पारनेर : राज्यात दुसऱ्या क्रमांकावर दुष्काळी म्हणून गणल्या जाणाऱ्या पारनेर तालुक्यातील बावीस गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानातून सुमारे २ ैहजार टीसीएम पाण्याची साठवणूक बंधारे, डी.सी.सी.टी.,कपार्टमेंट बल्डींग या जलसंधारण कामांमधून झाली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून सर्वाधिक कामे करून पारनेर तालुक्याने ही किमया साधली आहे.पारनेर तालुक्यात गेली तीन ते चार वर्षे अपुरा पाऊस असल्याने दुष्काळाचे चटके पारनेरकर सहन करीत होते. यंदाही पावसाने सप्टेंबर उजाडेपर्यंत अवकृपा केल्याने ऐन पावसाळ्यात शंभर तलाव कोरडे होते. त्यामुळे सुमारे ७० गावांना टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा चालू होता. राज्य शासनाने जलयुक्तअभियान राबविण्याचा निर्णय घेतल्याने पारनेर तालुक्यात ३७ गावांची निवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यात यास गती मिळत नव्हती, मात्र जिल्हाधिकारी अनिल कवडे, प्रांताधिकारी संतोष भोर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना जलयुक्तशिवार अभियानाचे महत्व सांगितले. कामात दिरंगाई करणाऱ्यांना नोटिसाही बजावल्या. दरम्यान, आता पारनेर शहरासह परिसरातील वाड्या, सिध्देश्वरवाडी, पळवे खुर्द व बुद्रुक, रांधे, भाळवणी, पिंपरी जलसेन, सुपा, रायतळे, पिंपरी गवळी, दैठणे गुंजाळ, माळकूप, टाकळी ढोकेश्वर, पळशी, पोखरी, देसवडे, गटेवाडी या गावांमधील जलसंधारणाची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाणीसाठा वाढला आहे़(तालुका प्रतिनिधी)
जलयुक्तमुळे शिवारात साठले पाणी
By admin | Updated: September 22, 2015 00:21 IST