शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूरने दिली कॉंग्रेसलाच साथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 16:55 IST

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे लहू कानडे यांच्या विजयामुळे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे या साखर कारखानदारांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना व भारतीय जनता पक्षाची पारंपरिक मतेही फुटली. या विजयामुळे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांना राजकीय उभारी मिळणार आहे. पक्षबदलामुळे भाऊसाहेब वाकचौरे यांची जी अवस्था केली तीच अवस्था मतदारांनी कांबळे यांची केली.

श्रीरामपूर विधानसभा निवडणूक विश्लेषण - शिवाजी पवार । श्रीरामपूर : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे लहू कानडे यांच्या विजयामुळे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे या साखर कारखानदारांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना व भारतीय जनता पक्षाची पारंपरिक मतेही फुटली. या विजयामुळे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांना राजकीय उभारी मिळणार आहे. पक्षबदलामुळे भाऊसाहेब वाकचौरे यांची जी अवस्था केली तीच अवस्था मतदारांनी कांबळे यांची केली. सलग पाच वेळा येथे काँग्रेसने गड राखत वर्चस्व सिद्ध केले. श्रीरामपुरात आजवर काँग्रेस पक्षाने १९ हजार मतांनी मिळविलेला हा सर्वात मोठा विजय ठरला. विशेष म्हणजे दिवंगत जयंत ससाणे यांनाही एवढे मताधिक्य मिळविता आले नव्हते. एमआयएम, वंचित आघाडी तसेच अपक्ष उमेदवार रामचंद्र जाधव हे काँग्रेसची मते खाण्यात निष्प्रभ ठरले.श्रीरामपुरचा निकाल अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे व भानुदास मुरकुटे यांची येथे युती झाली. सोबतीला शिवसेना, भारतीय जनता पक्ष, सभापती दीपक पटारे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले अशी प्रस्थापितांची यंत्रणा कांबळेंच्या पाठीशी उभी राहिली. याउलट काँग्रेसचा किल्ला करण ससाणे गटाने लढविला. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनीही अखेरच्या टप्प्यात जोरदार प्रचार राबविला. प्रारंभी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अखेरच्या टप्प्यात चुरशीची बनली. कांबळे यांचा प्रशासनावर कुठलाही वचक नाही, असा आरोपही केला गेला. तो कांबळे यांना अखेरपर्यंत खोडून काढता आला नाही. खासदार सदाशिव लोखंडे प्रचारात फारसे सक्रीय नव्हते. अनेक शिवसैनिकही प्रचारात नव्हते. विखे-थोरात संघर्षाची किनारश्रीरामपूर तालुका दत्तक घेऊन येथील विकासाची बांधिलकी स्वीकारण्याची तयारी विखे यांनी जाहीरपणे बोलून दाखविली. त्याविरोधातही जनतेतून प्रतिक्रिया उमटली. निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात विखे यांचे येथील अतिक्रमण हाच मुद्दा पुढे रेटला गेला. याउलट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपुरातील हस्तक्षेप टाळत करण ससाणे यांच्यावर विश्वास दाखविला़ थोरातांचा हा मुत्सदीपणा मतदारांना भावला तर विखेंचा हस्तक्षेप चांगलाच खटकला असल्याचेही दिसते़ विकासाच्या विचाराला हा विजय समर्पितजात्यंध शक्तीविरोधात सर्वांना सोबत घेऊन जाणा-या विचारांचा, सर्वधर्म समभाव मानणा-या विचारांचा हा विजय आहे. दिवंगत गोविंदराव आदिक, जयंतराव ससाणे यांनी केलेल्या विकासाच्या विचाराला हा विजय समर्पित करतो. निष्क्रियतेविरोधात जनतेने दिलेला हा कौल आहे. श्रीरामपूर मतदारसंघात विकासाचे चक्र अधिक गतिमान करणार आहे, असे आमदार लहू कानडे यांंनी सांगितले.     

टॅग्स :shrirampur-acश्रीरामपूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019