शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर प्रवेशात अन्याय होण्याची भीती, सत्यजित तांबे यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 02:22 IST

बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे.

संगमनेर : दहावी व बारावीच्या सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या अंतर्गत गुणांकन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळतात, त्याचा अतिरिक्त फायदा संबंधित विद्यार्थ्यांना मिळतो. मात्र एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुणांकन केवळ २० टक्के असल्याने अकरावीच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत त्यांच्यावर अन्याय होण्याची भीती व्यक्त होत आहे. यासाठी तोडगा काढून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे.शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना तांबे यांनी यासंदर्भात पत्र लिहिले आहे. शिक्षणतज्ज्ञांची समिती नेमून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, असा तोडगा शोधावा. या वर्षासाठी केंद्रीकृत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया बंद करून महाविद्यालयीन पातळीवर आॅनलाईन पद्धती सुरू करावी, असे पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा