शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

दगडांचा आवाज, कॉप्यांचा पाऊस

By admin | Updated: March 1, 2016 23:33 IST

अहमदनगर : राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मंगळवारी दहावीच्या परीक्षेस सुरुवात झाली

अहमदनगर : राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मंगळवारी दहावीच्या परीक्षेस सुरुवात झाली असून यापूर्वीच बारावीची परीक्षा सुरू झालेली आहे. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना त्यात खंड झालेला नाही. मंगळवारी दहावीच्या पेपर दरम्यान नगर तालुक्यातील एका केंद्रावर कॉपीचा प्रकार घडला. विशेष म्हणजे तपासणी पथक आले असल्याचा इशारा मिळताच विद्यार्थ्यांनी खिडकीतून कॉप्या बाहेर टाकल्या.१६ फे बु्रवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. मराठी वगळता अन्य पेपरला कमी- अधिक कॉपीच्या घटना समोर आल्या होत्या. अशी परिस्थिती दहावीच्या बाबतीत घडू नये, यासाठी दक्षता घेण्याची गरज असताना कॉपीचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे येथील घटनेवरून सिद्ध झाले आहे. या ठिकाणी पहिल्या मराठीच्या पेपरला मोठ्या प्रमाणात कॉपी सुरू होती. परीक्षा केंद्रावर माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे यांच्या पथकाने भेट दिली. परीक्षा केंद्र तपासणीसाठी पथक येत असल्याचे पाहून परीक्षा केंद्राबाहेर असणाऱ्या मुलांनी पत्र्यावर दगड मारू न कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इशारा दिला. पत्र्यावरील दगडाच्या आवाजामुळे विद्यार्थी गोंधळले. ठुबे परीक्षा केंद्राच्या आत येण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी खिडकीतून कॉप्या बाहेर फे कल्या. पथकाला या ठिकाणी कॉपी करणारे विद्यार्थी आढळले नाहीत. पथक गेल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांनी टाकलेल्या कॉप्या जमा केल्या.यासंदर्भात शिक्षणाधिकारी ठुबे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्या जाण्यापूर्वी किंवा त्या गेल्यानंतर काही घडले असेल, त्यांना याबाबत काही कल्पना नाही. परीक्षा नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची झडती घेवून त्यांना परीक्षा केंद्रात सोडले होते. यामुळे आता विद्यार्थ्यांकडे कॉप्या आल्या कोठून, असा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)