शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

साई जन्मस्थळाच्या वादावरून साईनगरीत असंतोषाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 17:29 IST

वरीष्ठ पातळीवरून सुरू असलेल्या या प्रयत्नांमुळे शिर्डीकरांची सबुरी संपुष्टात आली आहे. जन्मस्थळाच्या वादाला खतपाणी घालणा-या प्रवृत्तीच्या विरोधात येत्या गुरूवारी शिर्डीतुन ग्रामस्थ एल्गार पुकारणार आहेत.

शिर्डी : ऐन साई समाधी शताब्दी वर्षातच सार्इंच्या तथाकथित जन्मस्थानाचा वादाने डोके वर काढले आहे. जन्मस्थानाचा मुद्दा उकरून काढणे व त्याला खतपाणी घालणे म्हणजे सार्इंच्या सर्वधर्म समभावाला तिलांजली देण्यासारखे आहे. सध्या वरीष्ठ पातळीवरून सुरू असलेल्या या प्रयत्नांमुळे शिर्डीकरांची सबुरी संपुष्टात आली आहे. जन्मस्थळाच्या वादाला खतपाणी घालणा-या प्रवृत्तीच्या विरोधात येत्या गुरूवारी शिर्डीतुन ग्रामस्थ एल्गार पुकारणार आहेत.शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांनी आज, मंगळवारी सकाळी एकत्र येत या विषयावर गंभीरपणे चर्चा केली. येत्या गुरूवारी सायंकाळी ४ वाजता मारुती मंदीराजवळ ग्रामसभेच्या माध्यमातुन सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेवुन व परिस्थीतीची कल्पना देवुन आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. तत्पुर्वी याच दिवशी याच विषयावर नगरपंचायतच्या तातडीच्या विशेष सभेचेही आयोजन होण्याची शक्यता आहे.साईबाबांचे समाधी वर्षातच बाबांच्या तथाकथित जन्मस्थळ समोर आणुन साईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या शिकवणुकीवरच घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. साईबाबांनी आपल्या संपुर्ण जिवन चरीत्रामध्ये जातीपातीला थारा न देतां सबका मालिक एक हा मुलमंत्र जगाला दिला. यामुळेच शिर्डी हे देशविदेशातील सर्व जातीधर्मीयांचे एकमेव तिर्थक्षेत्र बनले असुन एकात्मतेचे प्रतिक आहे. सार्इंच्या जन्मस्थानाच्या मुद्दयावरून या शिकवणुकीवरच घाला येवु पहात आहे. यामुळे शिर्डी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व तमाम साईभक्तांच्या भावना दुखविल्या असुन तिव्र संतापाची लाट पसरली आहे.साईबाबांच्या जन्मस्थळाला मान्यताच नसुन याविषयी काही अपप्रवृत्ती जाणिवपुर्वक वाद निर्माण करुन बाबांच्या शिकवणुकीला हरताळ फासत आहेत. साईंच्या मान्यतेने लिहिलेल्या साईचरीत्रामध्येच जन्मस्थळा विषयी उल्लेख नाही तेव्हा याविषयी चुकीचा प्रचार होवु नये अशी ग्रामस्थांची व साईभक्तांची प्रामाणिक भावना आहे. या भावनेतुनच शिर्डीकर आंदोलनासाठी सरसावले आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरsaibabaसाईबाबा