शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अहमदनगर जिल्ह्याला आठ हजार शेततळ्यांची संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 09:45 IST

मागेल त्याला शेततळे, या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित एक हजार शेततळे येत्या मे अखेरीस पूर्ण केले जाणार आहेत. सात हजार शेततळ्यांना प्रत्येकी ५० हजारांचे अनुदान कृषी विभागाकडून वितरीत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमागेल त्याला शेततळे सात हजार शेततळ्यांचे अनुदान वितरीत

अहमदनगर : मागेल त्याला शेततळे, या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित एक हजार शेततळे येत्या मे अखेरीस पूर्ण केले जाणार आहेत. सात हजार शेततळ्यांना प्रत्येकी ५० हजारांचे अनुदान कृषी विभागाकडून वितरीत करण्यात आले आहे.

शासनाने मागेल त्याला शेततळे, महत्वाकांक्षी योजना हाती घेतला आहे. २०१६ मध्ये सुरू करण्यात या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३३ हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. मात्र शासनाकडून जिल्ह्याला ९ हजार २०० एवढे उद्दिष्ट देण्यात आले. जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयामार्फत शेततळ्यांची योजना राबविण्यात येते. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात ८ हजार २३० शेततळे खोदण्यात आले आहे. त्यापैकी सन २०१६ मध्ये खोदलेल्या २ हजार ६९८ शेततळ्यांत पाणी साचले होते. तळे खोदण्यासाठी शेतक-यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले असून, शेततळ्याचे छायाचित्र कृषी विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आली आहेत. त्याचबरोबर सरकारने वैयक्तिक लाभाच्याही योजना सुरू केल्या. मागेल त्याला शेततळे, ही योजना त्याचाच एक भाग आहे. ज्या शेतक-यांनी अर्ज दाखल केले, त्यांना प्रत्येकाला शेततळे मिळालेले नाही. शेततळ्यांमध्ये पाणी साचविण्यासाठी कागद टाकणे गरजेचे असते. परंतु, त्याची खरेदी करणे शेतक-यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे शेततळे होऊन कागदाअभावी जैसे थे आहेत. शासनाने कागदासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू केली,परंतु, या योजनेंतर्गत कागद मिळत नसल्याने शेततळे शेतक-यांसाठी पांढरा हत्ती ठरणार की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.शेततळ्यात कर्जत तालुका टॉपवरजिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत तालुक्याला १ हजार ७०० शेततळे मंजूर आहेत. त्यापैकी १ हजार ५४८ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले. जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांची कर्जत तालुक्यात झाली आहेत. उर्वरित तालुक्यांत शेततळ्यांची संख्या कमी आहे.कुठे किती शेततळेअकोले-८४६, जामखेड-२४१, कोपरगाव-६५०, नगर-६२०, नेवासा-३२६, पारनेर-५२९, पाथर्डी-३८०, राहाता-४७१, राहुरी-२४०, संगमनेर-९२३, शेवगाव-१८०, श्रीगोंदा-९७४, श्रीरामपूर-३१२

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी