शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

पक्षाचं नाव 'राष्ट्रवादी', पण शरद पवार देश तोडणाऱ्यांसोबत; मोदींचा पुन्हा 'स्ट्राईक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 18:39 IST

शरद पवार यांना नेमके झाले तरी काय? तुम्ही तर देशोसाठी काँग्रेस सोडली होती. आता पुन्हा का त्यांच्यासोबत गेला आहात. काश्मिरचे तुकडे तुम्ही होऊ देताल का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांना विचारला.

अहमदनगर : शरद पवार यांना नेमके झाले आहे तरी काय? तुम्ही तर देशासाठी काँग्रेस सोडली होती. आता पुन्हा त्यांच्यासोबत का गेला? पक्षाचे नाव 'राष्ट्रवादी' ठेवले, पण देश तोडणाऱ्यांसोबत का गेला? काश्मीरचे तुकडे तुम्ही होऊ द्याल का? असे सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले आहेत.

अहमदनगर येथे भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित होते.

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, अहमदनगरच्या भूमीने देश मजबूत केला आहे. काँग्रेसच्या काळात प्रत्येक दिवस घोटाळ्याचा होता. काँग्रेसच्या काळात देशातील शहरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. आमच्या काळात आम्ही कठोर भूमिका घेतली. काँग्रेस सरकार जगात कमजोर होती. पाकिस्तानसमोर कमकुवत होती. मात्र आमचे सरकार आल्यानंतर दहशवादाविरोधात कठोर पावले उचलली. शरद पवारांना काय झाले आहे ? आपल्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी असे आहे. तरीसुध्दा जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत आहात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील असूनही तुम्हाला झोप कशी येते, असा टोलाही पवारांना लगावला.

महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांना पेन्शन मिळणार. नुकतेच आमच्या सरकारने पशुपालकांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ दिला. हा लाभ आता मत्स्यव्यावसायिकांनी मिळणार आहे. काँग्रेसला पूर्णपणे हटवा. त्यानंतरच देशाचा विकास होऊ शकतो, असा नागरिकांनीच प्रण केला आहे, असेही यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले.

याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खासदार दिलीप गांधी यांनी नाराज होऊ नये. तुमच्यासाठी पक्ष काम करेल. सुजय विखे यांच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019