शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नगरमध्ये खून करून तरुणाचा मृतदेह दरीत जाळला; १० दिवसांनी घटनेचा उलगडा, मृतदेहाची विल्हेवाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:56 IST

पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मयताचा मृतदेह कारमधून केकताई परिसरात असलेल्या एका दरीत नेला. तिथे लाकूड व डिझेलच्या साह्याने मयताचा मृतदेह जाळून टाकला.

अहिल्यानगर : पूर्व वैमनस्यातून एका १९ वर्षीय तरुणाची अपहरण करून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह शहरापासून दूर असलेल्या केकताई डोंगर परिसरात नेऊन जाळल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. वैभव शिवाजी नायकोडी (वय १९ वर्षे, रा. ढवणवस्ती, तपोवन रोड) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. टोळीच्या वादातून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मयत तरुण नायकोडी हा २२ फेब्रुवारी रोजी सकाळी तपोवन रोड परिसरातील सलूनच्या दुकानात आला होता. त्यावेळी त्याला आरोपींनी गाठले, त्याला बळजबरीने कारमध्ये बसवून तपोवन रोड इथून वडगाव गुप्ता रोडवरील निर्जनस्थळी नेले. तिथे त्याला आरोपींनी अमानुषपणे मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मयताचा मृतदेह कारमधून केकताई परिसरात असलेल्या एका दरीत नेला. तिथे लाकूड व डिझेलच्या साह्याने मयताचा मृतदेह जाळून टाकला.

दरम्यान, मुलगा घरी न आल्याने मयताच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात २७ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली होती. या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला अपहरण असावे, असा पोलिसांचा अंदाज होता, मात्र आठ दिवस उलटूनही तरुण घरी न आल्याने पोलिस व नातेवाईक यांचा संशय वाढला, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदर प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केली. त्यावेळी आरोपींनी वैभव नायकोडी याचे अपहरण करून खून केला असल्याची कबुली दिली आणि तेथूनच प्रकरणाला एक दिशा मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना सोबत घेऊन केकताई डोंगर गाठला. डोंगरातील एका दरीमध्ये मृतदेह जाळल्याचे समोर आले.

मयत तरुणाला मारताना आणखी कोण कोण सोबत होते? याचाही पोलिसांनी शोध घेतला. त्यामुळे आणखी चार आरोपी यात निष्पन्न झाले असून एकूण आरोपींची संख्या नऊ झाली आहे. 

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरCrime Newsगुन्हेगारी