शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नगर तालुक्यात ४९ गावांची जलयुक्तसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 10:50 IST

दुष्काळी नगर तालुक्याला वरदान ठरणा-या जलयुक्त शिवार योजनेत यावषार्साठी तालुक्यातील ४९ गावांची निवड करण्यात आली. मात्र हि निवड आमच्यामुळेच झाल्याच्या दावा राजकीय पदाधिकार्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून करून याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आता जवळपास संपूर्ण तालुकाच या योजनेत समाविष्ट झाला आहे. ज्या हिवरेबाजारने श्रमदानाच्या जीवावर गावाचा कायापालट केला त्याच्या पावलावर पाउल ठेवत फक्त तीन-चारच गावे सध्या आघाडीवर आहेत.

ठळक मुद्देश्रेयासाठी राजकीय चढाओढश्रमदानात फक्त तीनचारच गावे आघाडीवर

केडगाव : दुष्काळी नगर तालुक्याला वरदान ठरणा-या जलयुक्त शिवार योजनेत यावषार्साठी तालुक्यातील ४९ गावांची निवड करण्यात आली. मात्र हि निवड आमच्यामुळेच झाल्याच्या दावा राजकीय पदाधिकार्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून करून याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आता जवळपास संपूर्ण तालुकाच या योजनेत समाविष्ट झाला आहे. ज्या हिवरेबाजारने श्रमदानाच्या जीवावर गावाचा कायापालट केला त्याच्या पावलावर पाउल ठेवत फक्त तीन-चारच गावे सध्या आघाडीवर आहेत.जलयुक्त योजनेत पहिल्या वर्षी तालुक्यातील १८ गावांनी ९ कोटी ३१ लाखांची कामे केली. दुस-या वर्षी २१ गावांचा या योजनेत समावेश झाला. या गावांनी ४ कोटी रुपयांची कामे केली. नदी खोलीकरण, रुंदीकरण, समतलचर, बांध बंधिस्ती, दगडी बंधारे अशा कामांचा यात समावेश आहे. आता सन २०१८ -२०१९ या वषार्साठी तालुक्यातील ४९ गावांची निवड करण्यात आली आहे.कृषी विभागामार्फत या योजनेसाठी गावांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. आता तालुक्यातील जवळपास सर्वच गावांची या योजनेसाठी निवड झाल्याने दुष्काळाच्या झळा वषार्नुवर्षे सोसणा-या तालुक्याला आता दुष्काळाच्या शापातून मुक्त होण्याची संधी मिळाली आहे.हि शासकीय योजना असूनही गावांचे श्रेय घेण्यासाठी तालुक्यातील राजकीय नेत्यांची आज मोठी चढाओढ लागली होती. अगदी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांनी सोशल मिडीयाचा आधार घेत या योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. आमच्यामुळेच इतक्या गावांचा जलयुक्त योजनेत समावेश झाल्याचे राजकीय श्रेय लाटण्याच्या पोस्ट दिवसभर सोशल वर फिरत होत्या.सध्या तालुक्यात पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेची तयारी सुरु आहे. २५ गावांचा सहभाग असला तरी जेमतेम चार ते पाच गावातच सध्या श्रमदानाचे काम सुरु आहे. गुंडेगावने यात आघाडी घेतल्यानंतर आता सारोळा कासार, मजले चिंचोली, मांजरसुंबा, डोंगरगण या सारखी बोटावर मोजण्याइतकी गावे सरकारी योजनेवर अवलंबून न राहता श्रमदानाच्या माध्यमातून आपले गाव पाणीदार करण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत.या गावांचा झाला नव्याने समावेशबु-हाणनगर, निंबोडी, वारूळवाडी, आगडगाव, बाळेवाडी, भातोडी पारगाव, देवगाव, खांडके, माथनी, मेहेकरी, पारेवाडी, दशमी गव्हाण, कोल्हेवाडी, सांडवे,टाकळी काझी, भिंगार, नागरदेवळे, शहापूर, रतडगाव, बारा बाभळी, सोनेवाडी (पिला), जांब, नागापूर, वडगाव गुप्ता, निंबळक, इसळक, देहेरे, कोळपे आखाडा, विळद, खारे कजुर्ने, शिंगवे नाईक, इस्लामपूर, नांदगाव, सोनेवाडी(चास), हमिदपूर, खातगाव टाकळी, टाकळी खातगाव, दरेवाडी, खंडाला, वाळूंज, आंबीलवाडी, गुणवडी, राळेगण म्हसोबा, मठपिंप्री, नारायणदोहो, शिराढोण, वाकोडी, बुरूडगाव, अरणगाव.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणीJalyukt Shivarजलयुक्त शिवार