शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

निळवंडेचे पाणी शिर्डी, कोपरगावला देण्यास निळवंडे पाटपाणी कृतिसमितीचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 22:13 IST

गेल्या ४८ वर्षांपासून निळवंडेच्या पाण्याची आतुरतेने वाट पहात असलेल्या निळवंडेच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या पाण्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचे षड्यंत्र शिर्डी-कोपरगाव जलवाहिनीच्या माध्यमातून पुढे येत आहे. पण लाभक्षेत्राबाहेर निळवंडेच्या पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही.

अस्तगाव : गेल्या ४८ वर्षांपासून निळवंडेच्या पाण्याची आतुरतेने वाट पहात असलेल्या निळवंडेच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या पाण्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचे षड्यंत्र शिर्डी-कोपरगाव जलवाहिनीच्या माध्यमातून पुढे येत आहे. पण लाभक्षेत्राबाहेर निळवंडेच्या पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही. ‘पाण्याविण्या तडफडून मरण्यापेक्षा पाण्यासाठी रस्त्यावर येऊन तीव्र संघर्ष करुन मरू,’ असा इशारा देत निळवंडे पाटपाणी कृतिसमितीने आक्रमक भूमिका घेतली आहे.संस्थापक नानासाहेब शेळके, कार्याध्यक्ष गंगाधर गमे, अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, सचिव उत्तम घोरपडे यांनी शनिवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, जुलै २००८ पासून निळवंडे धरणात पाणी अडविले जाते. परंतु लाभक्षेत्राला पाणी मिळत नसल्याने आधीच शेतक-यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. धरणाचा मूळ उद्देश दुष्काळाशी सामना करण्या-या अवर्षणग्रस्त भागातील शेतीला शाश्वत करून या भागातील शेतक-यांचे जीवनमान उंचावणे हा आहे. केंद्रीय जल आयोगाच्या सिंचन नियोजनप्रमाणे ६८ हजार ८८७ हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन आहे. पाणी कमी व सिंचनाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे प्रवाही उपसा व सूक्ष्म सिंचनाच्या सर्व पध्दतींचा वापर करुन सामाजिक न्यायासाठी जास्तीत जास्त क्षेत्राला संरक्षण देऊन पाण्याची विषमता घालविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे शेतीशिवाय पाणी वळविले गेल्यास मूळ नियोजनानुसार संरक्षित केलेल्या शेतीला पाणी देता येणार नाही. तसेच ज्या उद्देशाने धरणाची निर्मिती केली, त्यालाच हरताळ फासला जाईल, असे समितीने म्हटले आहे.

कोपरगावची टंचाई हास्यास्पद

गोदावरीच्या मुख्य खो-यातील कोपरगाव शहराला टंचाई भासणे हा प्रकार हास्यास्पद आहे. इतर वेळी कालव्याद्वारे ९ ते १० आवर्तने होत असतानाही जनतेचे पिण्याचे पाणी दारू प्रकल्पासाठी वापरले जात असल्यामुळे कोपरगावची परवड होत आहे. त्यामुळे कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी निळवंडेच्या जिरायत भागातील शेतक-यांच्या पाण्यावर डल्ला मारण्यापेक्षा दारूनिर्मितीस आवर घातल्यास कोपरगावकरांची तहान भागून कोपरगाव नगरपालिकेचे १६१ कोटी वाचू शकतात. साई संस्थानने निळवंड्यासाठी पैसे द्यायचे असतील तर विनाअट द्यावे व लोकप्रतिनिधींनी या जलवाहिनीमुळे कोणते क्षेत्र पाण्यावाचून वंचित राहणार आहे ते आधी जाहीर करावे, अशी मागणीही समितीने केली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता