शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

शाळेची घंटा वाजली; मात्र आकडा वाढेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:22 IST

कोरोनाची स्थिती काहीशी आटोक्यात आल्यानंतर कोरोनामुक्त गावांमध्ये शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. जिल्ह्यात १५ जुलै ...

कोरोनाची स्थिती काहीशी आटोक्यात आल्यानंतर कोरोनामुक्त गावांमध्ये शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. जिल्ह्यात १५ जुलै रोजी शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी १६ जुलैला १४९ शाळा सुरू झाल्या. त्यानंतर ३० जुलैअखेर जिल्ह्यात १९४ शाळा सुरू झाल्या होत्या. त्यात १६ हजार ८० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात आठवी ते बारावी एकूण १२४२ शाळा आहेत. त्यात ८५ जिल्हा परिषदेच्या व ११५७ इतर व्यवस्थापन शाळांचा समावेश आहे. ३ सप्टेंबर २०२१च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात २०२ शाळा सुरू असून त्यात १६ हजार ३०० विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. म्हणजे शाळा सुरू होऊन २ महिने झाले तरी सुरू झालेल्या शाळांचा आकडे दोनशेच्या पुढे गेलेला नाही. अजूनही हजाराच्या आसपास शाळा बंद आहेत.

-------------

३४०० शिक्षकांचे लसीकरण

जिल्ह्यात आठवी ते बारावी एकूण १२४२ शाळा असून त्यात ५ हजार ३६९ शिक्षक आहेत. त्यातील ३३८४ शिक्षकांनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत.

---------------

तालुकानिहाय सुरू असलेल्या शाळा

अकोले ४३

संगमनेर २७

कोपरगाव ४

राहाता ३३

राहुरी ८

श्रीरामपूर २१

नेवासा १६

शेवगाव १२

पाथर्डी ११

जामखेड ३

कर्जत ६

श्रीगोंदा ४

पारनेर ६

नगर ८

------------

एकूण २०२

--------------

सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?

शाळा सुरू करण्याअगोदर त्या शाळांचे सॅनिटायझेशन करण्याच्या सूचना होत्या. त्याप्रमाणे अनेक गावांत सॅनिटायझेशन झाले. मात्र त्यासाठी खर्चाची तरतूद नाही. त्यामुळे सॅनिटायझेशनचे पैसे द्यायचे कोणी असा प्रश्न अजूनही कायम आहे.

------------