शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत करण्याचा ठराव

By admin | Updated: September 4, 2015 00:12 IST

अहमदनगर : शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण नगर जिल्ह्यात पोहचले आहे. अलिकडच्या काही वर्षात जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.

अहमदनगर : शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण नगर जिल्ह्यात पोहचले आहे. अलिकडच्या काही वर्षात जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासोबत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना जिल्हा परिषदेने प्रत्येक २० हजार रुपयांप्रमाणे मदत करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा विषय सभापती शरद नवले यांनी मांडला होता. गुरूवारी जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समितीची बैठक झाली. यात सभापती नवले यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेने काही तरी केले पाहिजे. यासाठी प्रत्येकी २० हजार रुपये मदतीचा ठराव यावेळी मांडण्यात आला. यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात यावी, अशी चर्चा करण्यात आली. त्यावर समितीच्या अन्य सदस्यांनी कायदेशीर बाबी तपासून ही योजना सुरू करण्यास हरकत नसल्याचे मत नोंदवले. जिल्हा परिषद कृषी विभाग तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेट देवून त्यांना कृषी विभागाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असे नवले यांनी सांगितले. राष्ट्रीय बायोगॅस योजनेतंर्गत सिलिंडरमुक्त गाव करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागाने हातात हात हात घालून काम करण्याच्या सूचना दिल्या. सभेला सदस्या पुनम भिंगारदिवे, उषा कराळे, उषा गोर्डे, पद्मा थोरात, पुष्पा रोहोम, मंगल निमसे, जिल्हा कृषी अधिकारी विलास नलगे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भारत राठोड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)