शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

अखेर अण्णा हजारे यांचे उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 20:04 IST

लोकपाल, लोेकायुक्तसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिध्दीमध्ये उपोषण सुरु असलेले उपोषण आज मागे घेण्यात आले.

अहमदनगर : लोकपाल, लोेकायुक्तसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिध्दीमध्ये उपोषण सुरु असलेले उपोषण आज मागे घेण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागण्यांबाबतचे पत्र अण्णा हजारे यांना दिल्यानंतर उपोषण मागे घेतले. दुपारी दोन वाजता सुरु झालेली बैठक तब्बल संध्याकाळी सात वाजता संपली. 

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्यासह समितीने तब्बल 6 तास अण्णांशी बंद खोलीत चर्चा केली. दोन वाजता सुरु झालेली बैठक 7  वाजता संपली.  बैठकित शेतक-यांना हमी भाव मिळावा, कृषी मूल्य आयोगाला स्वायत्ता मिळावी, स्वामिनाथन आयोग कोणताही आडपडदा न ठेवता लागू करावा, अशी भूमिका अण्णांनी मांडली. लोकपाल कायद्याचा जुना मसुदा व अण्णा हजारे यांनी सरकारला दिलेला मसुदा या दोन्ही मसुद्यातील काही मुद्दे एकत्र करून नवा मसुदा तयार करण्यात आल्याची माहिती आहे.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लिंबू-पाणी घेऊन हजारे यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी  राळेगणमध्ये जलसंपदामंत्री गिरीष महाजन, संरक्षण मंत्री सुभाष भामरे, आदर्श गाव समितीचे पोपट पवार उपस्थित आहेत.  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने अण्णांच्या सर्व मागण्या मंजूर केल्या आहेत. उपोषण मागे घेण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आठवड्यापासून प्रयत्न करत होते.  स्वामिनाथन अहवालातील शिफारशी लागू करण्याच्या मागणीवर अण्णा ठाम असल्यामुळे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह बैठकीतून पाच वाजण्याच्या सुमारास निघून गेले. त्यानंतरही तब्बल दोन तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अण्णांच्या मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. महत्वाची मागणी लोकपालची होती. याबाबत सरकार प्रक्रिया राबवत आहेत  १३ फेब्रवारीला बैठक होणार आहे. संयुक्त समितीने ढाचा तयार करण्याचे सरकारने मान्य केले आहे. पुढच्या अधिवेशनात हे विधेयक मांडले जाणार आहे. कृषिमुल्याच्या संदर्भात कायद्यात बदल केला जाईल. कृषीच्या संदर्भातील नाशवंत मालाला भाव कसा मिळेल यावरही विचार केला जात आहे. ऑक्टोंबरपर्यंत सर्व सिफारसी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री सन्मान योजनेत वाढ करण्याची मागणी होती. यामध्ये सहा हजार रुपये केंद्र देणार आहे. या रकमेत राज्य वाढ करणार आहे. अण्णांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे पत्र देत आहोत. यावर अण्णा हजारे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागण्या मान्य केल्या असून मी समाधानी असल्यामुळे उपोषण सोडत आहे.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रanna hazareअण्णा हजारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस