शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

कोपरगाव भूमी अभिलेख कार्यालयाच्या छताला पहिल्याच पावसात गळती; वीस लाखांचा खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 14:30 IST

कोपरगाव शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या संपूर्ण इमारतीचे पाच महिन्यापूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी (दि.५) झालेल्या पहिल्याच पावसात इमारतीच्या छताला गळती लागली आहे.

रोहित टेके  । कोपरगाव : शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या संपूर्ण इमारतीचे पाच महिन्यापूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी (दि.५) झालेल्या पहिल्याच पावसात इमारतीच्या छताला गळती लागली आहे. त्यामुळे शासनाने दुरुस्तीसाठी केलेला २० लाखांचा खर्च पाण्यात गेला असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

    सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कोपरगाव कार्यालयाच्यामार्फत या इमारतीचे संपूर्ण दुरुस्तीचे काम पाच महिन्यापूर्वी २० लाख खर्च करून कार्यालयासाठी कूपनलिका, फरशीचे पूर्ण काम, भिंतींची दुरुस्ती करून रंगकाम, छतावरील वॉटर प्रूफिंग, रेनवॉटर हार्वेस्टिंग यासह इतरही कामे करण्यात आली होती. मात्र शासनाने एवढा खर्च करूनही पाचच महिन्यात भिंतींना तडे गेले.

     यासंदर्भात ‘लोकमत’ने मागील महिन्यात २१ मे रोजीच्या अंकात वस्तुनिष्ठ बातमी प्रकाशित केली होती. त्यावेळी कोपरगाव येथील बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वाकचौरे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी इमारतीच्या दुरुस्तीचे काम गुणवत्तापूर्वक केले असून या इमारतीच्या मूळ पायातच दोष असल्याने इमारतीच्या भिंतींना तडे गेले असल्याचे सांगितले होते. मात्र गुणवत्तापूर्वक केलेल्या कामातून पहिल्याच पावसात छतातून पाण्याची गळती होत असल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तडे गेलेल्या भिंतींची तत्काळ दुरुस्ती करू असे सांगितले होते. तीही अद्यापपर्यंत दुरुस्ती करण्यात आलेली नाही. कार्यालय परिसरातील कूपनलिकेत विद्युत मोटरही बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याचाही विसर संबंधित विभागाला पडला आहे.  

 कार्यालय परिसरात  साचले पावसाचे पाणीविशेष म्हणजे कार्यालयाच्या बाहेरील परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविण्यात आले आहे. परंतु त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या गटारीचे ढापे खूप उंचीवर बसविण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात साचलेले पावसाचे पाणीही त्या गटारीतून वाहत नसल्याने या परिसरातच पाण्याचे मोठे तळे साचले होते.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावRainपाऊसGovernmentसरकार