शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अहमदनगर जिल्ह्यात साडेतीन लाख शेतक-यांना महावितरणचा शॉक; वीज पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 20:22 IST

अहमदनगर/कोपरगाव : सन २०१३-१४ पासून अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख ४१ हजार ४३६ शेतक-यांनी शेती पंपाच्या वीज बिलापोटी २ हजार ...

ठळक मुद्देथकबाकीची आकडेवारीअहमदनगर जिल्हा - ३ लाख ४१ हजार ४३६ शेतकरी (२ हजार २८५ कोटी थकबाकी)संगमनेर विभाग- एकूण ८० हजार ६७ शेतकरी (५२१ कोटी थकबाकी)कोपरगाव ग्रामीण- १३ हजार ९६३ शेतकरी (६६ कोटी थकबाकी)कोपरगाव शहर- २ हजार २१६ शेतकरी (११ कोटी थकबाकी)राहाता- १४ हजार ९५३ शेतकरी (८२ कोटी थकबाकी)संगमनेर ग्रामीण- २० हजार ९७९ शेतकरी (१८५ कोटी थकबाकी)संगमनेर शहर- १३ हजार ५७० शेतकरी (८९ कोटी थकबाकी)अकोले- १० हजार ३४१ शेतकरी (६२ कोटी थकबाकी)राजूर- ४ हजार ४५ शेतकरी (२१ कोटी थकबाकी)

अहमदनगर/कोपरगाव : सन २०१३-१४ पासून अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख ४१ हजार ४३६ शेतक-यांनी शेती पंपाच्या वीज बिलापोटी २ हजार २८५ कोटी रूपये थकविल्याने महावितरणकडून त्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.२०१३-१४ पासून शेतक-यांनी शेतीपंपांची वीज देयके थकविली आहेत. अनेकदा कळवूनही देयके न भरल्याने नगर जिल्ह्याची थकबाकी २ हजार २८५ कोटींवर जाऊन पोहचली आहे. त्यात कोपरगाव तालुक्यातील १६ हजार १७९ शेतक-यांच्या ७८ कोटी रूपयांच्या थकबाकीचा, संगमनेर विभागातील ८० हजार ६७ शेतक-यांच्या ५२१ कोटी रूपयांच्या थकबाकीचा समावेश आहे. संगमनेर ग्रामीणमध्ये सर्वाधिक १८५ कोटी तर राजूरमध्ये सर्वात कमी २१ कोटींची थकबाकी आहे. थकबाकीचे प्रमाण भरमसाठ असल्याने बुधवारी सायंकाळी संगमनेर विभागात महावितरणचे प्रादेशिक संचालक सतीश कर्पे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिका-यांची बैठक झाली. या बैठकीत थकबाकीदार ग्राहकांच्या शेतीपंपांचा वीज पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शेतीपंपांच्या सर्व रोहित्रांची वीज सायंकाळपासून गायब झाली. थकबाकी असलेल्या देयकाच्या २० टक्के रक्कम भरल्यास वीज पुरवठा करणे महावितरणला शक्य होईल. या बैठकीस मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, कार्यकारी अभियंता डी.बी.गोसावी, उपकार्यकारी अभियंता डी.एन.चावडा(कोपरगाव ग्रामीण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता जे.व्ही. महाजन (कोपरगाव शहर) आदी उपस्थित होते.

थकबाकीदार ७० टक्के शेतकरी ग्राहकांनी देयकाच्या किमान २० टक्के रक्कम भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरू केला जाणार नाही. तसेच रोहित्र जळाल्यास ७० टक्के रक्कम भरूनच बदलून दिले जाईल. शेतकºयांनी वेळेत वीज देयके भरून महावितरणला सहकार्य करावे.-डी.बी.गोसावी, कार्यकारी अभियंता.

१५ सप्टेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शेती पंपांवर कॅपिसिटर बसविण्यात येणार आहेत. कॅपिसिटरमुळे वीज गळती थांबण्यास मदत होईल. अतिरिक्त वीज वापर नियंत्रणात येईल. त्यासाठी किमान ७० टक्के थकबाकी भरणे क्रमप्राप्त आहे.-डी.एन.चावडा, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, कोपरगाव

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरीmahavitaranमहावितरण