शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दूध आंदोलन चिरडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न; नगर  जिल्ह्याची कोरोनाची परिस्थिती खराब; खासदार सुजय विखे यांची पालकमंत्र्यांवर टीेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 14:45 IST

 दूध दरवाढीचे आंदोलन राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले आहेत, अशी टीका खासदार सुजय विखे यांनी केली. 

पारनेर :  दूध दरवाढीचे आंदोलन राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले आहेत, अशी टीका खासदार सुजय विखे यांनी केली. 

  दूध उत्पादक शेतक-यांच्या दुधाला प्रति लिटर ३० रुपये भाव मिळाला पाहिजे. वीज बील माफ करा. खतपुरवठा सुरळीत करा. दूध भुकटीला ५० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला पाहिज आदी विविध  मागण्यांसाठी शनिवारी (१ आॅगस्ट) पारनेर येथील आंबेडकर चौकात आंदोलन केले. याप्रसंगी खासदार विखे बोलत होते. 

केंद्र सरकारकडून जर या प्रश्नाबाबत अपेक्षा आहे. त्याप्रमाणे राज्यातील सरकारकडूनही काही अपेक्षा आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी हे तीन पक्षाचे सरकार आले आहे. ते जनतेला मान्य नाही. त्यामुळ हे सरकार फार काळ टिकणार नाही. याचे चित्रच महाराष्ट्रात पारनेर तालुक्यातील राजकीय घडामोडीने दाखविले, अशी टीका विखे यांनी केली.

विनामास्क फिरणा-या लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करा सध्या पारनेर तालुक्यात एक महिन्यांपासून  विविध उद्घाटनांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी  विनामास्क जाहीरपणे फिरत आहेत. तर दुसरीकडे आम्ही शेतक-यांच्या दूध प्रश्नांसाठी शनिवारी आंदोलन केले. यावेळी आम्हाला प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे विनामास्क फिरणा-या लोकप्रतिनिधींवर आधी गुन्हे दाखल करावेत. प्रशासन कारवाईबाबत दुटप्पीपणा करीत आहे. त्यामुळे महाआघाडीकडून न्यायाची अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे विखे यावेळी म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरSujay Vikheसुजय विखेmilkदूधFarmer strikeशेतकरी संप