शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
2
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
3
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
4
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
5
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
6
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
7
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
8
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
9
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
10
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
11
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
12
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
13
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
14
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
15
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
16
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
17
दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा!
18
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
19
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
20
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर

परतीच्या पावसाने आमच्या लक्ष्मीची शेतातच झाली माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 15:09 IST

राहाता तालुक्यात उभ्या व सोंगूण पडलेल्या बाजरी, सोयाबीन, मका, कपाशी पिकाला कोंब फुटल्याने या पिकांची अक्षरश: माती झाल्याने दिवाळीची लक्ष्मी घरी येण्याच्या अगोदरच शेतक-यांच्या घरात काळोख पसरला. ‘आमच्या लक्ष्मीची तर शेतातच माती झाली हाय..!’ अशी म्हणण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.

गणेश आहेर । लोणी : हातातोंडाशी आलेल्या शेतक-यांच्या पिकलेल्या मालावर सतत बारा दिवसांपासून परतीचा पाऊस घाला घालत आहे. त्यामुळे खरिपांची पिके नेस्तनाबूत झाले. राहाता तालुक्यात उभ्या व सोंगूण पडलेल्या बाजरी, सोयाबीन, मका, कपाशी पिकाला कोंब फुटल्याने या पिकांची अक्षरश: माती झाल्याने दिवाळीची लक्ष्मी घरी येण्याच्या अगोदरच शेतक-यांच्या घरात काळोख पसरला. ‘आमच्या लक्ष्मीची तर शेतातच माती झाली हाय..!’ अशी म्हणण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.  गेल्या दहा-बारा दिवसांपासून राहाता  तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे.  खरीप हंगामात सुरूवातीला पिकांसाठी हवाहवासा वाटणारा पाऊस मागील चार-पाच वर्षाच्या दुष्काळाची झीज नक्कीच भरून काढणार या आशेने शेतकºयांनी यंदा कोणतीही कसर न ठेवता उत्पादन खर्चाला मोकळी वाट करून दिली होती. परंतु पिके काढणीच्या वेळी हाच जास्तीचा पाऊस पिकांसाठी घातक ठरला. बाजरी, मका, सोयाबीन काढणीच्या वेळी हा पाऊस थांबलाच नाही. हाताशी आलेले पीक भिजल्याने  मातीमोल झाले. १८ आॅक्टोबरपासून आजतागायत राहाता तालुक्यातील शेतकरी संध्याकाळी तालुक्यात कुठे न कुठे  धो-धो पाऊस अनुभवत आहेत.आतापर्यंत अनेक वेळा पावसाळ्यात भरपूर पाऊस पडला असला तरी तो ठराविक अंतराने उघडिप देत राहिल्याने पिकांना नुकसानकारक ठरत नव्हता. दिवाळीला पण कधी कधी एक-दोन दिवसांचा होत असे. पण यावर्षी  परतीचा असा पहिल्यांदा पाऊस पाहिला, असे गोगलगाव येथील आप्पा चौधरी यांनी सांगितले. दिवाळीच्या सुट्टीला गेलेले कृषी अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी नॉट रिचेबल आहेत. रिचेबल झाले तर फोन उचलायला तयार नाही. मंडल कृषी कार्यालयातील अधिकारी पंचनामे करण्याच्या नावाखाली कार्यालये दिवसभर बंद ठेवत आहेत. हा लोणीच्या मंडल कृषी कार्यालयातील माझा अनुभव आहे, असे गोगलगाव येथील शेतकरी काशिनाथ उगले यांनी सांगितले. सुरूवातीला झालेल्या पावसावर सोयाबीन, बाजरी पिके पेरली. पण त्यानंतर पाऊस गायब झाला अन सोयाबीन, बाजरीची पिके वाळली. सुकून गेल्याने त्यावरून नांगर फिरवला. चा-यासाठी मका पेरली गेली. शेंडा खाणाºया अळीपासून ती कशीबशी वाचविली पण आता परतीच्या पावसाने हातची गेली, असे शेतकरी पुंजा हरी मगर यांनी सांगितले.     

टॅग्स :rahaataराहाताRainपाऊस