शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यात साडेतीन लाख शेतक-यांना महावितरणचा शॉक; वीज पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 20:22 IST

अहमदनगर/कोपरगाव : सन २०१३-१४ पासून अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख ४१ हजार ४३६ शेतक-यांनी शेती पंपाच्या वीज बिलापोटी २ हजार ...

ठळक मुद्देथकबाकीची आकडेवारीअहमदनगर जिल्हा - ३ लाख ४१ हजार ४३६ शेतकरी (२ हजार २८५ कोटी थकबाकी)संगमनेर विभाग- एकूण ८० हजार ६७ शेतकरी (५२१ कोटी थकबाकी)कोपरगाव ग्रामीण- १३ हजार ९६३ शेतकरी (६६ कोटी थकबाकी)कोपरगाव शहर- २ हजार २१६ शेतकरी (११ कोटी थकबाकी)राहाता- १४ हजार ९५३ शेतकरी (८२ कोटी थकबाकी)संगमनेर ग्रामीण- २० हजार ९७९ शेतकरी (१८५ कोटी थकबाकी)संगमनेर शहर- १३ हजार ५७० शेतकरी (८९ कोटी थकबाकी)अकोले- १० हजार ३४१ शेतकरी (६२ कोटी थकबाकी)राजूर- ४ हजार ४५ शेतकरी (२१ कोटी थकबाकी)

अहमदनगर/कोपरगाव : सन २०१३-१४ पासून अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख ४१ हजार ४३६ शेतक-यांनी शेती पंपाच्या वीज बिलापोटी २ हजार २८५ कोटी रूपये थकविल्याने महावितरणकडून त्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.२०१३-१४ पासून शेतक-यांनी शेतीपंपांची वीज देयके थकविली आहेत. अनेकदा कळवूनही देयके न भरल्याने नगर जिल्ह्याची थकबाकी २ हजार २८५ कोटींवर जाऊन पोहचली आहे. त्यात कोपरगाव तालुक्यातील १६ हजार १७९ शेतक-यांच्या ७८ कोटी रूपयांच्या थकबाकीचा, संगमनेर विभागातील ८० हजार ६७ शेतक-यांच्या ५२१ कोटी रूपयांच्या थकबाकीचा समावेश आहे. संगमनेर ग्रामीणमध्ये सर्वाधिक १८५ कोटी तर राजूरमध्ये सर्वात कमी २१ कोटींची थकबाकी आहे. थकबाकीचे प्रमाण भरमसाठ असल्याने बुधवारी सायंकाळी संगमनेर विभागात महावितरणचे प्रादेशिक संचालक सतीश कर्पे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिका-यांची बैठक झाली. या बैठकीत थकबाकीदार ग्राहकांच्या शेतीपंपांचा वीज पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शेतीपंपांच्या सर्व रोहित्रांची वीज सायंकाळपासून गायब झाली. थकबाकी असलेल्या देयकाच्या २० टक्के रक्कम भरल्यास वीज पुरवठा करणे महावितरणला शक्य होईल. या बैठकीस मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, कार्यकारी अभियंता डी.बी.गोसावी, उपकार्यकारी अभियंता डी.एन.चावडा(कोपरगाव ग्रामीण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता जे.व्ही. महाजन (कोपरगाव शहर) आदी उपस्थित होते.

थकबाकीदार ७० टक्के शेतकरी ग्राहकांनी देयकाच्या किमान २० टक्के रक्कम भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरू केला जाणार नाही. तसेच रोहित्र जळाल्यास ७० टक्के रक्कम भरूनच बदलून दिले जाईल. शेतकºयांनी वेळेत वीज देयके भरून महावितरणला सहकार्य करावे.-डी.बी.गोसावी, कार्यकारी अभियंता.

१५ सप्टेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शेती पंपांवर कॅपिसिटर बसविण्यात येणार आहेत. कॅपिसिटरमुळे वीज गळती थांबण्यास मदत होईल. अतिरिक्त वीज वापर नियंत्रणात येईल. त्यासाठी किमान ७० टक्के थकबाकी भरणे क्रमप्राप्त आहे.-डी.एन.चावडा, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, कोपरगाव

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरीmahavitaranमहावितरण