य आदींची ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. ग्राहकांच्या मागणीनुसार किट तयार करून ते त्यांना पोहोच करण्याचे काम सुरू केले. मागणी वाढत गेल्याने या गटाने आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी केला व त्याच्या किट बनविल्या. एका किटमध्ये साधारण आठ दिवस पुरेल इतका भाजीपाला दिला. जानेवारीपासून ऑनलाईन विक्री करण्यास सुरुवात केली. तेंव्हापासून आजपर्यंत ही विक्री सुरू असून, यातून सुमारे सहा लाख रुपयांची उलाढाल झाली. असे या गटाचे सचिव ज्ञानेश्वर वाघ यांनी सांगितले.

दर मंळवारी घरपोहोच भाजीपाला

सोमवार ते शनिवारपर्यंत सोशल मिडीयावर ग्राहकांकडून आर्डर घेण्यात आल्या. आठवडाभरात आलेल्या ऑर्डरची एकत्रित यादी तयार करून ग्राहकाच्या नावाने किट बनविण्यात आल्या. रविवारी ही यादी सोशल मिडीयावर शेतकऱ्यांना पाठविण्यात आली. यादीनुसार शेतकऱ्यांनी आपल्याकडील पालेभाज्या, कलिंगड, खरबूज, चिक्कू शेतकरी गटाकडे जमा केला. एकत्रित जमा झालेल्या भाजीपाला व फळांच्या किट तयार करून त्या ग्राहकांना थेट घरी पोहोच केल्या गेल्या. त्यात काही संस्थांनी मागणी नोंदविली. त्यामुळे मागणी वाढवून शेतकऱ्यांचा भाजीपाला विकला गेला.

परिसरातील शेतकऱ्यांचा भाजीपाला, कलिंगड , खरबूज खराब होऊ लागले. कमी भावात विक्री करावी लागत होती. त्यात सममित्राचे गणेश सानप यांची भेट झाली. त्यांनी विक्री व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच आत्माच्या अधिकाऱ्यांची माहिती दिली. सोशल मिडियावरील अनेक ग्रुप जॉईड झाले. यातूनच मागणी वाढवून चांगले उत्पन्न मिळाले.

- ज्ञानेश्वर वाघ, सचिव, बी फार्मर शेतकरी गट, पिंपळगाव उजैनी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीonlineऑनलाइन