शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश; शिक्षण विभाग सज्ज

By चंद्रकांत शेळके | Updated: June 13, 2023 21:48 IST

गुरूवारी वाजणार शाळांची घंटा

अहमदनगर : यंदा ५६ दिवसांच्या उन्हाळी सुटीनंतर गुरुवारी (दि. १५ जून) शाळा उघडणार असून जिल्हा परिषदेसह अनुदानित शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके, तसेच गणवेश वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.

राज्यभरात २१ एप्रिलपासून शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या होत्या. या सुट्या संपून आता १५ जूनपासून शाळांची घंटा वाजणार आहे. त्यादृष्टीने मुख्याध्यापक, शिक्षकांनी तयारी केली आहे. जिल्हा परिषद, तसेच अनुदानित शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासकीय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप दरवर्षी करण्यात येते.

यानुसार जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ८७९ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत. ही पुस्तके तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पोहोचविण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याचे नियोजन करण्यात आले आहे.

१ लाख ८५७ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

जिल्ह्यातील १ लाख ८५७ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, तसेच कटक मंडळाच्या शाळांमधील सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीतील मुले, तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुले यांना शासनाकडून मोफत गणवेश दिला जातो. या गणवेशाचे पैसे शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापन समित्यांना दिले असून या समित्या गणवेश खरेदी करणार आहेत.

दुसरा गणवेश अधांतरीच

दरवर्षी शासनाकडूनच दोन गणवेशाचे पैसे देण्यात येतात. त्यातून स्थानिक स्तरावर शाळा व्यवस्थापन समित्या कापड खरेदी करून गणवेश घेतात. मात्र यावर्षी एक राज्य एक गणवेश या धर्तीवर थेट राज्य शासनच दोन गणवेश पुरवणार, अशी घोषणा झाली. मात्र त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली नाही. शासनाने पूर्वीप्रमाणेच एका गणवेशाचे पैसे शाळांना दिले. मात्र दुसऱ्या गणवेशाचे काय? याचे उत्तर अजूनही शाळांना, तसेच पालकांना मिळालेले नाही.या शाळांना मिळणार पुस्तके

शासकीय शाळा (समाजकल्याण, आदिवासी विकास, सेंट्रल स्कूल, नवोदय), स्थानिक स्वराज्य (जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ), तसेच शासन अनुदानित, अंशत: अनुदानित अशा एकूण साडेचार हजारांहून अधिक शाळांमधील साडेचार लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.महागाईने पालकांचे कंबरडे मोडले

जिल्हा परिषद, तसेच अनुदानित शाळांतील मुलांना पाठ्यपुस्तके, गणवेश मोफत मिळणार आहेत. मात्र खासगी शाळांतील मुलांच्या पालकांना शालेय साहित्य खरेदीसाठी मोठा खर्च येत आहे. यंदा शालेय साहित्याचे दर वाढल्याने प्रत्येक विद्यार्थ्यामागे पाठ्यपुस्तके, वह्या, तसेच गणवेशाचा खर्च दोन ते चार हजारांपर्यंत जात आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीAhmednagarअहमदनगर