शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुळा उजव्या कालव्यातून २० मार्चला आवर्तन सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 16:08 IST

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याला पाटबंधारे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. उजव्या कालव्यातून २० मार्च रोजी उन्हाळी पहिले आवर्तन सुटणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.

राहुरी : उत्सुकता निर्माण झालेल्या मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याला पाटबंधारे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. उजव्या कालव्यातून २० मार्च रोजी उन्हाळी पहिले आवर्तन सुटणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली. पाणी वापर संस्थांनी लेखी मागणी केली नसतांनाही शेतक-यांच्या दबाव तंत्रामुळे पाटबंधारे खात्याला कालव्यातून पाणी सोडण्यासाठी झुकावे लागले आहे. मुळा पाटबंधारे खात्याकडे केवळ चारच संस्थांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यामुळे पाटबंधारे खाते कालव्यातून पाणी सोडण्यास राजी नव्हते.  लेखी मागणी असल्याशिवाय पाणी सोडता येत नाही असा पाटबंधारे खात्याचा नियम आहे. मात्र नियम डावलून पाटबंधारे खात्याला मंत्र्यांच्या दबावापुढे झुकावे लागले आहे. डाव्या कालव्यातून ब्रिटीशकालीन पध्दतीचा अवलंब करून लेख मागणीनंतर पाणी सोडण्यात आले होते.  मात्र उजव्या कालव्याकडे लेखी मागणी नसल्याने पाटबंधारे खाते काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.पाटबंधारे खात्याने पाणी सुटण्याचे प्रगटन मुदत १६ मार्च दिली होती. मात्र १६ मार्चपर्यंत केवळ १०० हेक्टरची मागणी नोंदविण्यात आली होती. पाणी वापर संस्थांनी ताठर भूमिका घेत लेखी मागणीकडे पाठ फिरविली. पाटबंधारे खाते व पाणी वापर संस्था यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे. १९ मार्चपर्यंत कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण होणार आहे. रब्बी आवर्तन सोडण्यापूर्वीही दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र रेतीमुळे पुन्हा दुरूस्तीची वेळ पाटबंधारे खात्यावर आली आहे.मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीम यांनी हिरवा कंदील दाखविला होता. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. याशिवाय मंत्री शंकरराव गडाख व लोकप्रतिनिधी यांनीही शासन दरबारी पाठपुरावा केला होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरणDamधरणWaterपाणी