शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती...
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
5
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
6
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
7
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
8
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
9
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
10
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
11
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
12
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
13
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
14
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
15
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
16
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
17
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
18
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
19
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
20
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी

'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार पीकविम्याची रक्कम; रोहित पवारांनी दिलेला शब्द पाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 10:51 IST

आमदार पवार यांनी कर्जत- जामखेड मतदार संघातील शेतकऱ्यांसह नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागील वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकविम्याची रक्कम मिळवून देण्याचा शब्द निवडणुकीपूर्वी दिला होता.

अहमदनगर ( कर्जत ) : अहमदनगर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना सन २०१८ मधील रब्बी हंगामातील पिकविम्याची रक्कम मिळाली नाही. त्यांना कागदपत्रांची पुर्तता करण्याची संधी देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची भेट घेऊन याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आमदार पवार यांनी कर्जत- जामखेड मतदार संघातील शेतकऱ्यांसह नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागील वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकविम्याची रक्कम मिळवून देण्याचा शब्द निवडणुकीपूर्वी दिला होता. त्यानुसार त्यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे आतापर्यंत ७० टक्के शेतकऱ्यांना त्यांचे अडकलेले पिकविम्याची रक्कम मिळाली आहे. पण तरीही आधार लिंक न केल्याने किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे अजूनही ३० टक्के शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळालेले नाहीत.

या शेतकऱ्यांनी पुन्हा आमदार रोहित पवार यांच्याशी संपर्क साधून यात लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे आणि मुख्य सांख्यिकी उदय देशमुख यांची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या. कृषी आयुक्तांनीही तातडीने संबंधित विमा कंपनीच्या आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना परत एकदा त्रुटींची पूर्तता करण्याची संधी देण्याचे मान्य केले.

त्यानुसार येत्या काही दिवसांत राहिलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल नंबरवर एक एस.एम.एस येईल. त्यानुसार आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन या शेतकऱ्यांना अपुऱ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. 

निवडणुकीपूर्वी शेतक-यांना त्यांच्या पिकविम्याचे अडकलेले पैसे मिळवून देण्याचा शब्द मी दिला होता. त्यानुसार कृषी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना हा विषय मांडला. त्यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन तत्परतेने संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून पावले उचलली. प्रशासनात सकारात्मक विचार करुन लोकांना न्याय मिळवून देणारे अनेक अधिकारी आहेत. ही चांगली गोष्ट असून सगळ्याच अधिकाऱ्यांनी प्रशासन चालवताना अशी लोकाभिमुख भूमिका घेतली तर अनेक प्रश्न सुटू शकतात.रोहित पवार ( आमदार, कर्जत- जामखेड )