शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध मागे; साखर कारखानदारीला दिलासा

By सचिन धर्मापुरीकर | Updated: December 16, 2023 17:01 IST

बिपीन कोल्हे, साखर कारखानदारीला दिलासा.

सचिन धर्मापुरीकर,कोपरगाव : थेट उसाचा रस, सिरप, बी हेवी मोलॅसेसपासून ३३ टक्के इथेनॉल निर्मितीचे धोरण पुन्हा कायम केल्याबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले आहे. या निर्णयामुळे साखर कारखानदारीला दिलासा मिळाला आहे.

बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, देशातील ग्रामीण अर्थकारणास इथेनॉल निर्मितीतून मोठी चालना मिळाली आहे. चालू वर्षी उसाचा तुटवडा असल्याने केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीवर बंधने घातली होती, ती साखर उद्योगास मारक असून देशात सुमारे ३५५ कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती सुरू केली. राज्यात यासाठी १५५ कारखान्यांनी सुमारे ८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली, गेल्या वर्षी १२० कोटी लीटर इथेनॉल ऑइल कंपन्यांना पुरवले गेले, चालू वर्षी ३०० कोटी लीटर्सपर्यंत वाढ झाली त्यातच केंद्राने आणलेले निबंध यामुळे इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते, हे निर्बंध असेच कायम राहिले तर आर्थिक असंतुलन वाढेल तेव्हा या निर्णयाचा फेरविचार करावा म्हणून मागणी लावून धरली होती, त्याचा केंद्र शासनाने शुक्रवारी पुनर्विचार केला. हा साखर उद्योगास दिलासा आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने देशात सर्वप्रथम गेल्या ५ वर्षांपासून थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीत आघाडी घेतली आहे.

निर्णयामुळे संपूर्ण साखर उद्योगास दिलासा :

बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत साखर उद्योगात आर्थिक स्थैर्यता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षात धडाडीचे पावले उचलली. अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करत इथेनॉल निर्मितीचा पुनर्विचार करून त्याबाबत ठोस निर्णय घेतला त्याबद्दल युवानेते, कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनीही केंद्र शासनाचे आभार मानले. या निर्णयामुळे संपूर्ण साखर उद्योगास दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBipin kolheबिपीन कोल्हेSugar factoryसाखर कारखाने