शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

महिलेच्या मृत्युप्रकरणी श्रीरामपूरच्या डॉक्टरला मागितली दहा लाखांची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 15:59 IST

श्रीरामपूर शहरातील डॉ.संजय शंकर अनारसे यांना महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत १० लाख रुपये खंडणी मागून धमकी देणारे तिघे आरोपी फरार झाले आहेत.

श्रीरामपूर : शहरातील डॉ.संजय शंकर अनारसे यांना महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत १० लाख रुपये खंडणी मागून धमकी देणारे तिघे आरोपी फरार झाले आहेत. पोलीस त्यांच्या मागावर असून लवकरच त्यांना ताब्यात घेऊ असा विश्वास व्यक्त त्यांनी व्यक्त केला आहे. आरोपींनी डॉ.अनारसे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली होती. या धमकीला वैैतागून अखेर अनारसे यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी रात्री उशिरा याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये शहरातील समीर माळवे, तसेच रमेश गायकवाड व माधवी गायकवाड (कल्याण) यांचा समावेश आहे. हे सर्व फरार झाले आहेत.रुग्ण उर्मिला रमेश गायकवाड यांच्या पोटात गोळा असल्याने २१ आॅक्टोबरला डॉ.अनारसे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर २४ आॅक्टोबरला शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांनी तब्येत बिघडल्यामुळे त्यांना संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेही प्रकृती न सुधारल्यामुळे नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथेही उर्मिला यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. अखेर २७ आॅक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.उपचारादरम्यान डॉ.संजय अनारसे यांनी हलगर्जीपणा केला व त्यामुळे उर्मिला यांचा मृत्यू झाला, असा आरोप समीर माळवे, रमेश गायकवाड व माधवी गायकवाड यांनी केला. रुग्णालयाची बदनामी करण्याची धमकी देत १० लाख रुपये खंडणी मागितली. जिवे मारण्याची तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. आरोपींवर खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. 

टॅग्स :Shrirampurश्रीरामपूरCrime Newsगुन्हेगारी