शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

दशमीगव्हाणला तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:21 IST

चिचोंडी पाटील : गतवर्षी चांगला पाऊस होऊनही नगर तालुक्यातील दशमीगव्हाणमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या ...

चिचोंडी पाटील :

गतवर्षी चांगला पाऊस होऊनही नगर तालुक्यातील दशमीगव्हाणमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित टँकर सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

पाणी टंचाईसंदर्भात पाहणी करण्यासाठी तहसीलदार उमेश पाटील यांच्यासह संदीप गुंड, माजी सभापती प्रवीण कोकाटे, गटविकास अधिकारी धाडगे, विस्तार अधिकारी खाडे यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना शाखा प्रमुख संतोष काळे, बाजार समितीचे संचालक उद्धव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळे, अशोक काळे उपस्थित होते. यावेळी गावाला दरवर्षीच पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने या समस्यांवर कायमस्वरूपीचा तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांकडून अधिकाऱ्यांना करण्यात आली. त्याविषयी सकारात्मकता दाखवत गावच्या पाणीपुरवठ्यासाठी बुऱ्हाणनगर पाणी पुरवठा योजनेत समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.

सध्याची पाणी टंचाई कमी करण्यासाठी लवकरात लवकर पाण्याचा टँकर चालू करावा, अशी मागणी संतोष काळे व ग्रामस्थ यांनी केली.

--

उन्हाळ्यामुळे गावात प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावाचा पाणी पुरवठा भागवता यावा, यासाठी दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपसरपंच बाबासाहेब काळे यांनी स्वखर्चातून प्रत्येक एक अशा दोन कूपनलिका खोदल्या; परंतु त्यांनाही पुरेशे पाणी न लागल्यामुळे पाणी प्रश्न कायम आहे. त्यामुळे गावासाठी टँकर सुरू होणे गरजेचे आहे.

-संगीता कांबळे,

सरपंच, दशमीगव्हाण.