शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्मिक/आशेने दीन केले सर्वांशी। आशा सर्वांशी घातक/अशोकानंद महाराज कर्डिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 13:04 IST

आशा ही परमं दु:खं नैराश्यं परमं सुखम् । यथा संछिद्य कान्ताशां सुखं सुष्वाप पिंगला ॥ (श्रीमद्भागवत ११/८/४४) मित्रांनो विचार करा. एका वेश्येने अंतर्मुख होऊन विचार केला तर तिचा सुद्धा उद्धार झाला. लोक म्हणतात की माणसाचे जीवन आशेवर आहे. पण ते संतांच्या दृष्टीने चुकीचे आहे.

भज गोविन्दम भाग -१४------------------दिनमपि रजनी सायं प्रात: शिशिरवसन्तौ पुनरायात:।काल: क्रीडति गच्छत्यायु: तदपि न मुञ्चति आशावायु-१४-----------------ज्योतिषशास्त्रानुसार कलीयुगामध्ये ७ महान व्यक्तींनी संवत सुरु केले आहेत. युधिष्ठर, विक्रम, शालिवाहन, विजयाभिनन्दन, नागार्जुन, कल्की, छत्रपती श्री शिवाजी महाराज हे ते सात व्यक्ती आहेत. या आगोदर सप्त ऋषींनी संवत सुरु केले होते. त्यानुसारच नंतरच्या लोकांनी अपडेट केले आहेत. कालगणनेमध्ये क्रमश: प्रहर, दिवस, रात्र, पक्ष,आयन, संवत्सर, दिव्य वर्ष,मन्वंतर, युग,कल्प आणि ब्रह्माची कालगणना यानंतर केली जाते. या चक्रीय पद्धतीने हिंदूंनी आपली कालगणना विभाजित केली आहे. जसे की, कल्प, मन्वंतर, युग,सत्ययुग कृत), त्रेता, द्वापार,कलियुग ) ही कालगणना चक्रीय पद्धतीने पुन्हा: पुन्हा: येत असते. चक्रीय याचा अर्थ, सूर्योदय व सूर्यास्त व पुन्हा: सूर्योदय होणे एवढाच नाही तर काल हा चक्रीय नसून घटनाक्रम चक्रीय आहे, याची पुनरवृत्ती होते. पुनरावृत्तीमध्ये पण घटनाक्रम पहिल्यासारखा नसतो.

याच चक्रीय कालमानाप्रमाणे ब्रह्माचे आयुमार्नाच्या दुसऱ्या खंडामध्ये श्वेत वाराह खंडामध्ये वैवस्वत मन्वंतर व अठ्ठावीसावे कलियुग सुरु आहे. या कलियुगाच्या संपतीनंतर पुन्हा: सत्ययुग सुरु होणार. हिंदूंच्या कालगणनेनुसार पृथ्वीवर सजीवांची सुरुवात अंदाजे २०० कोटी वषार्पूर्वी सुरु झाली असावी. ऋतूचक्र अनादी काळापासून सुरूच आहे. त्याला नावे फक्त नंतर दिली गेली.

ऋतूचक्र याप्रमाणे आहे. वसंत -चैत्र ते वैशाख (वैदिक मधू आणि माधव)मार्च ते एप्रिल,ग्रीष्म -ज्येष्ठ ते आषाढ (वैदिक शुक्र आणि शुचि)मे ते जून,वर्षा- श्रावण ते भाद्रपद (वैदिक नभ: आणि नभस्य)जुलै ते सप्टेंबरशरद -आश्विन ते कार्तिक (वैदिक इष आणि उर्ज) आॅक्टोंबर ते नोव्हेंबरहेमंत -मार्गशीर्ष ते पौष (वैदिक सह:- सहस्य) डिसेंबर ते १५ जानेवारीशिशिर -माघ ते फाल्गुन (वैदिक तप: आणि तपस्य) १६ जनवरी ते फेब्रुवारी.वरीलप्रमाणे साधारणपणे हिंदू धमार्ची कालगणना केली जाते. श्री शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात की, दिवस रात्र येतात जातात. शिशिर, वसंत आदी ऋतू येतात व जातात. पण जीवाची अशा काही सुटत नाही.

जनक राजाच्या राज्यामध्ये एक पिंगला नावाची वेश्या होती. एक दिवस ती तिच्याकडे येणाºया धनिक पुरुषांची रात्रभर वाट बघत राहिली. पण त्या रात्री तिच्याकडे कोणीही ढुंकून देखील बघितले नाही. तिला खूप पश्चाताप झाला आणि नेमके त्याच वेळी श्री अवधूत म्हणजे श्री दत्तात्रयांचे दर्शन झाले. तिच्या लक्षात आले की भोगामध्ये सुख नाही तर त्यागातच सुख आहे.

आशा ही परमं दु:खं नैराश्यं परमं सुखम् । यथा संछिद्य कान्ताशां सुखं सुष्वाप पिंगला ॥ (श्रीमद्भागवत ११/८/४४) मित्रांनो विचार करा. एका वेश्येने अंतर्मुख होऊन विचार केला तर तिचा सुद्धा उद्धार झाला. लोक म्हणतात की माणसाचे जीवन आशेवर आहे. पण ते संतांच्या दृष्टीने चुकीचे आहे.

संत म्हणतात,सर्व सुखाचिया आशा जन्म गेला । क्षण एक मुक्ति यत्न नाहीं केला.हिंडतां दिशा शीण पावला । माया वेष्टिला जीव माझा ॥१॥माझें स्वहित नेणती कोणी । कांहींच न करिती मजवांचूनि ।सज्जन तंव सुखाची मांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥धृ॥तु. म.सुखाच्या आशेत जन्म गेला की सुखात गेला? हे काहीच कळत नाही. खरे तर सुखाच्या आशेत जन्म गेला पण सुख नाही मिळाले. संत मुक्ताबाई सुद्धा ताटीच्या अभंगात म्हणतात, आशा दंभ अवघे आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा.

श्री संत नाथ बाबा म्हणतात. आशा उपजली भगवंतासी। नीच वामनत्व आले त्यासी। आशेने दीन केले सवार्शी। आशा सर्वांशी घातक॥ भगवंताला बालीराजाकडून त्रिपाद भूमी दान मागण्याची आशा निर्माण झाली. त्याकरिता त्याला लहान व्हावे लागले. या आशेने सर्वांना दीन केले आहे. भगवान आद्य श्रीशंकराचार्य स्वामी महाराज हेच सांगतत की, आयुष्य क्षणाक्षणाने निघून जात आहे. तरीही या मानवाला आशेतून सुटका होत नाही. आशा व्याली दु:खाते आशेने दु:खाला जन्म दिला म्हणून वैराग्यच सुखाला कारण आहे हेच सत्य आहे.-भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिलेगुरुकुल भागावाताश्रम , चिचोंडी पाटील ता. अहमदनगर .मो. ९४२२२२०६०३

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक