शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शूरा आम्ही वंदिले : देशासाठी जीवाची बाजी, शंकर एरंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 13:57 IST

१९६५ च्या सप्टेंबर महिन्यात भारत-पाकिस्तानच्या युध्दात दोन्ही बाजूंच्या सैनिकात धुमश्चक्री सुरू होती. वडझिरे येथील जवान शंकर एरंडेसह त्याचे सहकारी आपल्या जिवाची बाजी लावून लढत होते.

ठळक मुद्देशंकर बाबू एरंडेयुध्दसहभाग भारत-पाकिस्तानसैन्यभरती १९५८वीरगती १५ सप्टेंबर १९६५वीरपत्नी चांगुणाबाई एरंडे

१९६५ च्या सप्टेंबर महिन्यात भारत-पाकिस्तानच्या युध्दात दोन्ही बाजूंच्या सैनिकात धुमश्चक्री सुरू होती. वडझिरे येथील जवान शंकर एरंडेसह त्याचे सहकारी आपल्या जिवाची बाजी लावून लढत होते. दोन्ही बाजूंकडून बॉम्बहल्ले, गोळीबाराच्या फैरी झडत होत्या. पायदळाच्या या तुकडीने पाकिस्तानी सैनिकांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे १५ सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या काही मूठभर सैनिकांनी या तुकडीला घेरून त्यांच्यावर बॉम्बहल्ला व गोळीबार केला. यात शंकरसह त्याचे सहकारी देखील शहीद झाले. परंतु या तुकडीच्या साहसी आणि धाडसीपणाने तमाम भारतीयांनी त्यावेळी सलाम केला.वडझिरे येथील शेतकरी बाबू एरंडे यांचे एकत्रित कुटुंब. त्यामुळे कुटुंबाचा आवाका मोठा होता. त्यांना शंकर यांच्यासह सहा मुले होती़ शंकर यांचे शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत झाले़ त्यानंतर गावात शिक्षणाची सोय नसल्याने जामगाव येथील माध्यमिक विद्यालयात शंकरला पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षणासाठी पाठविण्यात आले़ आठवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर वडिलांनी शंकरला आपल्या शेतात काम करण्यास सांगितले. शंकर शेतात काम करु लागला. कधी कधी गुरे वळण्याचे कामही तो करी. केवळ गुरे, ढोरे सांभाळण्यापेक्षा आपण काहीतरी काम केले पाहिजे, असा विचार त्याच्या मनात येत होता. त्यामुळे गावात दुष्काळी पट्ट्यात सुरू असणाऱ्या रोजगार हमीच्या कामावर तो जाऊ लागला. आपले कुटुंब मोठे असल्याने आपण केवळ रोजगार हमी किंवा शेतात काम करून भागणार नाही, असे शंकरला वाटे़ त्याच काळात देशभरात भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्ष सुरू असल्याच्या बातम्या रेडिओवरून ऐकल्या जात होत्या़ देशासाठी सैन्यात भरती होण्याचे आवाहन युवकांना करण्यात येत होते़ शंकर यांनी देशासाठी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. १९५८ मध्ये थेट पुणे गाठले़ तेथे त्यांच्या शरीराचा धडधाकटपणा पाहून लगेच भरती करून घेण्यात आले़ शंकर लष्करात भरती होऊन गावात आल्यानंतर गावातील तरूणांनी त्यांची मिरवणूक काढली. कारण लष्करात भरती होणारे शंकर हे गावातील पहिलेच तरूण होते असे त्यांच्याबरोबरील लोक सांगतात. यानंतर ते बेळगाव येथे लष्करी प्रशिक्षणासाठी गेले़ एक-दोन वर्षे सैन्यात सेवा केल्यानंतर वडिलांनी शंकर यांचा विवाह गावातील मोरे कुटुंबातील चांगुणाबाई यांच्याबरोबर थाटामाटात लावला.जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिक, अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या होत्या़ भारतात घुसखोरी करून काश्मीरवर हक्क सांगण्याचा प्रयत्न पाकिस्तान करीत होते़ यामुळे भारतीय जवानांच्या मोठ्या तुकड्या भारतीय सीमेवर १९६२ पासूनच वाढविण्यात आल्या होत्या़ तीन वर्षे शंकर व अनेक लष्करी जवानांना याच भागात देशाच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आले होते़ यावेळी अनेकवेळा भारत व पाकिस्तान यांच्यातील सैन्यात चकमकी होत होत्या़ भारताने त्यावेळी चोख प्रत्युत्तर देऊनही पाकिस्तानची घुसखोरी सुरूच होती़ शेवटी भारताने पाकिस्तानच्या घुसखोºया थांबत नसल्याने व भारतीय हद्दीत घुसणारे पाकिस्तानी सैन्यांना व अतिरेक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानबरोबर युध्दाची घोषणा केली़ विमाने, हेलिकॉप्टरने एकीकडे पाकिस्तानी सैन्यावर बॉम्बहल्ले व गोळीबार सुरू करण्यात आला़ दोन्ही बाजूंकडून बॉम्ब हल्ले व गोळीबाराचा थरार सुरू होता़ वायुदलाचे सैनिक हवेतून लढा देत असताना शंकर एरंडे यांच्यासह पायदळाचे सैन्य पाकिस्तानी सैन्याचे तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत होते़ अनेक दिवस युध्द सुरू असताना १५ सप्टेंबर १९६५ मध्ये पाकिस्तानी सैन्याला हरवून पुढे चालणाºया भारतीय लष्कराच्या तुकडीला मूठभर असलेल्या पाक सैनिकांनी लक्ष्य करीत हल्ले व गोळीबार सुरू केला़ भारतीय सैनिकांनी सडेतोड प्रत्युतर दिले. परंतु या तुकडीला यश आले नाही. यात शंकर एरंडे यांच्यासह अनेक भारतीय सैनिक शहीद झाले़ शंकर एरंडे यांच्या शहीद होण्याची तार वडझिरे गावात चार-पाच दिवसांनी आली़ त्यावेळी काय झाले हे आजही आम्हाला सांगता येत नाही, असे शंकर यांची पत्नी चांगुणाबाई सांगत होत्या़ आपले मालक देशसेवा करताना शहीद झाले, पण देशातील असंख्य लोकांचे संरक्षण केले, असे चांगुणबाई सांगत होत्या़गावाला आठवणींचा विसरभारत-पाकिस्तानच्या युध्दात आपली प्राणाची आहुती देणारे शंकर बाबू एरंडे यांच्या देशभक्तीचा वडझिरे ग्रामस्थांना विसर पडला आहे़ गावात शहीद जवान एरंडे यांचे कोणतेही स्मारक नाही़ शिवाय गावात त्यांच्या शहीद दिनी कोणतेही कार्यक्रम होत नाहीत़ शहीद जवान शंकर यांची पत्नी चांगुणाबाई या वयोवृध्द आहेत़ त्या मामा मोरे कुटुंबीयांकडे तर कधी पुतणे विजय एरंडे यांच्याकडे राहतात़ पंचवीस हजार रूपये त्यांना निवृत्तीवेतन मिळते त्यातच त्यांचा उदरनिर्वाह चालतो़ गावात स्मारक उभारण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात यश आले नाही, असे त्यांचे पुतणे विजय एरंडे यांनी सांगितले़- शब्दांकन : विनोद गोळे

टॅग्स :AhmednagarअहमदनगरIndependence Dayस्वातंत्र्य दिनLokmatलोकमतParnerपारनेर