शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

नगर तालुक्यात ४९ गावांची जलयुक्तसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 10:50 IST

दुष्काळी नगर तालुक्याला वरदान ठरणा-या जलयुक्त शिवार योजनेत यावषार्साठी तालुक्यातील ४९ गावांची निवड करण्यात आली. मात्र हि निवड आमच्यामुळेच झाल्याच्या दावा राजकीय पदाधिकार्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून करून याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आता जवळपास संपूर्ण तालुकाच या योजनेत समाविष्ट झाला आहे. ज्या हिवरेबाजारने श्रमदानाच्या जीवावर गावाचा कायापालट केला त्याच्या पावलावर पाउल ठेवत फक्त तीन-चारच गावे सध्या आघाडीवर आहेत.

ठळक मुद्देश्रेयासाठी राजकीय चढाओढश्रमदानात फक्त तीनचारच गावे आघाडीवर

केडगाव : दुष्काळी नगर तालुक्याला वरदान ठरणा-या जलयुक्त शिवार योजनेत यावषार्साठी तालुक्यातील ४९ गावांची निवड करण्यात आली. मात्र हि निवड आमच्यामुळेच झाल्याच्या दावा राजकीय पदाधिकार्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून करून याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आता जवळपास संपूर्ण तालुकाच या योजनेत समाविष्ट झाला आहे. ज्या हिवरेबाजारने श्रमदानाच्या जीवावर गावाचा कायापालट केला त्याच्या पावलावर पाउल ठेवत फक्त तीन-चारच गावे सध्या आघाडीवर आहेत.जलयुक्त योजनेत पहिल्या वर्षी तालुक्यातील १८ गावांनी ९ कोटी ३१ लाखांची कामे केली. दुस-या वर्षी २१ गावांचा या योजनेत समावेश झाला. या गावांनी ४ कोटी रुपयांची कामे केली. नदी खोलीकरण, रुंदीकरण, समतलचर, बांध बंधिस्ती, दगडी बंधारे अशा कामांचा यात समावेश आहे. आता सन २०१८ -२०१९ या वषार्साठी तालुक्यातील ४९ गावांची निवड करण्यात आली आहे.कृषी विभागामार्फत या योजनेसाठी गावांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. आता तालुक्यातील जवळपास सर्वच गावांची या योजनेसाठी निवड झाल्याने दुष्काळाच्या झळा वषार्नुवर्षे सोसणा-या तालुक्याला आता दुष्काळाच्या शापातून मुक्त होण्याची संधी मिळाली आहे.हि शासकीय योजना असूनही गावांचे श्रेय घेण्यासाठी तालुक्यातील राजकीय नेत्यांची आज मोठी चढाओढ लागली होती. अगदी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांनी सोशल मिडीयाचा आधार घेत या योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. आमच्यामुळेच इतक्या गावांचा जलयुक्त योजनेत समावेश झाल्याचे राजकीय श्रेय लाटण्याच्या पोस्ट दिवसभर सोशल वर फिरत होत्या.सध्या तालुक्यात पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेची तयारी सुरु आहे. २५ गावांचा सहभाग असला तरी जेमतेम चार ते पाच गावातच सध्या श्रमदानाचे काम सुरु आहे. गुंडेगावने यात आघाडी घेतल्यानंतर आता सारोळा कासार, मजले चिंचोली, मांजरसुंबा, डोंगरगण या सारखी बोटावर मोजण्याइतकी गावे सरकारी योजनेवर अवलंबून न राहता श्रमदानाच्या माध्यमातून आपले गाव पाणीदार करण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत.या गावांचा झाला नव्याने समावेशबु-हाणनगर, निंबोडी, वारूळवाडी, आगडगाव, बाळेवाडी, भातोडी पारगाव, देवगाव, खांडके, माथनी, मेहेकरी, पारेवाडी, दशमी गव्हाण, कोल्हेवाडी, सांडवे,टाकळी काझी, भिंगार, नागरदेवळे, शहापूर, रतडगाव, बारा बाभळी, सोनेवाडी (पिला), जांब, नागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळक, देहेरे, कोळपे आखाडा, विळद, खारे कजुर्ने, शिंगवे नाईक, इस्लामपूर, नांदगाव, सोनेवाडी(चास), हमिदपूर, खातगाव टाकळी, टाकळी खातगाव, दरेवाडी, खंडाला, वाळूंज, आंबीलवाडी, गुणवडी, राळेगण म्हसोबा, मठपिंप्री, नारायणदोहो, शिराढोण, वाकोडी, बुरूडगाव, अरणगाव.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणीJalyukt Shivarजलयुक्त शिवार