शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध मागे; साखर कारखानदारीला दिलासा

By सचिन धर्मापुरीकर | Updated: December 16, 2023 17:01 IST

बिपीन कोल्हे, साखर कारखानदारीला दिलासा.

सचिन धर्मापुरीकर,कोपरगाव : थेट उसाचा रस, सिरप, बी हेवी मोलॅसेसपासून ३३ टक्के इथेनॉल निर्मितीचे धोरण पुन्हा कायम केल्याबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले आहे. या निर्णयामुळे साखर कारखानदारीला दिलासा मिळाला आहे.

बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, देशातील ग्रामीण अर्थकारणास इथेनॉल निर्मितीतून मोठी चालना मिळाली आहे. चालू वर्षी उसाचा तुटवडा असल्याने केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीवर बंधने घातली होती, ती साखर उद्योगास मारक असून देशात सुमारे ३५५ कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती सुरू केली. राज्यात यासाठी १५५ कारखान्यांनी सुमारे ८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली, गेल्या वर्षी १२० कोटी लीटर इथेनॉल ऑइल कंपन्यांना पुरवले गेले, चालू वर्षी ३०० कोटी लीटर्सपर्यंत वाढ झाली त्यातच केंद्राने आणलेले निबंध यामुळे इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते, हे निर्बंध असेच कायम राहिले तर आर्थिक असंतुलन वाढेल तेव्हा या निर्णयाचा फेरविचार करावा म्हणून मागणी लावून धरली होती, त्याचा केंद्र शासनाने शुक्रवारी पुनर्विचार केला. हा साखर उद्योगास दिलासा आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने देशात सर्वप्रथम गेल्या ५ वर्षांपासून थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीत आघाडी घेतली आहे.

निर्णयामुळे संपूर्ण साखर उद्योगास दिलासा :

बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत साखर उद्योगात आर्थिक स्थैर्यता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षात धडाडीचे पावले उचलली. अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करत इथेनॉल निर्मितीचा पुनर्विचार करून त्याबाबत ठोस निर्णय घेतला त्याबद्दल युवानेते, कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनीही केंद्र शासनाचे आभार मानले. या निर्णयामुळे संपूर्ण साखर उद्योगास दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBipin kolheबिपीन कोल्हेSugar factoryसाखर कारखाने