अहमदनगर : आगामी सर्वच निव्ाडणुका भाजपाला जिंकायच्या आहेत. मात्र नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका भाजपाचे लक्ष्य आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर भगवा फडकाविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज होण्याचे आवाहन भाजपाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी केले आहे.भारतीय जनता पार्टीच्या नगर जिल्ह्याची बैठक रविवारी झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड,जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते, प्रसाद ढोकरीकर, अरुण मुंडे, नितीन कापसे, सूर्यकांत मोरे, अॅड. विवेक नाईक, श्याम पिंपळे, सीताराम भांगरे, विक्रम तांबे, अशोक गायकवाड, बाळासाहेब सोनवणे, दिलीप भालसिंग, अशोक खेडकर, रवी सुरवसे आदी उपस्थित होते.सावजी म्हणाले, नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष निवड जनतेमधून होणार आहे. त्यामुळे घोडेबाजार बंद होणार आहे. केंद्रातील सत्तेला दोन वर्षे झाली, मात्र स्थानिक पातळीवर कार्यकर्ते जोमाने निवडणुकांमध्ये काम करताना दिसत नाहीत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दाखविणे गरजेचे आहे. जुन्या-नव्यांचा मेळ घालून पक्ष संघटना संघटना मजबूत करावी. फळ-भाज्यांवरील निर्बंध उठविल्यामुळे शेतकरी ते थेट ग्राहक अशी बाजारपेठ सुरू झाली आहे. मात्र काही लोक त्याचा अपप्रचार करीत आहेत. चांगल्या निर्णयांची माहिती जनतेला देण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. पंतप्रधान फसल बीमा योजना शेतकऱ्यांना सांगावी. (प्रतिनिधी)