शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

एस.टी.महामंडळाचे पाणी तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2016 23:40 IST

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे पाणीपट्टीची असलेली ३८ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने महामंडळाचा पाणी पुरवठा तोडला आहे.

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे पाणीपट्टीची असलेली ३८ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने महामंडळाचा पाणी पुरवठा तोडला आहे. पाणी पुरवठा तोडल्याने महामंडळाच्या स्थानकात तसेच कार्यशाळा व निवासस्थानांनाही पाणी मिळू शकले नाही. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी तातडीने महापालिकेत धाव घेत सवलत मागितली आहे. तोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली, मात्र प्रशासनाने ती फेटाळून लावली. महापालिका स्थापन झाल्यानंतर महामंडळाला औद्योगिक दराने पाणीपट्टी आकारण्यात आली. ५० रुपये प्रतिहजार लीटर असा दर महापालिका महामंडळाकडून आकारत होती. २००६ पर्यंत महापालिकेने महामंडळास नियमित पाणीपट्टी कराची मागणी केली. मात्र महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. २००६ मध्ये औद्योगिक दराने पाणीपट्टी आकारल्याची तक्रार महामंडळाने महापालिकेकडे केली. त्यानंतर दुरूस्ती करत वाणिज्य वापराच्या दराने पाणीपट्टी आकारण्यात आली. तरीही महामंडळाने महापालिकेला पाणीपटट्ी भरली नाही. आतापर्यंत ३८ लाख रुपयांची थकबाकी महामंडळाकडे झाली. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिकेने वसुली मोहीम हाती घेतली आहे. त्याच भाग म्हणून महामंडळाचा पाणीजोड महापालिकेने तोडला. मंगळवारी महामंडळाचे अधिकारी महापालिकेत आले. ३८ लाख रुपये थकबाकीत सुमारे १४ लाख रुपये दंड आहे. तो माफ करावा अशी मागणी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली. मात्र तो महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा दोष आहे. नियमित पाणीपट्टी न भरल्यामुळे ही दंड आकारणी करण्यात आली. त्यामुळे त्यात सवलत मिळणार नाही अशी भूमिका उपायुक्त अजय चारठाणकर यांनी घेतली. अगोदर थकबाकी भरा मगच पाणी पुरवठा पूर्ववत केला जाईल असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सुनावण्यात आले.