शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

कोपरगाव भूमी अभिलेख कार्यालयाच्या छताला पहिल्याच पावसात गळती; वीस लाखांचा खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 14:30 IST

कोपरगाव शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या संपूर्ण इमारतीचे पाच महिन्यापूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी (दि.५) झालेल्या पहिल्याच पावसात इमारतीच्या छताला गळती लागली आहे.

रोहित टेके  । कोपरगाव : शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या संपूर्ण इमारतीचे पाच महिन्यापूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी (दि.५) झालेल्या पहिल्याच पावसात इमारतीच्या छताला गळती लागली आहे. त्यामुळे शासनाने दुरुस्तीसाठी केलेला २० लाखांचा खर्च पाण्यात गेला असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

    सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कोपरगाव कार्यालयाच्यामार्फत या इमारतीचे संपूर्ण दुरुस्तीचे काम पाच महिन्यापूर्वी २० लाख खर्च करून कार्यालयासाठी कूपनलिका, फरशीचे पूर्ण काम, भिंतींची दुरुस्ती करून रंगकाम, छतावरील वॉटर प्रूफिंग, रेनवॉटर हार्वेस्टिंग यासह इतरही कामे करण्यात आली होती. मात्र शासनाने एवढा खर्च करूनही पाचच महिन्यात भिंतींना तडे गेले.

     यासंदर्भात ‘लोकमत’ने मागील महिन्यात २१ मे रोजीच्या अंकात वस्तुनिष्ठ बातमी प्रकाशित केली होती. त्यावेळी कोपरगाव येथील बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वाकचौरे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी इमारतीच्या दुरुस्तीचे काम गुणवत्तापूर्वक केले असून या इमारतीच्या मूळ पायातच दोष असल्याने इमारतीच्या भिंतींना तडे गेले असल्याचे सांगितले होते. मात्र गुणवत्तापूर्वक केलेल्या कामातून पहिल्याच पावसात छतातून पाण्याची गळती होत असल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तडे गेलेल्या भिंतींची तत्काळ दुरुस्ती करू असे सांगितले होते. तीही अद्यापपर्यंत दुरुस्ती करण्यात आलेली नाही. कार्यालय परिसरातील कूपनलिकेत विद्युत मोटरही बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याचाही विसर संबंधित विभागाला पडला आहे.  

 कार्यालय परिसरात  साचले पावसाचे पाणीविशेष म्हणजे कार्यालयाच्या बाहेरील परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविण्यात आले आहे. परंतु त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या गटारीचे ढापे खूप उंचीवर बसविण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात साचलेले पावसाचे पाणीही त्या गटारीतून वाहत नसल्याने या परिसरातच पाण्याचे मोठे तळे साचले होते.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावRainपाऊसGovernmentसरकार